शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारकडून कष्टकरी, शेतकऱ्यांचा विश्वासघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2016 00:19 IST

जयंत पाटील : कुची येथे जि. प. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

कवठेमहांकाळ : शेतकरी, कष्टकरी जनतेला खोटी आश्वासने देऊन भाजप सरकार सत्तेवर आले. सत्तेवर आल्यानंतर त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांपेक्षा उद्योजक, भांडवलदार त्यांना जवळचा वाटत आहे, अशी टीका विधिमंडळाचे गटनेते आमदार जयंत पाटील यांनी केली.कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे आर. आर. पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून बांधलेली पाण्याची टाकी, सभामंडप व जिल्हा परिषदेच्या नूतन सभापतींच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित पाटील, प्रा. भाऊसाहेब पाटील, सुनीता पाटील, कुसूम मोटे यांचा जयंत पाटील, आमदार सुमन पाटील यांच्याहस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, ‘महांकाली’चे अध्यक्ष विजयराव सगरे, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, गणपती सगरे, माजी सभापती गजानन कोठावळे, एम. के. पाटील आदी उपस्थित होते.जयंत पाटील पुढे म्हणाले की, जनतेला आश्वासने देत भाजप सरकार सत्तेवर आले आहे. मात्र राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना या सरकारने केवळ तीन छावण्या काढल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी आपली जनावरे कवडीमोल दराने विकली आहेत. तरीही हे शासन घोषणा करते, पण अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरले आहे. सरकार शेतकऱ्यांच्याबाबतीत आखडता हात घेत आहे. सत्तेतील सरकारला शेतकरी, कष्टकरी जनताच आता जागा दाखवेल, असा इशाराही त्यांनी दिला. आमदार सुमन पाटील म्हणाल्या, सरकारचे धोरण उदासीन आहे. मात्र मतदारसंघात तुम्ही विकास कामे सुचवा, ती आपण पूर्ण करू. तसेच मतदारसंघातील जनता राष्ट्रवादीच्या व आमच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, माजी सभापती सुरेखा कोळेकर, हणमंतराव देसाई, सभापती प्रा. भाऊसाहेब पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. पंचायत समितीचे उपसभापती जगन्नाथ कोळेकर, सरपंच लखन पवार, उपसरपंच परशुराम जाधव, जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत हाक्के, भानुदास पाटील, ताजुद्दीन तांबोळी, टी. व्ही. पाटील, नामदेव करगणे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)