शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

World Population Day: सांगली जिल्ह्याची लोकसंख्या १४ वर्षात केवळ चार लाखाने वाढली

By अविनाश कोळी | Updated: July 11, 2025 19:31 IST

जिल्ह्यातील आधार कार्डधारकांची संख्या ३२ लाख १६ हजारांवर : लोकसंख्येत मिरज तालुका आघाडीवर

अविनाश कोळीसांगली : देशातील जनगणना चार वर्षांपासून रेंगाळली असली तरी आधार कार्डधारकांच्या संख्येनुसार जिल्ह्याच्या लोकसंख्येचा व वाढीचा अंदाज बांधला जाऊ शकतो. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाख २२ हजार १४३ इतकी होती. २०२५ मध्ये आधार कार्डधारकांची संख्या तब्बल ३२ लाख १६ हजार ९२१ इतकी आहे. त्यामुळे मागील १४ वर्षात लोकसंख्येत सुमारे चार लाखाची वाढ झाल्याचे दिसून येते. मागील पन्नास वर्षातील दशकवाढीचा विचार करता ही वाढ काहीअंशी कमी दिसून येत आहे.देशात २०२१ची जनगणना झाली नाही. तरीही आधार कार्डांच्या संख्येवरून लोकसंख्येचा अंदाज येतो. जन्मलेल्या बाळापासून आता आधार नोंदणी सुरू झाल्याने बहुतांशी प्रमाणात अंदाज खरा ठरू शकतो. जिल्ह्यातील १९७१ ते २०२५ पर्यंतच्या आकडेवारीचा अभ्यास केला तर नागरीकरणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचेही दिसून आले आहे. दोन किंवा एका मुलावर शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाणही वाढत आहे. मागील ५४ वर्षात सर्वात कमी लोकसंख्या वाढ २००१ ते २०११ या दशकात नोंदली गेली आहे.

जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्यावर्ष  - लोकसंख्या (लाखात)१९७१ - १५.४०१९८१ - १८.३४१९९१ - २२.०९२००१ - २५.८३२०११ - २८.२२

दशकानुसार लोकसंख्या वाढदशक -  वाढलेली लोकसंख्या१९७१ ते ८१ - २.९४ लाख१९८१ ते ९१ - ३.७५ लाख१९९१ ते २००१ - ३.७४ लाख२००१ ते २०११ - २.३९ लाख२०११ ते २०२५ - ३.९४ लाख२०११ ते २०२५ या कालावधीतील वाढीचा आकडा आधार कार्ड संख्येनुसार अंदाजित आहे.

तालुकानिहाय आधार कार्डधारकमिरज - १०,४६,६९७वाळवा - ४,५६,६१३जत  - ३,८०,८५४तासगाव - २,५८,५८९पलूस - २,१३,४५०खानापूर - २,१७,९४१क. महांकाळ - १,७८,६६०आटपाडी - १,७१,०६३कडेगाव - १,०७,११९शिराळा - १,८५,३६३

  • १८ वर्षांवरील महिलांची संख्या ३९.२१ टक्के
  • १८ वर्षांवरील पुरुषांची संख्या ४०.८४ टक्के
  • ५ ते १८ वर्षे वयोगटातील संख्या १७.५६
  • ५ वर्षांखालील संख्या १.२१
  • तृतीयपंथी संख्या ०.९

मिरज तालुक्याची लोकसंख्या अधिकतालुकानिहाय आधार कार्डधारकांची संख्या पाहता मिरज तालुक्याची लोकसंख्या अधिक दिसते. २०११च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची सर्वाधिक घनताही मिरजेच्या शहरी भागात तब्बल ४ हजार २१ प्रतिचौरस किलोमीटर नोंदली होती, तर सर्वात कमी घनता जत तालुक्यात १४७ इतकी नोंदली गेली होती.