शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकार काही देत नाही म्हणून शेतकऱ्यांना का बडवता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:29 IST

राजारामबापू कारखाना कार्यस्थळावरील ठिय्या आंदोलनात माजी खा. राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संदीप राजोबा, संजय बेले, एस. यू. ...

राजारामबापू कारखाना कार्यस्थळावरील ठिय्या आंदोलनात माजी खा. राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संदीप राजोबा, संजय बेले, एस. यू. संदे, अप्पासाहेब पाटील उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : केंद्र सरकार काही देत नाही म्हणून शेतकऱ्यांना का बडवता, असा प्रश्न उपस्थित करत स्वाभिमानीचे माजी खा. राजू शेट्टी यांनी सांगली जिल्ह्यातील पूर्ण एफआरपी न दिलेल्या साखर कारखान्यांनी येत्या १५ दिवसांत ती एकरकमी द्यावी अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला.

येथील राजारामबापू कारखाना कार्यस्थळावरील बापूंच्या पुतळ्यासमोर शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसोबत ठिय्या मारला. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, सचिव प्रताप पाटील, वित्त व्यवस्थापक अमोल पाटील, कामगार कल्याण अधिकारी व्ही. बी. पाटील, कामगार नेते शंकरराव भोसले, तानाजीराव खराडे उपस्थित होते. माहुली यांनी कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने आपली बाजू मांडली.

शेट्टी म्हणाले, राजारामबापूंनी शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी यावी, यासाठी प्रयत्न केले. कवठेमहांकाळसारख्या दुष्काळी तालुक्यात कारखाना उभा केला. त्यामुळे शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाची दाद मागण्यासाठी बापूंच्या पुतळ्यासमोर ही व्यथा मांडत आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे प्रंचड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला उसाचा आधार होता. मात्र, कारखानदारांकडून त्यांना न्याय दिला जात नाही.

ते म्हणाले, केंद्र शासनाने साखरेची आधारभूत किंमत वाढवावी, यासाठी राज्य साखर संघाने पुढाकार घेतल्यास त्यांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात उतरू. केंद्राविरुद्ध झगडण्याची हिंमत कारखानदारांनी दाखवावी. तुकडे, तुकडे करून दिली जाणारी एफआरपी शेतकऱ्यांच्या हाताला लागत नाही. त्यामुळे कायद्यानुसार एकरकमी एफआरपी येत्या १५ दिवसांत मिळालीच पाहिजे अन्यथा परत मध्यस्थी करू नका.

कार्यकारी संचालक माहुली म्हणाले, केंद्र सरकारकडून ९० कोटी रुपयांचे येणे आहे. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे. साखरेची आधारभूत किंमत ३३ रुपये केल्यास एकरकमी एफआरपी देण्यात अडचण नाही. गेल्या ६ महिन्यांपासून साखरेला उठाव नसल्याने १२४ कोटींची साखर गोदामात पडून आहे. त्यावर व्याजाचा बोजा चढत आहे. गेल्या ५० वर्षांपासून राजारामबापू कारखान्याने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. एफआरपीपेक्षा जादा दर दिल्याने कारखान्यावर नोटीस आयकर विभागाने बजावली आहे. केंद्राकडून येत्या पंधरा दिवसांत निधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने एकरकमी एफआरपी देऊ.