शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
6
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
7
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
8
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
9
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
10
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
11
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
12
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
13
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
14
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
15
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
16
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
17
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
18
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
19
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
20
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव

‘तासगाव’ यंदा सुरू होणार का? सभासद, कामगारांत चिंता : नेत्यांविषयी नाराजी

By admin | Updated: July 23, 2014 22:59 IST

तासगावचे धुराडे भाग-१

शरद जाधव - भिलवडीतासगाव-पलूस तालुका सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात चार वर्षांपासून सुरू असलेल्या सभासद व कामगारांच्या लढ्याला यश मिळत नसल्याचे चित्र आहे. यंदा तर कारखाना सुरू होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारखान्याच्या निर्मितीपासून अधोगतीपर्यंत साक्षीदार आणि संचालक मंडळावर असणाऱ्या गृहमंत्री व आर. आर. पाटील व वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी कारखाना सुरू करण्यासाठी कोणतीही ठाम भूमिका घेतलेली नाही. सरकारच्या माध्यमातून त्यांनी राज्य बँकेवर दबाव आणण्यासाठी प्रयत्न केले नसल्याने सभासद, कामगारांत प्रचंड नाराजी आहे. यामुळे दोघांनी आतातरी ठोस भूमिका जाहीर करावी, अशी मागणी त्यांचेच कार्यकर्ते करीत आहेत.तासगाव कारखान्याची विक्री प्रक्रिया रद्द करावी, तो राज्य बँकेने अवसायकांच्या ताब्यात देऊन दीर्घ मुदतीने भाडेतत्त्वावर चालवण्यास द्यावा, या मागणीसाठी चार वर्षांत कामगार संघटना, प्रा. एन. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील कारखाना बचाव समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, तासगाव-पलूस तालुक्यांतील सभासद, ऊसउत्पादक लढत आहेत. मात्र राज्य बँकेचे अधिकारी ऐकत नसल्याचा डांगोरा गृहमंत्री, वनमंत्री, सहकारमंत्री ते मुख्यमंत्री पिटत आहेत. सरकारचे जर राज्य बँक ऐकत नसेल, तर ते सरकार आमच्या काय कामाचे? आम्ही यांना निवडून का द्यायचे?, अशी विचारणा त्यांचे कार्यकर्ते करू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी आर. आर. पाटील यांच्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात, तर डॉ. पतंगराव कदम यांच्या कडेगाव-पलूस मतदारसंघामध्ये २६ हजार ऊस उत्पादक, सभासद शेतकरी धक्का देण्याच्या मानसिकतेत आहेत.तासगाव व पलूस तालुक्यातील १०५ गावांच्या कार्यक्षेत्रात दिनकरआबा पाटील यांनी १९८८ मध्ये तासगाव कारखान्याची निर्मिती केली. अठरा जणांच्या संचालक मंडळावर दिनकरआबा व डॉ. पतंगराव कदम गटाचे वर्चस्व होते. १९९०-९१ मध्ये ते १३ जणांचे करून, शरद पवार मुख्यमंत्री असताना आर. आर. पाटील आबांनी शासननियुक्त संचालक म्हणून एन्ट्री केली. दिनकरआबा अध्यक्ष, तर आर. आर. आबा उपाध्यक्ष होते. १९९४ मध्ये कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. आर. आर. पाटील व पतंगराव कदम गटास १२, तर दिनकरआबा गटास ८ जागा मिळाल्या. ८ आॅगस्ट १९९७ ला दोन्ही नेत्यांनी अविश्वास ठराव आणून दिनकरआबांना अध्यक्षपदावरून पायउतार केले. (क्रमश:)