शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
3
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
4
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
5
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
7
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
8
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
9
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
10
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
11
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
12
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
13
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
14
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
15
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
16
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
17
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
18
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
19
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
20
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव

भाजप सरकारकडून कष्टकरी, शेतकऱ्यांचा विश्वासघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2016 00:19 IST

जयंत पाटील : कुची येथे जि. प. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

कवठेमहांकाळ : शेतकरी, कष्टकरी जनतेला खोटी आश्वासने देऊन भाजप सरकार सत्तेवर आले. सत्तेवर आल्यानंतर त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांपेक्षा उद्योजक, भांडवलदार त्यांना जवळचा वाटत आहे, अशी टीका विधिमंडळाचे गटनेते आमदार जयंत पाटील यांनी केली.कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे आर. आर. पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून बांधलेली पाण्याची टाकी, सभामंडप व जिल्हा परिषदेच्या नूतन सभापतींच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित पाटील, प्रा. भाऊसाहेब पाटील, सुनीता पाटील, कुसूम मोटे यांचा जयंत पाटील, आमदार सुमन पाटील यांच्याहस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, ‘महांकाली’चे अध्यक्ष विजयराव सगरे, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, गणपती सगरे, माजी सभापती गजानन कोठावळे, एम. के. पाटील आदी उपस्थित होते.जयंत पाटील पुढे म्हणाले की, जनतेला आश्वासने देत भाजप सरकार सत्तेवर आले आहे. मात्र राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना या सरकारने केवळ तीन छावण्या काढल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी आपली जनावरे कवडीमोल दराने विकली आहेत. तरीही हे शासन घोषणा करते, पण अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरले आहे. सरकार शेतकऱ्यांच्याबाबतीत आखडता हात घेत आहे. सत्तेतील सरकारला शेतकरी, कष्टकरी जनताच आता जागा दाखवेल, असा इशाराही त्यांनी दिला. आमदार सुमन पाटील म्हणाल्या, सरकारचे धोरण उदासीन आहे. मात्र मतदारसंघात तुम्ही विकास कामे सुचवा, ती आपण पूर्ण करू. तसेच मतदारसंघातील जनता राष्ट्रवादीच्या व आमच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, माजी सभापती सुरेखा कोळेकर, हणमंतराव देसाई, सभापती प्रा. भाऊसाहेब पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. पंचायत समितीचे उपसभापती जगन्नाथ कोळेकर, सरपंच लखन पवार, उपसरपंच परशुराम जाधव, जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत हाक्के, भानुदास पाटील, ताजुद्दीन तांबोळी, टी. व्ही. पाटील, नामदेव करगणे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)