शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

आष्टा-मर्दवाडी निचरा कालव्याचे काम पूर्ण होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:42 IST

सुरेंद्र शिराळकर आष्टा : आष्टा, कारंदवाडी, मर्दवाडी परिसरातील क्षारपड जमिनी सुपीक व्हाव्यात, या दृष्टिकोनातून माजी आमदार स्व. विलासराव ...

सुरेंद्र शिराळकर

आष्टा : आष्टा, कारंदवाडी, मर्दवाडी परिसरातील क्षारपड जमिनी सुपीक व्हाव्यात, या दृष्टिकोनातून माजी आमदार स्व. विलासराव शिंदे व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून या परिसरातील जमिनीतून चर खोदून येथील पाणी कृष्णा नदीला सोडण्यात आले. परंतु आष्टा, अंकलखोप, गारपीर रस्त्याच्या पूर्व बाजूच्या काही शेतकऱ्यांनी अडवणूक केल्याने पाणी पुढे जाणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या निचरा कालव्याचे काम कधी पूर्ण हाेणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

आष्टा, कारंदवाडी, मर्दवाडी परिसरात हजारो एकर जमिनी अतिपाण्यामुळे क्षारपड झाल्या आहेत. या जमिनी पुन्हा लागवडीखाली आणण्यासाठी विलासराव शिंदे व जयंत पाटील यांनी प्रयत्न केले. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने वेळोवेळी जेसीबी देऊन चर खुदाई करण्यात आली. मागील चार वर्षापासून मंत्री जयंत पाटील, कारखान्याचे अध्यक्ष पी.आर. पाटील, संचालक विराज शिंदे, श्रीकांत कबाडे, माणिक शेळके, युवक नेते प्रतीक पाटील, पंचायत समिती सदस्य जनार्दन पाटील यांच्या सहकार्यामुळे चर खुदाईचे काम मार्गी लागले आहे. आष्टा येथील जगन्नाथ बसुगडे, राजू देसावळे, नंदकुमार बसुगडे, पांडुरंग बसुगडे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे कारंदवाडी, आष्टा व मर्दवाडी परिसरातील हजारो एकर जमिनीचा पोत सुधारून या जमिनीमध्ये ऊस, केळी, हळद, भाजीपाला पिकांचे उच्चांकी उत्पादन मिळत आहे.

आष्टा, कारंदवाडी परिसरातील पाणी मर्दवाडीपर्यंत आले आहे. २२ फूट रुंद व १२ ते १३ फूट खोल निचरा कालवा नदीकडे गेला आहे. त्यामुळे या जमिनी सुधारत आहेत.

मात्र बसुगडे मळा परिसराकडून मर्दवाडी, कृष्णा नदीकडे जाणाऱ्या निचरा कालव्यास काही शेतकऱ्यांचा विरोध आहे. जयंत पाटील यांनी यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनी खराब होऊ नयेत यासाठी मोठे पाइप टाकून पाणी पुढे नेण्यास मान्यता देण्यात आली.

मात्र ते काम वर्षापासून बंद आहे. मेअखेर हे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. जयंत पाटील यांनी तातडीने मार्ग काढून हे काम पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांतून होत आहे.

फोटो : ०३ आष्टा २

ओळ : आष्टा-मर्दवाडी येथील इनामदार मळ्यानजीक निचरा कालव्याचे काम थांबले आहे.