शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

कोअर झोनमधील १४ गावे लाभापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:26 IST

रामापूर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील पाटण तालुक्यातील १४ गावे शासनाने वगळून बफर झोनमध्ये घेतली. मात्र प्रत्यक्षात त्या ...

रामापूर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील पाटण तालुक्यातील १४ गावे शासनाने वगळून बफर झोनमध्ये घेतली. मात्र प्रत्यक्षात त्या लोकांना त्याचा लाभ होत नाही, याबाबत मानवी हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून पुन्हा लढा उभारावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती पाटण तालुका मानवी हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी दिली.

पाटण तालुक्यातील १४ गावे कोअर झोनमधून बफर झोनमध्ये घेण्यात आली आहेत. वनविभागाने लादलेल्या निर्बंधातून स्थानिक जनता मुक्त होऊन जनजीवन पूर्ववत सुरळीत होईल, असे वाटत होते. मात्र, गेल्या दीड वर्षांत याबाबत वनविभागाकडून काहीच हालचाली झाल्या नाहीत. कोअर झोनमधील असणाऱ्या गावांच्या खासगी जमिनींबाबत अजूनही काही स्पष्ट आदेश नाही. वनविभागाच्या जमिनी व खासगी जमिनी यांच्या हद्दी निश्चित होणे गरजेचे आहे. यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याने आपली हद्द निश्चित नसल्याने जमिनी कसता येत नाहीत. वनविभागाने पुढाकार घेऊन या हद्दी निश्चित केल्या पाहिजेत. याबाबत कोणत्याही हालचाली होत नाहीत.

१४ गावे कोअर झोनमधून बफर झोनमध्ये घेण्याबाबत पाटण तालुक्यातील जनतेने १२ वर्षे लढा दिला. कोर्ट, कचेऱ्या केल्या, आंदोलने केली, त्यास यश येऊन शासनाने १४ गावे वगळण्याचा निर्णय घेतला. मात्र, तरी देखील स्थानिक जनतेस त्या ठिकाणी काही करता येत नाही, पदरात पाडून घेता येत नाही. बफर झोनमध्ये आल्यानंतर स्थानिक जनतेने सलोख्याने, सोबतीने शासकीय योजना राबविण्यासाठी वनविभागापुढे हात केला मात्र, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. याबाबत वनविभागाने स्थानिक जनतेला विश्वासात घेत जिल्हाधिकारी स्तरावर या बैठका होणे आवश्यक आहे, याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. याबाबतचे निवेदन खासदार श्रीनिवास पाटील यांना सुद्धा देण्यात येणार असल्याचे राजाभाऊ शेलार यांनी सांगितले.

चौकट..

लोकांना विश्वासात घेणे गरजेचे..

तालुक्यातील नवजा येथील सुमारे ५० हेक्टर जमीन क्षेत्र काॅरिडाेरसाठी घेण्यात आल्याचे जाहीर केले आहे. मात्र, ते कोणते क्षेत्र आहे. याबाबत वनविभागाने स्थानिक लोकांना अवगत केलेले नाही. याबाबत त्या ठिकाणी बैठक लावून लोकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. याबाबत स्पष्टीकरण संबंधित वनविभागाच्या वतीने करण्यात यावे.