शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

‘जलदूत’ आजपासून पुन्हा

By admin | Updated: May 25, 2016 00:20 IST

वारणेच्या पाण्याची प्रतीक्षा : रेल्वे स्थानकासाठी पाणी उपसा

मिरज : म्हैसाळ योजना व जलदूत एक्स्प्रेस गेले पाच दिवस बंद आहे. वारणा धरणातून सोडलेले पाणी बुधवारी मिरजेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. नदीपात्रात पुरेसा पाणीसाठा झाल्यास सायंकाळी म्हैसाळ योजनेचे पंप व जलदूत एक्स्प्रेसद्वारे लातूरला पाणीपुरवठा पुन्हा सुरू होणार आहे. रेल्वे स्थानकात पाणी पुरवठ्यासाठी नदीपात्रात जॅकवेलजवळील गाळ जेसीबीच्या साहाय्याने काढून एका पंपाद्वारे पाणी उपसा सुरू करण्यात आला आहे. कृष्णा नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावल्याने गुरुवारपासून म्हैसाळ योजनेचे ६५ पंप बंद आहेत. मिरजेत कृष्णा घाटावर रेल्वेच्या पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलजवळ नदीपात्र कोरडे पडल्याने रेल्वेसाठी होणारा पाणी उपसा शुक्रवारपासून बंद झाला आहे. पाणी उपसा थांबल्याने गेले पाच दिवस दररोज लातूरला पाणी घेऊन जाणारी जलदूत एक्स्प्रेस थांबली आहे. बुधवारी नदीपात्रात पाणी आल्यास सायंकाळी जलदूत एक्स्प्रेस लातूरला जाण्याची शक्यता आहे. नदीपात्रात पाणीसाठा होण्यासाठी वारणा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा वेग कमी असल्याने, मिरजेत पाण्याची प्रतीक्षा सुरू आहे. म्हैसाळ योजना बंद पडल्याने म्हैसाळचे पंप कधी सुरु होणार, याची शेतकरी वाट पाहत आहेत. मिरजेतून लातूरला पाणीपुरवठा करणाऱ्या मिरज रेल्वे स्थानकाला व रेल्वे वसाहतीला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाईची ही स्थिती दोन दिवसांमध्ये बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. (वार्ताहर)रेल्वे स्थानकात पाणी टंचाई : प्रवाशांचे हाल मरजेतील हैदरखान विहिरीतही पाणी नसल्याने रेल्वे स्थानकात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. रेल्वे गाड्यांत पुणे स्थानकावरच पाणी भरण्यात येत असून मिरज स्थानकात प्लॅटफॉर्मवरील नळाचे पाणी बंद झाल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. नदीत उपलब्ध असलेले पाणी एका मोटारीद्वारे उपसा करुन रेल्वे स्थानकास पाणी पुरवठ्याच्या प्रयत्न सुरू आहे. पाण्याअभावी रेल्वे स्थानकावर साचलेला मैला साफ करता आला नसल्याने स्थानक परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.