शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
2
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
3
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
4
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
6
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
7
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
8
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
9
रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
10
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
11
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
12
२१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ठरणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ना केव्हा मिळणार लाभ?
13
विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले
14
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
15
प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
16
क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला
17
चॅटजीपीटीचा वापर करून २ बहिणींनी केली कमाल; वाचवले तब्बल १० हजार डॉलर्स
18
‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!
19
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
20
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत

देशाची स्थिती बदलायला तरुण रक्त कृतिशील हवे, डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केले मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 16:04 IST

'शेती संपली तर देश संपेल'

मिरज : देशातील सद्य:स्थिती बदलायची असेल तर नागरिकांनी उदासीन राहून चालणार नाही, तरुण रक्त कृतिशील होणे आवश्यक आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केले.रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांच्या हस्ते रामकृष्ण मोरे जीवनगौरव पुरस्कार डॉ. भवाळकर व कृषितज्ज्ञ प्रा. डॉ. बुधाजीराव मुळीक यांना कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. भारती विद्यापीठाच्या सभागृहात सोहळा पार पडला. यावेळी आमदार विश्वजीत कदम, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, पुरस्कार समितीचे राजीव जगताप, माजी आमदार दिलीप ढमढेरे, हरी चिकणे, सचिन बऱ्हाटे, माधवी पाटील, संजय बालगुडे, मंदार चिकणे, नाथाभाऊ कुदळे उपस्थित होते.तारा भवाळकर म्हणाल्या, बोली हा प्रकार मन व मेंदू मोकळे करतो. जगणे व पुस्तकी सिद्धांत यात आदानप्रदान राहिले तरच जगण्यातील गुंता सुटू शकतो. जगण्यातील सत्य व श्रमसंस्कृती सांगत संतांनी कर्मकांडाचा निषेध केला आहे. दक्षिण-उत्तर संस्कृती एकत्र आहे, त्यामुळे एकारलेपणाच्या आहारी न जाता समतोल ठेवला पाहिजे. लोक साहित्यातील ओवीत जगण्याला भिडणारा आशय आहे. ओव्यांमध्ये सामाजिक इतिहास व मोठे समाजशास्त्र आहे.

शेती संपली तर देश संपेलडॉ. बुधाजीराव मुळीक म्हणाले, शेती संपली तर देश संपेल. देशात जमीन शेतकऱ्यांमुळेच शिल्लक आहे. यापुढे अर्बन ॲग्रिकल्चर आल्याने भिंतीवर शेती दिसेल. आज शेतकरी आत्महत्या करीत आहेत, यावर धोरणाची गरज आहे. उत्पादन खर्चावर आधारित कायदा आवश्यक आहे. जनता बोलत नाही म्हणून राज्यकर्त्यांचे फावते, त्यामुळे बोलायला शिका, असेही त्यांनी सांगितले.

लेखणीच्या सामर्थ्याची गरजज्येष्ठ कवी रामदास फुटाणे म्हणाले, तारा भवाळकर यांनी मराठी साहित्य संमेलनात माणुसकीच्या जाणिवांची जाणीव राजकारण्यांना करून दिली. साहित्य संमेलन टिंगलीचा विषय व ओवाळणी होऊ नये. साहित्यिकांच्या लेखणीच्या सामर्थ्याची देशाला व महाराष्ट्राला गरज आहे. तुम्ही बोलत नाही तोपर्यंत प्रश्न सुटणार नाहीत. आत्मा सांगतो ते बोलले व लिहले पाहिजे, हे तारा भवाळकर यांच्याकडून आम्ही शिकलो.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरज