शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गुंठेवारी विकासासाठी महापालिकेची इच्छाशक्तीच लंगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:23 IST

सांगली : महापालिकेच्या स्थापनेला २३ वर्षांचा काळ लोटला. प्रत्येक अर्थसंकल्पात गुंठेवारी व विस्तारित भागाच्या विकासाच्या गप्पा मारण्यात आल्या. कधी ...

सांगली : महापालिकेच्या स्थापनेला २३ वर्षांचा काळ लोटला. प्रत्येक अर्थसंकल्पात गुंठेवारी व विस्तारित भागाच्या विकासाच्या गप्पा मारण्यात आल्या. कधी कोट्यवधींच्या निधीची तरतूद केली, तर कधी गुंठेवारीला कोलंदाडा दिला गेला. महापालिकेतील सत्ताधारी, विरोधक, लोकप्रतिनिधींकडून गुंठेवारी विकासाच्या मोठमोठ्या घोषणाही झाल्या; पण कालांतराने त्याही हवेत विरल्या. इच्छाशक्तीच लंगडी बनल्याने गुंठेवारीतील प्रश्न मार्गी लागण्याऐवजी त्याचे स्वरूप गंभीर बनत चालले आहे.

महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत गुंठेवारी भागातील नगरसेवकांनी गुंठेवारीतील जनतेचे प्रश्न अत्यंत पोटतिडकीने मांडले; पण त्याची आर्त हाक लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांच्या कानापर्यंत किती पोहोचली हे आताच सांगता येणार नाही; पण गेल्या २३ वर्षांत गुंठेवारी व विस्तारित भागाच्या विकासाकडे सर्वच सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे, हे तितकेच खरे आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाडमध्ये १९८५ मध्ये शेतजमिनीची तुकडे पद्धतीने म्हणजेच गुंठेवारी पद्धतीने प्लॉट पाडून विक्री करण्यात आली. त्यातून शहरालगतच्या शेती क्षेत्रात ७० टक्के वसाहती निर्माण झाल्या. या परिसरात ड्रेनेज, गटारी, रस्ते, पाणी, पथदिवे या सुविधांचा अभाव आहे. पावसाळ्यात चिखलातून ये-जा करावी लागते. डासांचा व साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव आहे. घंटागाडीची सुविधा व नियमित कचरा उचलण्यात येत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी टाक्या उभारल्या तरीही नागरिकांच्या घरापर्यंत पाणी येत नाही. काही प्रमाणात रस्त्यांची कामे झाली, पण त्यातीलही अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. पावसाळी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणाच नसल्याने पावसाळ्यानंतरही पाणी साचून असते. या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत.

महापालिकेच्या अर्थसंकल्पातही गुंठेवारी विकासाचा उल्लेख दरवर्षी केला जातो; पण निधीची तरतूद करताना हात मात्र आखडता घेतला आहे. कोणताही प्रश्न केवळ निधीची घोषणा करून सुटू शकत नाही. त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असते; पण इथे मात्र इच्छाशक्तीच लंगडी असल्याने गुंठेवारीचा प्रश्न कसा मार्गी लागणार, याचे कोडे आहे.

चौकट

निधीच्या भिकेची मागणी

अभिजित भोसले म्हणाले की, गेल्या २३ वर्षांत गुंठेवारी भागाचा विकास झालेला नाही. एकीकडे समतोल विकासाचा अर्थसंकल्प म्हणता, मग गुंठेवारीसाठी निधी का दिला जात नाही? आजही गुंठेवारी भागात पायाभूत सुविधा, रस्ते, गटारी नाहीत. रखरखत्या उन्हात महिला पाणी आणण्यासाठी धावपळ करतात. यंदाच्या अर्थसंकल्पात तरी आम्हाला निधीची भीक द्यावी, अशी मागणी महापौरांकडे केली.