शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

‘तासगाव’ यंदा सुरू होणार का? सभासद, कामगारांत चिंता : नेत्यांविषयी नाराजी

By admin | Updated: July 23, 2014 22:59 IST

तासगावचे धुराडे भाग-१

शरद जाधव - भिलवडीतासगाव-पलूस तालुका सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात चार वर्षांपासून सुरू असलेल्या सभासद व कामगारांच्या लढ्याला यश मिळत नसल्याचे चित्र आहे. यंदा तर कारखाना सुरू होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारखान्याच्या निर्मितीपासून अधोगतीपर्यंत साक्षीदार आणि संचालक मंडळावर असणाऱ्या गृहमंत्री व आर. आर. पाटील व वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी कारखाना सुरू करण्यासाठी कोणतीही ठाम भूमिका घेतलेली नाही. सरकारच्या माध्यमातून त्यांनी राज्य बँकेवर दबाव आणण्यासाठी प्रयत्न केले नसल्याने सभासद, कामगारांत प्रचंड नाराजी आहे. यामुळे दोघांनी आतातरी ठोस भूमिका जाहीर करावी, अशी मागणी त्यांचेच कार्यकर्ते करीत आहेत.तासगाव कारखान्याची विक्री प्रक्रिया रद्द करावी, तो राज्य बँकेने अवसायकांच्या ताब्यात देऊन दीर्घ मुदतीने भाडेतत्त्वावर चालवण्यास द्यावा, या मागणीसाठी चार वर्षांत कामगार संघटना, प्रा. एन. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील कारखाना बचाव समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, तासगाव-पलूस तालुक्यांतील सभासद, ऊसउत्पादक लढत आहेत. मात्र राज्य बँकेचे अधिकारी ऐकत नसल्याचा डांगोरा गृहमंत्री, वनमंत्री, सहकारमंत्री ते मुख्यमंत्री पिटत आहेत. सरकारचे जर राज्य बँक ऐकत नसेल, तर ते सरकार आमच्या काय कामाचे? आम्ही यांना निवडून का द्यायचे?, अशी विचारणा त्यांचे कार्यकर्ते करू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी आर. आर. पाटील यांच्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात, तर डॉ. पतंगराव कदम यांच्या कडेगाव-पलूस मतदारसंघामध्ये २६ हजार ऊस उत्पादक, सभासद शेतकरी धक्का देण्याच्या मानसिकतेत आहेत.तासगाव व पलूस तालुक्यातील १०५ गावांच्या कार्यक्षेत्रात दिनकरआबा पाटील यांनी १९८८ मध्ये तासगाव कारखान्याची निर्मिती केली. अठरा जणांच्या संचालक मंडळावर दिनकरआबा व डॉ. पतंगराव कदम गटाचे वर्चस्व होते. १९९०-९१ मध्ये ते १३ जणांचे करून, शरद पवार मुख्यमंत्री असताना आर. आर. पाटील आबांनी शासननियुक्त संचालक म्हणून एन्ट्री केली. दिनकरआबा अध्यक्ष, तर आर. आर. आबा उपाध्यक्ष होते. १९९४ मध्ये कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. आर. आर. पाटील व पतंगराव कदम गटास १२, तर दिनकरआबा गटास ८ जागा मिळाल्या. ८ आॅगस्ट १९९७ ला दोन्ही नेत्यांनी अविश्वास ठराव आणून दिनकरआबांना अध्यक्षपदावरून पायउतार केले. (क्रमश:)