शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

झेडपी पदाधिकारी बदलाचा चेंडू चंद्रकांतदादांच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:29 IST

सांगली : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांचा वर्षभराचा कार्यकाल संपल्यामुळे इच्छुकांनी भाजपच्या नेत्यांकडे या पदांसाठी फिल्डींग लावली आहे. भाजपचे ...

सांगली : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांचा वर्षभराचा कार्यकाल संपल्यामुळे इच्छुकांनी भाजपच्या नेत्यांकडे या पदांसाठी फिल्डींग लावली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रत्येक तालुक्यातील नेत्यांशी चर्चा करून पदाधिकारी बदलाबाबतचा निर्णय घेणार आहेत. पाटील हे १३ किंवा १५ फेब्रुवारीला सांगलीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेणार आहेत. त्यानंतरच यावर निर्णय होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे, शिक्षण व अर्थ समिती सभापती आशाताई पाटील, महिला व बालकल्याण सभापती सुनीता पवार, बांधकाम व अर्थ समिती सभापती जगन्नाथ माळी यांचा एक वर्षाचा कार्यकाल दिनांक २ जानेवारी रोजी संपला आहे. मागील पदाधिकारी निवडीवेळी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत विद्यमान पदाधिकाऱ्यांना वर्षभराचा कालावधी देऊन उर्वरित वर्षाच्या कालावधीसाठी नाराज सदस्यांना संधी देण्याचा निर्णय झाला होता. परंतु, कोरोनामध्येच सर्व कालावधी गेल्यामुळे या पदाधिकाऱ्यांना काम करण्याची संधीच मिळाली नाही. यामुळे पुढील कालावधीतही आपल्यालाच कायम ठेवण्याची मागणी विद्यमान पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

दुसऱ्या बाजूला इच्छुकांनी आग्रह कायम ठेवला असून, ठरल्यानुसार संधी देण्याची भूमिका नेत्यांकडे मांडली आहे. पदाधिकारी बदलासाठी सुरेंद्र वाळवेकर, नितीन नवले, सरदार पाटील, अरुण बालटे, सरिता कोरबू यांनी फिल्डींग लावली आहे. या सदस्यांचे म्हणणे भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचवले आहे. पाटील हे सांगलीत दिनांक १३ अथवा १५ फेब्रुवारीला येऊन भाजप कोअर कमिटीची बैठक घेणार आहेत. त्यामुळे पदाधिकारी बदलाचा चेंडू सध्या चंद्रकांतदादांच्या कोर्टात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

चौकट

सदस्य फुटण्याची भीती

वर्षापूर्वीच्या पदाधिकारी बदलावेळी भाजपचे काही सदस्य राष्ट्रवादीच्या गळाला लागण्याची शक्यता होती. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य गळाला लावला होता. भाजपचे चार सदस्य हाती न लागल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाधिकारी बदलामध्ये फारसे लक्ष घातले नव्हते. परंतु, यावेळी पुन्हा तसेच होईल, असे नाही. जयंत पाटील यांनी मनावर घेतले तर शिवसेनेचे तीन, माजी मंत्री अजितराव घोरपडे समर्थक दोन आणि भाजपचे नाराज सदस्य राष्ट्रवादीकडे गेले, तर सत्तांतर होऊ शकते. त्यामुळे भाजप सध्या ताकही फुंकून पिण्याच्या तयारीत आहे.