शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
2
US Tariffs Impact: ३० लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, अनेक कारखाने होतील बंद; ट्रम्प टॅरिफच्या भितीनं कोणी दिला हा इशारा?
3
डिसेंबरमध्ये 'बजाज-एथर'मध्ये चुरस रंगली! थोडक्यात संधी हुकली..., ओला स्कूटरची विक्री किती झाली? 
4
इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?
5
वर्षाची १३ नाही तर १० च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये...
6
जमिनीचे पैसे मिळताच बायकोने दिला नवऱ्याला धोका; लाखो रुपये, दागिने घेऊन बॉयफ्रेंडसोबत पसार
7
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
8
No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं
9
नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या
10
अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार...
11
"तुमच्या फील्डमध्ये नंबर १ कोण आहे?", रितेशच्या प्रश्नावर उत्तर देताना राधा पाटीलने गौतमीला डिवचलं, म्हणाली...
12
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
13
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
14
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
15
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
16
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
17
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
18
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
19
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
20
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

मजरेवाडीचा कारभार सरपंचांविनाच

By admin | Updated: January 21, 2015 23:58 IST

पाच वर्षांपासून अशीच स्थिती : निवडणूक अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; मागासवर्गीय समाज पदापासून वंचित

गणपती कोळी - कुरुंदवाड -मजरेवाडी (ता. शिरोळ) गावचा कारभार गेल्या पाच वर्षांपासून सरपंचांविनाच चालू आहे. सरपंचपद मागासवर्गीयांसाठी आरक्षित असताना प्रभागात मागासवर्गीय आरक्षण टाकले गेले नसल्याने या समाजाला आरक्षणाचा लाभ घेता आला नाही. त्यामुळे गेली पाच वर्षे गावचा कारभार उपसरपंचांवरच चालू असून, निवडणूक अधिकाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे मागासवर्गीय समाजाला सरपंचपदापासून वंचित राहावे लागल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.कुरुंदवाड शहरापासून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर कृष्णा नदीकाठी वसलेले अडीच हजार लोकवस्तीचे मजरेवाडी गाव आहे. गावामध्ये जैन समाजाची संख्या अधिक आहे. इतर समाजाची संख्या अत्यल्प आहे. समाजातील उपेक्षित घटकांनाही राजकारणात संधी मिळावी, यासाठी शासनाने मागासवर्गीयांसाठी आरक्षण दिले आहे. त्यानुसार निवडणुकीपूर्वी आरक्षण जाहीर केले जाते.येथील नऊ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीत शासनाच्या धोरणानुसार २०११ ला झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंचपद मागासवर्गीयांसाठी (बीसी) राखीव करण्यात आले. शंभरापर्यंत मतदार असलेल्या या समाजाला सरपंचपदाची संधी मिळणार असल्याने समाजात आनंद व्यक्त होत होता. या समाजातून उमेदवार मिळविण्यासाठी गटनेत्याचीही उमेदवार चाचपणी झाली. प्रभाग क्रमांक दोनमध्ये हा समाज आहे. मात्र, प्रभागनिहाय आरक्षणात मागासवर्गीय आरक्षण काढण्यात आले नाही. त्यामुळे सरपंचपद मागासवर्गीयांसाठी आरक्षण असूनही प्रभागात आरक्षणच नसल्याने राजकीय गटनेत्यांची गोची झाली.गावामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, कॉँग्रेस, राजेंद्र पाटील-यड्रावकर गट आहेत. गत निवडणुकीत स्वाभिमानी व कॉँग्रेस एकत्र येऊन यड्रावकर गटाविरोधात निवडणूक झाली. या निवडणुकीत यड्रावकर गटनेते लक्ष्मण चौगुले यांनी खुल्या प्रभागातून मागासवर्गीय उमेदवार दिला होता. मात्र, त्या उमेदवाराचा पराभव झाला, तर स्वाभिमानी व कॉँग्रेसला मागासवर्गीय उमेदवारच न मिळाल्याने व सरपंचपद मागासवर्गीयांसाठी राखीव असल्याने गेली पाच वर्षे गावचा कारभार सरपंचांविनाच चालू आहे.या उपेक्षित समाजाला गावचे नेतृत्व करण्यासाठी शासनाने आरक्षण दिले. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांच्या प्रभागनिहाय आरक्षण चुकीच्या निर्णयामुळे या समाजाला आरक्षणाचा लाभ न मिळाल्याने या समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सरपंचपद मागासवर्गीयांसाठी असल्याने प्रभागातही आरक्षण टाकणे गरजेचे होते. मात्र, प्रभाग आरक्षणात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आरक्षण न टाकल्याने त्याचवेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. समाजाच्या लोकसंख्येनुसार आरक्षण टाकण्यात येत असून, यावर कोणताही बदल करता येत नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याने आम्हाला काहीही करता आले नाही. या समाजावर मात्र अन्याय झाला आहे.- नंदकिशोर पाटील, गटनेता - स्वाभिमानी शेतकरी संघटना, मजरेवाडी.