शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

भाजप सरकारकडून कष्टकरी, शेतकऱ्यांचा विश्वासघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2016 00:19 IST

जयंत पाटील : कुची येथे जि. प. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

कवठेमहांकाळ : शेतकरी, कष्टकरी जनतेला खोटी आश्वासने देऊन भाजप सरकार सत्तेवर आले. सत्तेवर आल्यानंतर त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांपेक्षा उद्योजक, भांडवलदार त्यांना जवळचा वाटत आहे, अशी टीका विधिमंडळाचे गटनेते आमदार जयंत पाटील यांनी केली.कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे आर. आर. पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून बांधलेली पाण्याची टाकी, सभामंडप व जिल्हा परिषदेच्या नूतन सभापतींच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित पाटील, प्रा. भाऊसाहेब पाटील, सुनीता पाटील, कुसूम मोटे यांचा जयंत पाटील, आमदार सुमन पाटील यांच्याहस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, ‘महांकाली’चे अध्यक्ष विजयराव सगरे, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, गणपती सगरे, माजी सभापती गजानन कोठावळे, एम. के. पाटील आदी उपस्थित होते.जयंत पाटील पुढे म्हणाले की, जनतेला आश्वासने देत भाजप सरकार सत्तेवर आले आहे. मात्र राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना या सरकारने केवळ तीन छावण्या काढल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी आपली जनावरे कवडीमोल दराने विकली आहेत. तरीही हे शासन घोषणा करते, पण अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरले आहे. सरकार शेतकऱ्यांच्याबाबतीत आखडता हात घेत आहे. सत्तेतील सरकारला शेतकरी, कष्टकरी जनताच आता जागा दाखवेल, असा इशाराही त्यांनी दिला. आमदार सुमन पाटील म्हणाल्या, सरकारचे धोरण उदासीन आहे. मात्र मतदारसंघात तुम्ही विकास कामे सुचवा, ती आपण पूर्ण करू. तसेच मतदारसंघातील जनता राष्ट्रवादीच्या व आमच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, माजी सभापती सुरेखा कोळेकर, हणमंतराव देसाई, सभापती प्रा. भाऊसाहेब पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. पंचायत समितीचे उपसभापती जगन्नाथ कोळेकर, सरपंच लखन पवार, उपसरपंच परशुराम जाधव, जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत हाक्के, भानुदास पाटील, ताजुद्दीन तांबोळी, टी. व्ही. पाटील, नामदेव करगणे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)