शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शासनाला आता तरी जाग येणार का?

By admin | Updated: April 28, 2015 00:31 IST

द्राक्ष बागायतदाराची आत्महत्या : ठोस उपाययोजनांची आवश्यकता

तासगाव : डोंगरसोनी (ता. तासगाव) येथील द्राक्षबागायतदार शेतकरी बजरंग झांबरे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून केलेली आत्महत्या विचार करायला लावणारी आहे. सातत्याने शेतीचे नुकसान होत असताना, शासनाकडून मात्र केवळ पंचनाम्याची मलमपट्टी केली जात आहे. निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे. त्यामुळे आता झांबरेंच्या आत्महत्येने तरी शासनाचे डोेळे उघडणार का? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.राज्यासह देशाच्या बाजारपेठेत तासगावची द्राक्षे आणि बेदाण्याचा मोठा नावलौकिक आहे. द्राक्षाबागांच्या जोरावर तासगावची ओळख सधन तालुका म्हणून झाली. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा कल द्राक्षपिकाकडेच राहिला आहे. इथला शेतकरी सधन आहे असे म्हटले जात असले तरी, दहा-बारा वर्षातील दुष्काळ, पाणीटंचाई आणि अलीकडच्या तीन-चार वर्षातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.द्राक्षबाग उभारणीसाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागत असल्यामुळे इथल्या शेतकऱ्याला कर्ज काढण्याशिवाय पर्यायच राहात नाही. एकीकडे कर्ज आणि दुसरीकडे निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे नियोजन केवळ कागदावरच राहिले. त्यामुळेच तालुक्यातील बहुतांश शेतकरी कर्जबाजारीपणाच्या विळख्यात सापडलेले आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी एकमेव साधन असलेली शेतीच वर्षानुवर्षे नुकसानीत चालली आहे. अशा परिस्थितीने खचून गेल्यामुळेच झांबरेंसारख्या शेतकऱ्याला आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला.दुष्काळ असो वा अवकाळीने झालेले नुकसान, शासनाकडून केवळ पंचानाम्यांचा कागदोपत्री फार्स करून तुटपुंजी मदत शेतकऱ्याच्या झोळीत टाकण्याचा सोपस्कार वर्षानुवर्षे चालत आला आहे. अगदी आघाडी सरकार जाऊन भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतरही हाच प्रकार सुरु आहे. सातत्याने होणाऱ्या नुकसानीवर उपाययोजना करण्याची तसदी सरकारी यंत्रणा घेताना दिसून येत नाही. सलग तीन वर्षे अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशावेळी काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी बागेवर शेडनेट टाकून नुकसान टाळण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. अशा नवीन प्रयोगाची अंमलबजावणी शासकीय योजनेच्या माध्यमातून केल्यास, त्यासाठी अनुदान उपलध करुन दिल्यास शेतीचे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान टाळता येऊ शकते. मात्र हे करण्यासाठी शासनाचे डोळे उघडणार कोण? असाच प्रश्न आहे. बजरंग झांबरेंनी आत्महत्या केली. आमदार, खासदार, मंत्री येतील; सांत्वन करुन जातील. प्रशासनाकडून तुटपुंज्या मदतीचा फार्स केला जाईल. यापेक्षा वेगळे काही साध्य होईल, अशी अपेक्षा कोणालाच नाही. पण शेतीचे नुकसान थांबवण्यासाठी कायमस्वरुपी व ठोस अशा उपाययोजनांची अंमलबजावणी केली नाही, तर सधन समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनांची पुनरावृत्ती होतच राहील. (वार्ताहर)मदत वेळेवर मिळणे गरजेचेराज्यासह देशाच्या बाजारपेठेत तासगावची द्राक्षे आणि बेदाण्याचा मोठा नावलौकिक आहे. द्राक्षबाग उभारणीसाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागत असल्यामुळे शेतकऱ्याला कर्ज काढण्याशिवाय पर्यायच राहात नाही. मात्र निसर्गाच्या लहरीपणाने अतोनात कष्ट व खर्च घेऊन जगविलेल्या द्राक्षबागा वादळी पावसात डोळ्यांदेखत नष्ट होताना पाहिल्यावर शेतकरी खचून जातो. त्याचवेळी सरकारी पातळीवरील अनास्था त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडते. त्यामुळे शासकीय मदत वेळेवर मिळणे गरजेचे आहे.