शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
2
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
3
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
4
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
5
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
6
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
7
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
8
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
9
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
10
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
11
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
12
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
13
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
14
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
15
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
16
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
17
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
18
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
19
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

शासनाला आता तरी जाग येणार का?

By admin | Updated: April 28, 2015 00:31 IST

द्राक्ष बागायतदाराची आत्महत्या : ठोस उपाययोजनांची आवश्यकता

तासगाव : डोंगरसोनी (ता. तासगाव) येथील द्राक्षबागायतदार शेतकरी बजरंग झांबरे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून केलेली आत्महत्या विचार करायला लावणारी आहे. सातत्याने शेतीचे नुकसान होत असताना, शासनाकडून मात्र केवळ पंचनाम्याची मलमपट्टी केली जात आहे. निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे. त्यामुळे आता झांबरेंच्या आत्महत्येने तरी शासनाचे डोेळे उघडणार का? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.राज्यासह देशाच्या बाजारपेठेत तासगावची द्राक्षे आणि बेदाण्याचा मोठा नावलौकिक आहे. द्राक्षाबागांच्या जोरावर तासगावची ओळख सधन तालुका म्हणून झाली. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा कल द्राक्षपिकाकडेच राहिला आहे. इथला शेतकरी सधन आहे असे म्हटले जात असले तरी, दहा-बारा वर्षातील दुष्काळ, पाणीटंचाई आणि अलीकडच्या तीन-चार वर्षातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.द्राक्षबाग उभारणीसाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागत असल्यामुळे इथल्या शेतकऱ्याला कर्ज काढण्याशिवाय पर्यायच राहात नाही. एकीकडे कर्ज आणि दुसरीकडे निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे नियोजन केवळ कागदावरच राहिले. त्यामुळेच तालुक्यातील बहुतांश शेतकरी कर्जबाजारीपणाच्या विळख्यात सापडलेले आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी एकमेव साधन असलेली शेतीच वर्षानुवर्षे नुकसानीत चालली आहे. अशा परिस्थितीने खचून गेल्यामुळेच झांबरेंसारख्या शेतकऱ्याला आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला.दुष्काळ असो वा अवकाळीने झालेले नुकसान, शासनाकडून केवळ पंचानाम्यांचा कागदोपत्री फार्स करून तुटपुंजी मदत शेतकऱ्याच्या झोळीत टाकण्याचा सोपस्कार वर्षानुवर्षे चालत आला आहे. अगदी आघाडी सरकार जाऊन भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतरही हाच प्रकार सुरु आहे. सातत्याने होणाऱ्या नुकसानीवर उपाययोजना करण्याची तसदी सरकारी यंत्रणा घेताना दिसून येत नाही. सलग तीन वर्षे अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशावेळी काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी बागेवर शेडनेट टाकून नुकसान टाळण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. अशा नवीन प्रयोगाची अंमलबजावणी शासकीय योजनेच्या माध्यमातून केल्यास, त्यासाठी अनुदान उपलध करुन दिल्यास शेतीचे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान टाळता येऊ शकते. मात्र हे करण्यासाठी शासनाचे डोळे उघडणार कोण? असाच प्रश्न आहे. बजरंग झांबरेंनी आत्महत्या केली. आमदार, खासदार, मंत्री येतील; सांत्वन करुन जातील. प्रशासनाकडून तुटपुंज्या मदतीचा फार्स केला जाईल. यापेक्षा वेगळे काही साध्य होईल, अशी अपेक्षा कोणालाच नाही. पण शेतीचे नुकसान थांबवण्यासाठी कायमस्वरुपी व ठोस अशा उपाययोजनांची अंमलबजावणी केली नाही, तर सधन समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनांची पुनरावृत्ती होतच राहील. (वार्ताहर)मदत वेळेवर मिळणे गरजेचेराज्यासह देशाच्या बाजारपेठेत तासगावची द्राक्षे आणि बेदाण्याचा मोठा नावलौकिक आहे. द्राक्षबाग उभारणीसाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागत असल्यामुळे शेतकऱ्याला कर्ज काढण्याशिवाय पर्यायच राहात नाही. मात्र निसर्गाच्या लहरीपणाने अतोनात कष्ट व खर्च घेऊन जगविलेल्या द्राक्षबागा वादळी पावसात डोळ्यांदेखत नष्ट होताना पाहिल्यावर शेतकरी खचून जातो. त्याचवेळी सरकारी पातळीवरील अनास्था त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडते. त्यामुळे शासकीय मदत वेळेवर मिळणे गरजेचे आहे.