शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

जिल्ह्यात १५ दिवसांत १०८३ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:46 IST

सातारा : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण आणि मृतांचाही आकडा वाढत चालला आहे. फेब्रुवारीतील १५ दिवसांचा विचार करता ...

सातारा : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण आणि मृतांचाही आकडा वाढत चालला आहे. फेब्रुवारीतील १५ दिवसांचा विचार करता एक हजार ८३ रुग्ण आढळून आले असून, २० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या प्रशासनाची चिंता वाढविणारी ठरू लागली आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्याच्या शेवटी कोरोनाचा रुग्ण आढळला. सुरुवातीला कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होते. कधी १०, २०, तर कधी ५० पर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. मात्र, मे महिना सुरू झाल्यापासून कोरोना रुग्णांत झपाट्याने वाढ होण्यास सुरुवात झाली. जून महिन्याच्या उत्तरार्धापासून तर कोरोनाबाधितांची संख्या दिवसाला शेकडोच्या पटीत वाढली. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत तर कोरोनाचा कहर होता. कधी ६००, ७००, तर कधी ८०० च्यावर कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली. यामुळे सप्टेंबरअखेर कोरोनाबाधितांची जिल्ह्यातील संख्या ३७ हजारांवर गेली. तसेच मृतांचा आकडाही वाढला.

ऑक्टोबर उजाडताच कोरोनाबाधित आणि मृतांची संख्या कमी होऊ लागली. नोव्हेंबर महिनाही आणखी दिलासादायक ठरला. कारण, ऑक्टोबरच्या तुलनेत निम्मेच रुग्ण आढळून आले. नोव्हेंबरमध्ये चार हजार ४५० बाधित निष्पन्न झाले, तर सहा हजार ६८९ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याचे स्पष्ट झाले होते. डिसेंबरमध्येही हे प्रमाण आणखी कमी झाले. बाधित फक्त तीन हजार ५५२ आढळून आले, तर तीन हजार ३१२ मुक्त झाले, तर ६८ जणांचा मृत्यू झाला. जानेवारी महिन्यात तर १ हजार ४०२ रुग्ण आढळले, तर २६ जणांचा मृत्यू झाला, तर कोरोनामुक्तची संख्या ९७८ राहिली.

जानेवारीच्या मध्यापर्यंत तरी कोरोना नियंत्रणात होता. मात्र, त्यानंतर रुग्णांची संख्या वाढू लागली. फेब्रुवारी महिन्यात तर सतत बाधितांचा आकडा वाढू लागला. तसेच मृतांचीही संख्या वाढू लागली आहे. फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत एक हजार ८३ रुग्ण आढळून आलेले आहेत, तर ९२४ जण मुक्त झाले आहेत. त्याचबरोबर फेब्रुवारीच्या पहिल्या १५ दिवसांत १५ हजार ९३८ संशयितांचे नमुने घेऊन तपासणी करण्यात आली. यावरून फेब्रुवारीपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याचे दिसून आले. यामुळे प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे.

कोट :

कोरोना अजुन संपलेला नाही, तरीही अनेक नागरिक विनामास्क फिरतात. शासन नियमांचे पालन करत नाहीत. नागरिकांची ही भूमिका चुकीची आहे. शासन नियमांना कंटाळून चालणार नाही. आपण गाफील राहिलो तर कोरोना आणखी जवळ येईल. काळजी घेतली तर स्वत:सह इतरही सुरक्षित राहतील.

- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी

.............................................................