शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

देशाची स्थिती बदलायला तरुण रक्त कृतिशील हवे, डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केले मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 16:04 IST

'शेती संपली तर देश संपेल'

मिरज : देशातील सद्य:स्थिती बदलायची असेल तर नागरिकांनी उदासीन राहून चालणार नाही, तरुण रक्त कृतिशील होणे आवश्यक आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केले.रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांच्या हस्ते रामकृष्ण मोरे जीवनगौरव पुरस्कार डॉ. भवाळकर व कृषितज्ज्ञ प्रा. डॉ. बुधाजीराव मुळीक यांना कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. भारती विद्यापीठाच्या सभागृहात सोहळा पार पडला. यावेळी आमदार विश्वजीत कदम, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, पुरस्कार समितीचे राजीव जगताप, माजी आमदार दिलीप ढमढेरे, हरी चिकणे, सचिन बऱ्हाटे, माधवी पाटील, संजय बालगुडे, मंदार चिकणे, नाथाभाऊ कुदळे उपस्थित होते.तारा भवाळकर म्हणाल्या, बोली हा प्रकार मन व मेंदू मोकळे करतो. जगणे व पुस्तकी सिद्धांत यात आदानप्रदान राहिले तरच जगण्यातील गुंता सुटू शकतो. जगण्यातील सत्य व श्रमसंस्कृती सांगत संतांनी कर्मकांडाचा निषेध केला आहे. दक्षिण-उत्तर संस्कृती एकत्र आहे, त्यामुळे एकारलेपणाच्या आहारी न जाता समतोल ठेवला पाहिजे. लोक साहित्यातील ओवीत जगण्याला भिडणारा आशय आहे. ओव्यांमध्ये सामाजिक इतिहास व मोठे समाजशास्त्र आहे.

शेती संपली तर देश संपेलडॉ. बुधाजीराव मुळीक म्हणाले, शेती संपली तर देश संपेल. देशात जमीन शेतकऱ्यांमुळेच शिल्लक आहे. यापुढे अर्बन ॲग्रिकल्चर आल्याने भिंतीवर शेती दिसेल. आज शेतकरी आत्महत्या करीत आहेत, यावर धोरणाची गरज आहे. उत्पादन खर्चावर आधारित कायदा आवश्यक आहे. जनता बोलत नाही म्हणून राज्यकर्त्यांचे फावते, त्यामुळे बोलायला शिका, असेही त्यांनी सांगितले.

लेखणीच्या सामर्थ्याची गरजज्येष्ठ कवी रामदास फुटाणे म्हणाले, तारा भवाळकर यांनी मराठी साहित्य संमेलनात माणुसकीच्या जाणिवांची जाणीव राजकारण्यांना करून दिली. साहित्य संमेलन टिंगलीचा विषय व ओवाळणी होऊ नये. साहित्यिकांच्या लेखणीच्या सामर्थ्याची देशाला व महाराष्ट्राला गरज आहे. तुम्ही बोलत नाही तोपर्यंत प्रश्न सुटणार नाहीत. आत्मा सांगतो ते बोलले व लिहले पाहिजे, हे तारा भवाळकर यांच्याकडून आम्ही शिकलो.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरज