शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

यंदा पावसाचा अंदाज ठरला खरा; गाढवाने तारले, कोल्हाही मदतीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : हवामानाचा अंदाज नेहमी चुकतोच कसा, असा सवाल वारंवार उपस्थित होत असतो; मात्र यंदा हवामानाचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : हवामानाचा अंदाज नेहमी चुकतोच कसा, असा सवाल वारंवार उपस्थित होत असतो; मात्र यंदा हवामानाचा अंदाज सांगली जिल्ह्यासाठी तंतोतंत खरा ठरला आहे. मान्सूनची वेळेत व दमदार सुरुवात झाल्याने सधन तसेच दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात २२ जूनअखेर ४८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, उर्वरित क्षेत्रात पेरण्यांची लगबग सुरू आहे.

मृग नक्षत्रात सूर्याचा प्रवेश होऊन मान्सूनला जोरदार सुरुवात झाली. या नक्षत्राचे वाहन गाढव होते. यात शेतकऱ्यांना अपेक्षेहून चांगला पाऊस लाभला. २१ जूनपासून सूर्य आर्द्रा नक्षत्रात आला असून, त्याचे वाहन कोल्हा आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार या नक्षत्रातही चांगल्या पावसाची चिन्हे आहेत. त्यामुळे सुरुवातीची ही दोन्ही नक्षत्रे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सध्या शेती क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. दुष्काळी भागातही यंदा चांगला पाऊस झाला आहे.

कोट

गेल्या अनेक वर्षात जूनमध्ये पाऊस हुलकावणी देत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागत असे. यंदा हवामान खात्याचा अंदाज अचूक ठरला आणि पेरण्यांसाठी पोषक वातावरण झाले आहे.

- अशोक खाडे, शेतकरी कवठेएकंद, ता. तासगाव.

कोट

गेल्या दोन वर्षांपासून पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. यंदाही वेळेत चांगला पाऊस झाल्याने गावात जवळपास ४५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. उर्वरित पेरण्याही लवकरच पूर्ण होतील. त्यामुळे यंदा चांगल्या पिकाची आशा आहे.

- अमोल पाटील, शेतकरी, बस्तवडे, ता. तासगाव.

कोट

पावसामुळे यावेळी आमच्या गावात ६० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आगामी काळातही चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. दुष्काळी भाग असल्याने बऱ्याचदा सुरुवात चांगली होऊन पाऊस दडी मारतो. यंदा तसे होऊ नये, असे वाटते.

- शशिकांत काळगे, रामापूर, ता. जत.

कोट

यावेळी चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांना पेरण्यांसाठी पाेषक वातावरण मिळाले आहे. सध्या सुमारे ४८ टक्के पेरण्या झाल्या असून, उर्वरित क्षेत्रात जूनअखेर पेरण्या पूर्ण होतील, असा अंदाज आहे. यावेळी कडधान्यांचे उत्पादन जिल्ह्यात वाढण्याची चिन्हे आहेत.

- बसवराज मास्ताेळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली

चौकट

तालुकानिहाय पेरणी (हेक्टरमध्ये)

(२१ जूनपर्यंत)

मिरज १५६४

जत २८१९५

खानापूर १२२

वाळवा ९९१५

तासगाव ३५९

शिराळा २२२७२

आटपाडी १७०३

कवठेमहांकाळ ३०६८

पलूस १०४३

कडेगाव ५५४

चौकट

तालुकानिहाय एकूण पाऊस मि.मी.

मिरज १९१.४

जत १५५.८

खानापूर ७८.५

वाळवा २२१.८

तासगाव २१७

शिराळा २०४.९

आटपाडी ८५.८

कवठेमहांकाळ १२९.८

पलूस १९४.९

कडेगाव १६६.८

चौकट

जिल्ह्यात क्षेत्र व पेरण्या

खरिपाचे क्षेत्र २,७७,६८६

आजअखेर अंदाजे १,३५,०००