शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

‘तासगाव’ चालविण्यासाठी कामगार, सभासद सरसावले

By admin | Updated: May 19, 2015 00:25 IST

हंगामाबाबत प्रश्नचिन्ह : राज्य सहकारी बँकेच्या अर्थसाहाय्याची गरज; पूर्वीचा अनुभव असल्याने पुढाकार

अशोक डोंबाळे -सांगली -तासगाव सहकारी साखर कारखाना एक वर्षाच्या मुदतीने चालविण्यासाठी सहकारी संस्था आणि उद्योजक पुढे येत नाहीत. त्यामुळे कारखान्याचे धुराडे सलग दोन वर्षे बंद पडल्यामुळे सभासद, कामगारांचे हाल झाले आहेत. २०१५-१६ वर्षाचा गळीत हंगामही सुरु होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे सभासद आणि कामगारांनी कारखाना चालू करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. कामगारांनी २००३-०४ मध्ये आर्थिक अडचणीवर मात करून गळीत हंगाम यशस्वी केला़ त्याच धर्तीवर ते कारखाना चालविण्यास तयार असून त्यासाठी राज्य बँकेने अर्थसाहाय्य करण्याची गरज असल्याचे कामगारांनी सांगितले.तासगाव कारखाना २००३-०४ मध्येही आर्थिक अडचणीत होता. कारखान्याचा गळीत हंगाम बंद राहिल्यास प्रश्न गंभीर होणार असल्यामुळे कामगारांनी पुढाकार घेऊन हंगाम सुरु केला. त्यावर्षी राज्य बँकेने वेळेवर कर्जपुरवठा केला नसतानाही तासगाव कारखान्यास १४ कोटींचे उत्पन्न मिळाले़ हजार-दोन हजाराच्या तुटपुंज्या पगारावर कामगार राबले़ उसाला अन्य कारखान्यांच्या बरोबरीने दर दिला़ कामगारांच्या या जिद्दीला सभासदांनीही सलाम ठोकला होता. मात्र दुसऱ्या हंगामाला राज्य बँकेने अर्थसाहाय्यच दिले नाही़ त्यामुळे २००४-०५ मध्ये पुन्हा कारखान्याचे धुराडे बंद राहिले़ राज्य बँकेच्या या भूमिकेवर कामगार नाराज आहेत़ २००५-०७ मध्ये कारखाना उगार शुगरकडे तीन कोटीच्या भाडेकराराने देण्यात आला़ त्यावेळी कारखान्याचे कर्ज ३४ कोटी होते़ आज तो बोजा १०८ कोटींवर गेला आहे़ हा बोजा वाढला की वाढविला, अशीही शंका व्यक्त होत आहे़तासगाव कारखाना राज्य बँकेच्या ताब्यात असून, श्री गणपती जिल्हा कृषी औद्योगिक संघाला १४ कोटी ५१ लाखांना तो विकला होता. हा विक्री व्यवहार रद्द करण्यासाठी कारखान्याच्या अवसायकांनी ऋण वसुली प्राधिकरण (डीआरटी) व उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. या निर्णयावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्यामुळे तासगाव कारखाना दीर्घ मुदतीच्या भाड्याने देता येत नसल्याचे बँकेचे म्हणणे आहे. म्हणूनच दरवर्षी राज्य बँकेकडून कारखाना चालविण्यासाठी एक वर्षाच्या मुदतीची निविदा प्रसिध्द होत होती. प्रत्यक्ष एक वर्षाच्या मुदतीने कारखाना चालविण्यास कुणीही पुढे येत नाही. यातूनच दोन वर्षापासून ऊसपट्ट्यातील तासगाव कारखान्याचे धुराडे बंद पडले आहे. कामगारांवर मजुरीला जाण्याची वेळ आली आहे. सलग दोन वर्षे गळीत हंगाम बंद राहिल्यामुळे कामगारांचे आर्थिक गणितच कोलमडले आहे. सभासदांचीही यापेक्षा वेगळी अवस्था नाही. तासगाव कारखान्याकडे २७ हजार सभासद संख्या असून त्यांना ऊस अन्य कारखान्यांकडे पाठविताना त्रास होतो. उसाचे वेळेवर गळीत होत नसून, पैसेही वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे सभासद, कामगारांच्या हितासाठी राज्य बँकेने पावले उचलावीत, अशी सभासद, कामगारांची मागणी आहे. सभासदांनी मनावर घेतल्यास क्षणात १३ कोटी जमा होतीलतासगाव कारखाना सभासद आणि कामगारांच्या हितासाठी चालू राहिला पाहिजे. कारखान्याची विक्री करून नव्हे, तर भाडेतत्त्वावरच तो चालला पाहिजे. राज्य बँकेने न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत दोन ते तीन वर्षाच्या दीर्घ मुदतीने कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यास काही हरकत नाही. तेही बँकेला जमत नसेल, तर त्यांनी सभासद, कामगारांकडे कारखाना चालू करण्यासाठी सोपविल्यास आम्ही गळीत हंगाम सुरु करू शकतो, असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व पलूस पंचायत समितीचे सदस्य संदीप राजोबा यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, सभासदांनी मनावर घेतल्यास १३ कोटींचा निधी क्षणात गोळा होऊ शकतो. सध्या सभासदांचे प्रत्येकी पाच हजार रुपयांचे समभाग (शेअर्स) आहेत. सहकार कायद्याच्या नवीन दुरुस्तीनुसार शेअर्सची किंमत प्रत्येकी दहा हजार झाली आहे. २७ हजार सभासदांकडून प्रत्येकी पाच हजार गोळा केल्यास १३ कोटी ५० लाख जमा होतील.सभासदांनी मनावर घेतल्यास क्षणात १३ कोटी जमा होतीलतासगाव कारखाना सभासद आणि कामगारांच्या हितासाठी चालू राहिला पाहिजे. कारखान्याची विक्री करून नव्हे, तर भाडेतत्त्वावरच तो चालला पाहिजे. राज्य बँकेने न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत दोन ते तीन वर्षाच्या दीर्घ मुदतीने कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यास काही हरकत नाही. तेही बँकेला जमत नसेल, तर त्यांनी सभासद, कामगारांकडे कारखाना चालू करण्यासाठी सोपविल्यास आम्ही गळीत हंगाम सुरु करू शकतो, असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व पलूस पंचायत समितीचे सदस्य संदीप राजोबा यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, सभासदांनी मनावर घेतल्यास १३ कोटींचा निधी क्षणात गोळा होऊ शकतो. सध्या सभासदांचे प्रत्येकी पाच हजार रुपयांचे समभाग (शेअर्स) आहेत. सहकार कायद्याच्या नवीन दुरुस्तीनुसार शेअर्सची किंमत प्रत्येकी दहा हजार झाली आहे. २७ हजार सभासदांकडून प्रत्येकी पाच हजार गोळा केल्यास १३ कोटी ५० लाख जमा होतील.