शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

यंदा पावसाचा अंदाज ठरला खरा; गाढवाने तारले, कोल्हाही मदतीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : हवामानाचा अंदाज नेहमी चुकतोच कसा, असा सवाल वारंवार उपस्थित होत असतो; मात्र यंदा हवामानाचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : हवामानाचा अंदाज नेहमी चुकतोच कसा, असा सवाल वारंवार उपस्थित होत असतो; मात्र यंदा हवामानाचा अंदाज सांगली जिल्ह्यासाठी तंतोतंत खरा ठरला आहे. मान्सूनची वेळेत व दमदार सुरुवात झाल्याने सधन तसेच दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात २२ जूनअखेर ४८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, उर्वरित क्षेत्रात पेरण्यांची लगबग सुरू आहे.

मृग नक्षत्रात सूर्याचा प्रवेश होऊन मान्सूनला जोरदार सुरुवात झाली. या नक्षत्राचे वाहन गाढव होते. यात शेतकऱ्यांना अपेक्षेहून चांगला पाऊस लाभला. २१ जूनपासून सूर्य आर्द्रा नक्षत्रात आला असून, त्याचे वाहन कोल्हा आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार या नक्षत्रातही चांगल्या पावसाची चिन्हे आहेत. त्यामुळे सुरुवातीची ही दोन्ही नक्षत्रे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सध्या शेती क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. दुष्काळी भागातही यंदा चांगला पाऊस झाला आहे.

कोट

गेल्या अनेक वर्षात जूनमध्ये पाऊस हुलकावणी देत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागत असे. यंदा हवामान खात्याचा अंदाज अचूक ठरला आणि पेरण्यांसाठी पोषक वातावरण झाले आहे.

- अशोक खाडे, शेतकरी कवठेएकंद, ता. तासगाव.

कोट

गेल्या दोन वर्षांपासून पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. यंदाही वेळेत चांगला पाऊस झाल्याने गावात जवळपास ४५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. उर्वरित पेरण्याही लवकरच पूर्ण होतील. त्यामुळे यंदा चांगल्या पिकाची आशा आहे.

- अमोल पाटील, शेतकरी, बस्तवडे, ता. तासगाव.

कोट

पावसामुळे यावेळी आमच्या गावात ६० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आगामी काळातही चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. दुष्काळी भाग असल्याने बऱ्याचदा सुरुवात चांगली होऊन पाऊस दडी मारतो. यंदा तसे होऊ नये, असे वाटते.

- शशिकांत काळगे, रामापूर, ता. जत.

कोट

यावेळी चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांना पेरण्यांसाठी पाेषक वातावरण मिळाले आहे. सध्या सुमारे ४८ टक्के पेरण्या झाल्या असून, उर्वरित क्षेत्रात जूनअखेर पेरण्या पूर्ण होतील, असा अंदाज आहे. यावेळी कडधान्यांचे उत्पादन जिल्ह्यात वाढण्याची चिन्हे आहेत.

- बसवराज मास्ताेळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली

चौकट

तालुकानिहाय पेरणी (हेक्टरमध्ये)

(२१ जूनपर्यंत)

मिरज १५६४

जत २८१९५

खानापूर १२२

वाळवा ९९१५

तासगाव ३५९

शिराळा २२२७२

आटपाडी १७०३

कवठेमहांकाळ ३०६८

पलूस १०४३

कडेगाव ५५४

चौकट

तालुकानिहाय एकूण पाऊस मि.मी.

मिरज १९१.४

जत १५५.८

खानापूर ७८.५

वाळवा २२१.८

तासगाव २१७

शिराळा २०४.९

आटपाडी ८५.८

कवठेमहांकाळ १२९.८

पलूस १९४.९

कडेगाव १६६.८

चौकट

जिल्ह्यात क्षेत्र व पेरण्या

खरिपाचे क्षेत्र २,७७,६८६

आजअखेर अंदाजे १,३५,०००