शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
4
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
5
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
6
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
7
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
8
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
9
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
10
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
11
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
12
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
13
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
14
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
15
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
16
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
17
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
18
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

मजरेवाडीचा कारभार सरपंचांविनाच

By admin | Updated: January 21, 2015 23:58 IST

पाच वर्षांपासून अशीच स्थिती : निवडणूक अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; मागासवर्गीय समाज पदापासून वंचित

गणपती कोळी - कुरुंदवाड -मजरेवाडी (ता. शिरोळ) गावचा कारभार गेल्या पाच वर्षांपासून सरपंचांविनाच चालू आहे. सरपंचपद मागासवर्गीयांसाठी आरक्षित असताना प्रभागात मागासवर्गीय आरक्षण टाकले गेले नसल्याने या समाजाला आरक्षणाचा लाभ घेता आला नाही. त्यामुळे गेली पाच वर्षे गावचा कारभार उपसरपंचांवरच चालू असून, निवडणूक अधिकाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे मागासवर्गीय समाजाला सरपंचपदापासून वंचित राहावे लागल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.कुरुंदवाड शहरापासून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर कृष्णा नदीकाठी वसलेले अडीच हजार लोकवस्तीचे मजरेवाडी गाव आहे. गावामध्ये जैन समाजाची संख्या अधिक आहे. इतर समाजाची संख्या अत्यल्प आहे. समाजातील उपेक्षित घटकांनाही राजकारणात संधी मिळावी, यासाठी शासनाने मागासवर्गीयांसाठी आरक्षण दिले आहे. त्यानुसार निवडणुकीपूर्वी आरक्षण जाहीर केले जाते.येथील नऊ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीत शासनाच्या धोरणानुसार २०११ ला झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंचपद मागासवर्गीयांसाठी (बीसी) राखीव करण्यात आले. शंभरापर्यंत मतदार असलेल्या या समाजाला सरपंचपदाची संधी मिळणार असल्याने समाजात आनंद व्यक्त होत होता. या समाजातून उमेदवार मिळविण्यासाठी गटनेत्याचीही उमेदवार चाचपणी झाली. प्रभाग क्रमांक दोनमध्ये हा समाज आहे. मात्र, प्रभागनिहाय आरक्षणात मागासवर्गीय आरक्षण काढण्यात आले नाही. त्यामुळे सरपंचपद मागासवर्गीयांसाठी आरक्षण असूनही प्रभागात आरक्षणच नसल्याने राजकीय गटनेत्यांची गोची झाली.गावामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, कॉँग्रेस, राजेंद्र पाटील-यड्रावकर गट आहेत. गत निवडणुकीत स्वाभिमानी व कॉँग्रेस एकत्र येऊन यड्रावकर गटाविरोधात निवडणूक झाली. या निवडणुकीत यड्रावकर गटनेते लक्ष्मण चौगुले यांनी खुल्या प्रभागातून मागासवर्गीय उमेदवार दिला होता. मात्र, त्या उमेदवाराचा पराभव झाला, तर स्वाभिमानी व कॉँग्रेसला मागासवर्गीय उमेदवारच न मिळाल्याने व सरपंचपद मागासवर्गीयांसाठी राखीव असल्याने गेली पाच वर्षे गावचा कारभार सरपंचांविनाच चालू आहे.या उपेक्षित समाजाला गावचे नेतृत्व करण्यासाठी शासनाने आरक्षण दिले. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांच्या प्रभागनिहाय आरक्षण चुकीच्या निर्णयामुळे या समाजाला आरक्षणाचा लाभ न मिळाल्याने या समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सरपंचपद मागासवर्गीयांसाठी असल्याने प्रभागातही आरक्षण टाकणे गरजेचे होते. मात्र, प्रभाग आरक्षणात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आरक्षण न टाकल्याने त्याचवेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. समाजाच्या लोकसंख्येनुसार आरक्षण टाकण्यात येत असून, यावर कोणताही बदल करता येत नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याने आम्हाला काहीही करता आले नाही. या समाजावर मात्र अन्याय झाला आहे.- नंदकिशोर पाटील, गटनेता - स्वाभिमानी शेतकरी संघटना, मजरेवाडी.