शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: ३० सप्टेंबरपर्यंत मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेणार, सरकारने लेखी दिले: मनोज जरांगे पाटील
2
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
3
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
4
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
5
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
6
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
7
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
8
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
9
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
10
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
11
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
12
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
13
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
14
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
15
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
16
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
17
Ganesh Visarjan: गौरी-गणपतीच्या निरोपासाठी जय्यत तयारी
18
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
19
अवनीत कौरने विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्ट लाइकवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कधीच विसरत नाही..."
20
"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट

World Population Day: सांगली जिल्ह्याची लोकसंख्या १४ वर्षात केवळ चार लाखाने वाढली

By अविनाश कोळी | Updated: July 11, 2025 19:31 IST

जिल्ह्यातील आधार कार्डधारकांची संख्या ३२ लाख १६ हजारांवर : लोकसंख्येत मिरज तालुका आघाडीवर

अविनाश कोळीसांगली : देशातील जनगणना चार वर्षांपासून रेंगाळली असली तरी आधार कार्डधारकांच्या संख्येनुसार जिल्ह्याच्या लोकसंख्येचा व वाढीचा अंदाज बांधला जाऊ शकतो. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाख २२ हजार १४३ इतकी होती. २०२५ मध्ये आधार कार्डधारकांची संख्या तब्बल ३२ लाख १६ हजार ९२१ इतकी आहे. त्यामुळे मागील १४ वर्षात लोकसंख्येत सुमारे चार लाखाची वाढ झाल्याचे दिसून येते. मागील पन्नास वर्षातील दशकवाढीचा विचार करता ही वाढ काहीअंशी कमी दिसून येत आहे.देशात २०२१ची जनगणना झाली नाही. तरीही आधार कार्डांच्या संख्येवरून लोकसंख्येचा अंदाज येतो. जन्मलेल्या बाळापासून आता आधार नोंदणी सुरू झाल्याने बहुतांशी प्रमाणात अंदाज खरा ठरू शकतो. जिल्ह्यातील १९७१ ते २०२५ पर्यंतच्या आकडेवारीचा अभ्यास केला तर नागरीकरणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचेही दिसून आले आहे. दोन किंवा एका मुलावर शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाणही वाढत आहे. मागील ५४ वर्षात सर्वात कमी लोकसंख्या वाढ २००१ ते २०११ या दशकात नोंदली गेली आहे.

जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्यावर्ष  - लोकसंख्या (लाखात)१९७१ - १५.४०१९८१ - १८.३४१९९१ - २२.०९२००१ - २५.८३२०११ - २८.२२

दशकानुसार लोकसंख्या वाढदशक -  वाढलेली लोकसंख्या१९७१ ते ८१ - २.९४ लाख१९८१ ते ९१ - ३.७५ लाख१९९१ ते २००१ - ३.७४ लाख२००१ ते २०११ - २.३९ लाख२०११ ते २०२५ - ३.९४ लाख२०११ ते २०२५ या कालावधीतील वाढीचा आकडा आधार कार्ड संख्येनुसार अंदाजित आहे.

तालुकानिहाय आधार कार्डधारकमिरज - १०,४६,६९७वाळवा - ४,५६,६१३जत  - ३,८०,८५४तासगाव - २,५८,५८९पलूस - २,१३,४५०खानापूर - २,१७,९४१क. महांकाळ - १,७८,६६०आटपाडी - १,७१,०६३कडेगाव - १,०७,११९शिराळा - १,८५,३६३

  • १८ वर्षांवरील महिलांची संख्या ३९.२१ टक्के
  • १८ वर्षांवरील पुरुषांची संख्या ४०.८४ टक्के
  • ५ ते १८ वर्षे वयोगटातील संख्या १७.५६
  • ५ वर्षांखालील संख्या १.२१
  • तृतीयपंथी संख्या ०.९

मिरज तालुक्याची लोकसंख्या अधिकतालुकानिहाय आधार कार्डधारकांची संख्या पाहता मिरज तालुक्याची लोकसंख्या अधिक दिसते. २०११च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची सर्वाधिक घनताही मिरजेच्या शहरी भागात तब्बल ४ हजार २१ प्रतिचौरस किलोमीटर नोंदली होती, तर सर्वात कमी घनता जत तालुक्यात १४७ इतकी नोंदली गेली होती.