शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

कालचे शत्रू झाले आजचे कट्टर मित्र!

By admin | Updated: September 17, 2016 23:59 IST

महापालिकेतील स्थिती : एकमेकांवरील कुरघोड्यांमुळे शहराच्या विकासाचा बाजार

शीतल पाटील -- सांगली --महापालिकेचे राजकारण सध्या इतके गुंतागुंतीचे झाले आहे की, कोण कोणाचा मित्र आणि कोण कोणाचा शत्रू हेही ओळखणे अशक्य आहे. कधीकाळी एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारे आता विरोधक म्हणवून घेत आहेत, तर एकमेकांना पाण्यात पाहणारे सत्तेचे लाभार्थी झाले आहेत. पालिकेच्या या बिग बझार राजकारणामुळे विकासाचा बाजार झाला आहे. त्यातून सत्ताधारी, विरोधक आणि नगरसेवकांची प्रशासनावरील पकड ढिली होत आहे. त्याचे परिणाम सर्वसामान्य सांगलीकरांना भोगावे लागत आहेत. महापालिकेच्या स्थापनेपासूनच राजकारणाचे वारे सातत्याने बदलले आहे. पण गेल्या दहा वर्षात त्यात वेगाने बदल झाले. मदन पाटील यांच्या चाळीस वर्षाच्या सत्तेला शह देण्यासाठी आमदार जयंत पाटील यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून विरोधकांची मोट बांधली. राजारामबापू पाटील यांचे शिष्य असलेले संभाजी पवार, शरद पाटील ही मंडळीही एकत्र आली. डाव्या, उजव्या विचारांना एकत्र करून जयंतरावांनी पालिकेची सत्ता हस्तगत केली खरी, पण अल्पावधीतच पालिकेतील महत्त्वाकांक्षी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या सत्तेलाही सुरूंग लावला. पाच वर्षानंतर पुन्हा मदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची सत्ता आली. पण त्यांच्या निधनानंतर मात्र आता अनेकांना पालिकेचे नेतृत्व करण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाली आहे. त्यातून काँग्रेसमध्ये महापौर विरूद्ध उपमहापौर असे गट निर्माण झाले. खऱ्याअर्थाने हे दोन्ही गट नावालाच आहेत. यामागे वसंतदादा घराण्यातील छुपा राजकीय संघर्षच नव्याने समोर येत असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. मदनभाऊ समर्थक विरूद्ध विशाल पाटील समर्थक अशी नवी लढाई पालिकेच्या राजकारणात सुरू आहे. सत्ताधारी काँग्रेसमध्ये शकले झाली असतानाच, इतर पक्षांची अवस्थाही तशीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर १७ जण निवडून आले. त्यांना सहा अपक्षांनी पाठिंबा दिला. आता चिन्हावर निवडून आलेल्यांपैकी काहीजण दुसऱ्या गटाच्या वळचणीला गेले आहेत, तर पाठिंबा देणाऱ्या अपक्षांपैकी चारजणांनी भाजपला जवळ केले आहे. स्वाभिमानी आघाडीचे ९ सदस्य निवडून आले. त्यातील तीन नगरसेवकांनी भाजप म्हणून स्वतंत्र काम सुरू केले आहे. उर्वरित सहा जणांमध्ये संभाजी पवार समर्थक तीन, तर रिपाइं, मनसे व जनता दलाचा प्रत्येकी एक नगरसेवक आहे. पवार समर्थकांचे नेतृत्व गौतम पवार यांच्याकडे आहे. उर्वरित तीन नगरसेवक सोयीची भूमिका घेतात. वसंतदादा घराणे व संभाजी पवार यांच्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे. पण गेल्या वर्षभरात विशाल पाटील व संभाजी पवार समर्थकांची पालिकेत गट्टी जमली आहे. तशी ही युती म्हणे छुपी होती, आता ती उघड झाली आहे.महापालिकेच्या राजकारणात सध्या नीतिमत्तेची चाड कुणालाच राहिलेली नाही. पक्षांतरबंदी कायद्याचा उपयोग झाल्याचे दिसत नाही. पक्षाचा व्हीप, आदेश मोडूनही नगरसेवक काम करू लागल्याने धाक राहिलेला नाही. पक्षाच्या व्यासपीठाचा उपयोग करून नगरसेवकपद उपभोगता येते, पक्षात राहून सत्ताधाऱ्यांना मदत करण्याची खेळी खेळता येते व आपली स्वत:ची पोळी भाजून घेता येते. याशिवाय गेले काही महिने जे सत्तांतर चालले आहे, ते तर भयानक आहे. कोणताच राजकीय पक्ष तत्त्वनिष्ठ राहिलेला नाही. राजकीय पक्षांत सुरू असलेली चढाओढ पाहता, लोकांना त्याची किळस येत आहे. राष्ट्रवादीची : मदनभाऊ गटाला छुपी रसदविशाल पाटील व संभाजी पवार यांच्यातील नव्या युतीमुळे काँग्रेसमधील मदन पाटील गट एकाकी पडला होता. पण या गटाच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेस धावून येत आहे. जिल्हा बँक व मार्केट कमिटीच्या निवडणुकांत राजकीय प्रतिस्पर्धी असलेले जयंत पाटील व मदन पाटील एकत्र आले होते. मदनभाऊंच्या पश्चात राष्ट्रवादीने या गटाला कधी उघड, तर कधी छुपी रसद पुरविली आहे. त्यामुळेच पालिकेतील मदनभाऊ गटाची वाटचाल आजअखेर सुकर झाली आहे.अधिकाऱ्यांचे विकास कामांकडे दुर्लक्षराजकीय पक्षांतील कुरघोड्यांमुळे प्रशासनाचे मात्र फावले आहे. एकमेकांवर ढकलून, कामच न करण्याची प्रवृत्ती अधिकाऱ्यांत वाढत आहे. एखादा विषय मंजूर झाला तरी, कोणी विरोध केला म्हणून त्याची अंमलबजावणी लांबणीवर टाकली जात आहे. यातून सर्वसामान्य जनतेला मात्र त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील पाणीपुरवठा, ड्रेनेज योजनेची वाट लागली आहे. रस्ते खड्डेमय झाले आहेत. स्वच्छता, कचरा उठाव दिसत नाही. गटारी तुंबल्या आहेत. डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. अशा कित्येक समस्या पालिकेसमोर आव्हान बनून आहेत. पण राजकीय संघर्षामुळे प्रशासनाला जाब विचारण्याची सत्ताधारी, विरोधकांची हिम्मतच संपली आहे. प्रशासनावरील पकड ढिली झाल्याने नागरी समस्या जैसे थेच आहेत.