शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

झेडपी पदाधिकारी बदलाचा चेंडू चंद्रकांतदादांच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:29 IST

सांगली : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांचा वर्षभराचा कार्यकाल संपल्यामुळे इच्छुकांनी भाजपच्या नेत्यांकडे या पदांसाठी फिल्डींग लावली आहे. भाजपचे ...

सांगली : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांचा वर्षभराचा कार्यकाल संपल्यामुळे इच्छुकांनी भाजपच्या नेत्यांकडे या पदांसाठी फिल्डींग लावली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रत्येक तालुक्यातील नेत्यांशी चर्चा करून पदाधिकारी बदलाबाबतचा निर्णय घेणार आहेत. पाटील हे १३ किंवा १५ फेब्रुवारीला सांगलीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेणार आहेत. त्यानंतरच यावर निर्णय होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे, शिक्षण व अर्थ समिती सभापती आशाताई पाटील, महिला व बालकल्याण सभापती सुनीता पवार, बांधकाम व अर्थ समिती सभापती जगन्नाथ माळी यांचा एक वर्षाचा कार्यकाल दिनांक २ जानेवारी रोजी संपला आहे. मागील पदाधिकारी निवडीवेळी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत विद्यमान पदाधिकाऱ्यांना वर्षभराचा कालावधी देऊन उर्वरित वर्षाच्या कालावधीसाठी नाराज सदस्यांना संधी देण्याचा निर्णय झाला होता. परंतु, कोरोनामध्येच सर्व कालावधी गेल्यामुळे या पदाधिकाऱ्यांना काम करण्याची संधीच मिळाली नाही. यामुळे पुढील कालावधीतही आपल्यालाच कायम ठेवण्याची मागणी विद्यमान पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

दुसऱ्या बाजूला इच्छुकांनी आग्रह कायम ठेवला असून, ठरल्यानुसार संधी देण्याची भूमिका नेत्यांकडे मांडली आहे. पदाधिकारी बदलासाठी सुरेंद्र वाळवेकर, नितीन नवले, सरदार पाटील, अरुण बालटे, सरिता कोरबू यांनी फिल्डींग लावली आहे. या सदस्यांचे म्हणणे भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचवले आहे. पाटील हे सांगलीत दिनांक १३ अथवा १५ फेब्रुवारीला येऊन भाजप कोअर कमिटीची बैठक घेणार आहेत. त्यामुळे पदाधिकारी बदलाचा चेंडू सध्या चंद्रकांतदादांच्या कोर्टात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

चौकट

सदस्य फुटण्याची भीती

वर्षापूर्वीच्या पदाधिकारी बदलावेळी भाजपचे काही सदस्य राष्ट्रवादीच्या गळाला लागण्याची शक्यता होती. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य गळाला लावला होता. भाजपचे चार सदस्य हाती न लागल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाधिकारी बदलामध्ये फारसे लक्ष घातले नव्हते. परंतु, यावेळी पुन्हा तसेच होईल, असे नाही. जयंत पाटील यांनी मनावर घेतले तर शिवसेनेचे तीन, माजी मंत्री अजितराव घोरपडे समर्थक दोन आणि भाजपचे नाराज सदस्य राष्ट्रवादीकडे गेले, तर सत्तांतर होऊ शकते. त्यामुळे भाजप सध्या ताकही फुंकून पिण्याच्या तयारीत आहे.