शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

येळापूर ग्रामपंचायतीवर पाण्यासाठी महिलांचा घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:24 IST

कोकरुड : वार्षिक पाणीपट्टी वेळेत भरूनही आठ-आठ दिवस पाणी मिळत नसल्याने सय्यदवाडी (येळापूर, ता. शिराळा) येथील अण्णा भाऊ साठेनगरमधील ...

कोकरुड : वार्षिक पाणीपट्टी वेळेत भरूनही आठ-आठ दिवस पाणी मिळत नसल्याने सय्यदवाडी (येळापूर, ता. शिराळा) येथील अण्णा भाऊ साठेनगरमधील महिलांनी कळशी-घागरी घेत येळापूर ग्रामपंचायतीवर शुक्रवारी सकाळी मोर्चा काढला. सरपंच, उपसरपंच यांनी पाणी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा घागर मोर्चा मागे घेण्यात आला.

येळापूर ग्रामपंचायतीअंतर्गत नऊ वाड्या-वस्त्या आहेत. येळापूर वगळता सर्व ठिकाणी विस्तारित पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. सय्यदवाडी-कुंभवडेवाडी हा भाग वाॅर्ड तीनमध्ये येत असून या विभागाला मेणी ओढ्यात असणाऱ्या विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून या विहिरीने तळ गाठल्याने या ठिकाणी मोठी पाणीटंचाई जाणवू लागली आहे. यामुळे पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यातच आठ दिवसांनी येणारे पाणी अण्णा भाऊ साठेनगर येथे कमी दाबाने येत असल्याने अपुरे पाणी मिळत आहे. यामुळे संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला.

सय्यदवाडी-कुंभवडेवाडीला पाणी पुरवठा करणाऱ्या या योजनेच्या विहिरीत पाणीच नसल्याने नळाला पाणी सोडले जात नाही. जसे पाणी साचेल तसा पुरवठा केला जाणार असून थोड्‌याच दिवसात गणेश पाणी पुरवठा योजनेचे पाणी या विहिरीत सोडून पाणी देऊ.

- दिनकर दिंडे, उपसरपंच, येळापूर.

वाडीतील राजकारणामुळे मोठमोठे नागरिक पाणीपट्टी न भरता दोन-तीन कनेक्शनला घरात मोटारी लावून पाणी भरतात. यामुळे आम्हाला पाणी मिळत नाही. अशा नागरिकांवर ग्रामपंचायतीने कारवाई करावी.

- वजुबाई चांदणे, ग्रामस्थ, सय्यदवाडी