शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

‘तासगाव’ चालविण्यासाठी कामगार, सभासद सरसावले

By admin | Updated: May 19, 2015 00:25 IST

हंगामाबाबत प्रश्नचिन्ह : राज्य सहकारी बँकेच्या अर्थसाहाय्याची गरज; पूर्वीचा अनुभव असल्याने पुढाकार

अशोक डोंबाळे -सांगली -तासगाव सहकारी साखर कारखाना एक वर्षाच्या मुदतीने चालविण्यासाठी सहकारी संस्था आणि उद्योजक पुढे येत नाहीत. त्यामुळे कारखान्याचे धुराडे सलग दोन वर्षे बंद पडल्यामुळे सभासद, कामगारांचे हाल झाले आहेत. २०१५-१६ वर्षाचा गळीत हंगामही सुरु होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे सभासद आणि कामगारांनी कारखाना चालू करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. कामगारांनी २००३-०४ मध्ये आर्थिक अडचणीवर मात करून गळीत हंगाम यशस्वी केला़ त्याच धर्तीवर ते कारखाना चालविण्यास तयार असून त्यासाठी राज्य बँकेने अर्थसाहाय्य करण्याची गरज असल्याचे कामगारांनी सांगितले.तासगाव कारखाना २००३-०४ मध्येही आर्थिक अडचणीत होता. कारखान्याचा गळीत हंगाम बंद राहिल्यास प्रश्न गंभीर होणार असल्यामुळे कामगारांनी पुढाकार घेऊन हंगाम सुरु केला. त्यावर्षी राज्य बँकेने वेळेवर कर्जपुरवठा केला नसतानाही तासगाव कारखान्यास १४ कोटींचे उत्पन्न मिळाले़ हजार-दोन हजाराच्या तुटपुंज्या पगारावर कामगार राबले़ उसाला अन्य कारखान्यांच्या बरोबरीने दर दिला़ कामगारांच्या या जिद्दीला सभासदांनीही सलाम ठोकला होता. मात्र दुसऱ्या हंगामाला राज्य बँकेने अर्थसाहाय्यच दिले नाही़ त्यामुळे २००४-०५ मध्ये पुन्हा कारखान्याचे धुराडे बंद राहिले़ राज्य बँकेच्या या भूमिकेवर कामगार नाराज आहेत़ २००५-०७ मध्ये कारखाना उगार शुगरकडे तीन कोटीच्या भाडेकराराने देण्यात आला़ त्यावेळी कारखान्याचे कर्ज ३४ कोटी होते़ आज तो बोजा १०८ कोटींवर गेला आहे़ हा बोजा वाढला की वाढविला, अशीही शंका व्यक्त होत आहे़तासगाव कारखाना राज्य बँकेच्या ताब्यात असून, श्री गणपती जिल्हा कृषी औद्योगिक संघाला १४ कोटी ५१ लाखांना तो विकला होता. हा विक्री व्यवहार रद्द करण्यासाठी कारखान्याच्या अवसायकांनी ऋण वसुली प्राधिकरण (डीआरटी) व उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. या निर्णयावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्यामुळे तासगाव कारखाना दीर्घ मुदतीच्या भाड्याने देता येत नसल्याचे बँकेचे म्हणणे आहे. म्हणूनच दरवर्षी राज्य बँकेकडून कारखाना चालविण्यासाठी एक वर्षाच्या मुदतीची निविदा प्रसिध्द होत होती. प्रत्यक्ष एक वर्षाच्या मुदतीने कारखाना चालविण्यास कुणीही पुढे येत नाही. यातूनच दोन वर्षापासून ऊसपट्ट्यातील तासगाव कारखान्याचे धुराडे बंद पडले आहे. कामगारांवर मजुरीला जाण्याची वेळ आली आहे. सलग दोन वर्षे गळीत हंगाम बंद राहिल्यामुळे कामगारांचे आर्थिक गणितच कोलमडले आहे. सभासदांचीही यापेक्षा वेगळी अवस्था नाही. तासगाव कारखान्याकडे २७ हजार सभासद संख्या असून त्यांना ऊस अन्य कारखान्यांकडे पाठविताना त्रास होतो. उसाचे वेळेवर गळीत होत नसून, पैसेही वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे सभासद, कामगारांच्या हितासाठी राज्य बँकेने पावले उचलावीत, अशी सभासद, कामगारांची मागणी आहे. सभासदांनी मनावर घेतल्यास क्षणात १३ कोटी जमा होतीलतासगाव कारखाना सभासद आणि कामगारांच्या हितासाठी चालू राहिला पाहिजे. कारखान्याची विक्री करून नव्हे, तर भाडेतत्त्वावरच तो चालला पाहिजे. राज्य बँकेने न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत दोन ते तीन वर्षाच्या दीर्घ मुदतीने कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यास काही हरकत नाही. तेही बँकेला जमत नसेल, तर त्यांनी सभासद, कामगारांकडे कारखाना चालू करण्यासाठी सोपविल्यास आम्ही गळीत हंगाम सुरु करू शकतो, असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व पलूस पंचायत समितीचे सदस्य संदीप राजोबा यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, सभासदांनी मनावर घेतल्यास १३ कोटींचा निधी क्षणात गोळा होऊ शकतो. सध्या सभासदांचे प्रत्येकी पाच हजार रुपयांचे समभाग (शेअर्स) आहेत. सहकार कायद्याच्या नवीन दुरुस्तीनुसार शेअर्सची किंमत प्रत्येकी दहा हजार झाली आहे. २७ हजार सभासदांकडून प्रत्येकी पाच हजार गोळा केल्यास १३ कोटी ५० लाख जमा होतील.सभासदांनी मनावर घेतल्यास क्षणात १३ कोटी जमा होतीलतासगाव कारखाना सभासद आणि कामगारांच्या हितासाठी चालू राहिला पाहिजे. कारखान्याची विक्री करून नव्हे, तर भाडेतत्त्वावरच तो चालला पाहिजे. राज्य बँकेने न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत दोन ते तीन वर्षाच्या दीर्घ मुदतीने कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यास काही हरकत नाही. तेही बँकेला जमत नसेल, तर त्यांनी सभासद, कामगारांकडे कारखाना चालू करण्यासाठी सोपविल्यास आम्ही गळीत हंगाम सुरु करू शकतो, असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व पलूस पंचायत समितीचे सदस्य संदीप राजोबा यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, सभासदांनी मनावर घेतल्यास १३ कोटींचा निधी क्षणात गोळा होऊ शकतो. सध्या सभासदांचे प्रत्येकी पाच हजार रुपयांचे समभाग (शेअर्स) आहेत. सहकार कायद्याच्या नवीन दुरुस्तीनुसार शेअर्सची किंमत प्रत्येकी दहा हजार झाली आहे. २७ हजार सभासदांकडून प्रत्येकी पाच हजार गोळा केल्यास १३ कोटी ५० लाख जमा होतील.