शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

देशाची स्थिती बदलायला तरुण रक्त कृतिशील हवे, डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केले मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 16:04 IST

'शेती संपली तर देश संपेल'

मिरज : देशातील सद्य:स्थिती बदलायची असेल तर नागरिकांनी उदासीन राहून चालणार नाही, तरुण रक्त कृतिशील होणे आवश्यक आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केले.रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांच्या हस्ते रामकृष्ण मोरे जीवनगौरव पुरस्कार डॉ. भवाळकर व कृषितज्ज्ञ प्रा. डॉ. बुधाजीराव मुळीक यांना कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. भारती विद्यापीठाच्या सभागृहात सोहळा पार पडला. यावेळी आमदार विश्वजीत कदम, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, पुरस्कार समितीचे राजीव जगताप, माजी आमदार दिलीप ढमढेरे, हरी चिकणे, सचिन बऱ्हाटे, माधवी पाटील, संजय बालगुडे, मंदार चिकणे, नाथाभाऊ कुदळे उपस्थित होते.तारा भवाळकर म्हणाल्या, बोली हा प्रकार मन व मेंदू मोकळे करतो. जगणे व पुस्तकी सिद्धांत यात आदानप्रदान राहिले तरच जगण्यातील गुंता सुटू शकतो. जगण्यातील सत्य व श्रमसंस्कृती सांगत संतांनी कर्मकांडाचा निषेध केला आहे. दक्षिण-उत्तर संस्कृती एकत्र आहे, त्यामुळे एकारलेपणाच्या आहारी न जाता समतोल ठेवला पाहिजे. लोक साहित्यातील ओवीत जगण्याला भिडणारा आशय आहे. ओव्यांमध्ये सामाजिक इतिहास व मोठे समाजशास्त्र आहे.

शेती संपली तर देश संपेलडॉ. बुधाजीराव मुळीक म्हणाले, शेती संपली तर देश संपेल. देशात जमीन शेतकऱ्यांमुळेच शिल्लक आहे. यापुढे अर्बन ॲग्रिकल्चर आल्याने भिंतीवर शेती दिसेल. आज शेतकरी आत्महत्या करीत आहेत, यावर धोरणाची गरज आहे. उत्पादन खर्चावर आधारित कायदा आवश्यक आहे. जनता बोलत नाही म्हणून राज्यकर्त्यांचे फावते, त्यामुळे बोलायला शिका, असेही त्यांनी सांगितले.

लेखणीच्या सामर्थ्याची गरजज्येष्ठ कवी रामदास फुटाणे म्हणाले, तारा भवाळकर यांनी मराठी साहित्य संमेलनात माणुसकीच्या जाणिवांची जाणीव राजकारण्यांना करून दिली. साहित्य संमेलन टिंगलीचा विषय व ओवाळणी होऊ नये. साहित्यिकांच्या लेखणीच्या सामर्थ्याची देशाला व महाराष्ट्राला गरज आहे. तुम्ही बोलत नाही तोपर्यंत प्रश्न सुटणार नाहीत. आत्मा सांगतो ते बोलले व लिहले पाहिजे, हे तारा भवाळकर यांच्याकडून आम्ही शिकलो.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरज