शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकार काही देत नाही म्हणून शेतकऱ्यांना का बडवता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:29 IST

राजारामबापू कारखाना कार्यस्थळावरील ठिय्या आंदोलनात माजी खा. राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संदीप राजोबा, संजय बेले, एस. यू. ...

राजारामबापू कारखाना कार्यस्थळावरील ठिय्या आंदोलनात माजी खा. राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संदीप राजोबा, संजय बेले, एस. यू. संदे, अप्पासाहेब पाटील उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : केंद्र सरकार काही देत नाही म्हणून शेतकऱ्यांना का बडवता, असा प्रश्न उपस्थित करत स्वाभिमानीचे माजी खा. राजू शेट्टी यांनी सांगली जिल्ह्यातील पूर्ण एफआरपी न दिलेल्या साखर कारखान्यांनी येत्या १५ दिवसांत ती एकरकमी द्यावी अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला.

येथील राजारामबापू कारखाना कार्यस्थळावरील बापूंच्या पुतळ्यासमोर शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसोबत ठिय्या मारला. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, सचिव प्रताप पाटील, वित्त व्यवस्थापक अमोल पाटील, कामगार कल्याण अधिकारी व्ही. बी. पाटील, कामगार नेते शंकरराव भोसले, तानाजीराव खराडे उपस्थित होते. माहुली यांनी कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने आपली बाजू मांडली.

शेट्टी म्हणाले, राजारामबापूंनी शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी यावी, यासाठी प्रयत्न केले. कवठेमहांकाळसारख्या दुष्काळी तालुक्यात कारखाना उभा केला. त्यामुळे शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाची दाद मागण्यासाठी बापूंच्या पुतळ्यासमोर ही व्यथा मांडत आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे प्रंचड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला उसाचा आधार होता. मात्र, कारखानदारांकडून त्यांना न्याय दिला जात नाही.

ते म्हणाले, केंद्र शासनाने साखरेची आधारभूत किंमत वाढवावी, यासाठी राज्य साखर संघाने पुढाकार घेतल्यास त्यांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात उतरू. केंद्राविरुद्ध झगडण्याची हिंमत कारखानदारांनी दाखवावी. तुकडे, तुकडे करून दिली जाणारी एफआरपी शेतकऱ्यांच्या हाताला लागत नाही. त्यामुळे कायद्यानुसार एकरकमी एफआरपी येत्या १५ दिवसांत मिळालीच पाहिजे अन्यथा परत मध्यस्थी करू नका.

कार्यकारी संचालक माहुली म्हणाले, केंद्र सरकारकडून ९० कोटी रुपयांचे येणे आहे. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे. साखरेची आधारभूत किंमत ३३ रुपये केल्यास एकरकमी एफआरपी देण्यात अडचण नाही. गेल्या ६ महिन्यांपासून साखरेला उठाव नसल्याने १२४ कोटींची साखर गोदामात पडून आहे. त्यावर व्याजाचा बोजा चढत आहे. गेल्या ५० वर्षांपासून राजारामबापू कारखान्याने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. एफआरपीपेक्षा जादा दर दिल्याने कारखान्यावर नोटीस आयकर विभागाने बजावली आहे. केंद्राकडून येत्या पंधरा दिवसांत निधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने एकरकमी एफआरपी देऊ.