शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

सांगलीची बाजार समिती कोणाची?

By admin | Updated: August 10, 2015 00:52 IST

आज फैसला : जयंतराव-पतंगरावांचा सामना

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची उद्या (सोमवार) मतमोजणी होत असून, दुपारपर्यंत सर्व निकाल अपेक्षित आहेत. १९ जागांसाठी ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जत, कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्यात कार्यक्षेत्र असलेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. माजी मंत्री पतंगराव कदम व जयंत पाटील यांनी या निवडणुकीसाठी सर्वस्व पणाला लावले असून, यामुळे निम्म्या जिल्ह्याचे नेतेही निश्चित होण्याची शक्यता आहे . सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शनिवारी अत्यंत चुरशीने ९५.१५ टक्के मतदान झाले. उद्या सकाळी मिरज येथील शेतकरी भवनमध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ होत आहे. दुपारी चार वाजेपर्यंत सर्व निकाल अपेक्षित आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व प्रांत हेमंत निकम यांनी दिली. ही निवडणूक कॉँग्रेस आघाडीप्रणित वसंतदादा रयत पॅनेल व राष्ट्रवादीप्रणित शेतकरी सहकारी पॅनेलमध्ये झाली. काँग्रेसचे नेतृत्व पतंगराव कदम, तर राष्ट्रवादीचे नेतृत्व जयंत पाटील यांनी केले. दोघांनीही ग्रामीण भाग पिंजून काढला. वसंतदादा पॅनेलमध्ये जनसुराज्य, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना सहभागी असून, शेतकरी पॅनेलमध्ये राष्ट्रवादी, भाजप व मदन पाटील गट सहभागी झाला आहे. सुमारे तेराशे कोटींची उलाढाल असणाऱ्या या संस्थेचा ताबा घेण्यासाठी राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती ही जिल्ह्यातील सर्वात मोठी संस्था आहे. मिरज, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यात याचा विस्तार आहे. या संस्थेवर तसे वसंतदादा घराण्याचेच ५६ वर्षे वर्चस्व होते. सुरुवातीला वसंतदादा पाटील, त्यानंतर विष्णुअण्णा व नंतर मदन पाटील गटाचीच सत्ता राहिली. याला अपवाद केवळ गतवेळची निवडणूक राहिली. २००८ च्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलच्या झेंड्याखाली जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री अजितराव घोरपडे, संजयकाका पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार संभाजी पवार हे एकत्रित आले. राष्ट्रवादी, भाजपच्या या पॅनेलला पतंगराव कदम गटाचीही साथ मिळाली. ही निवडणूक मदन पाटील विरुध्द सर्वजण अशी झाली. चुरशीच्या निवडणुकीनंतर या संस्थेत पहिल्यांदाच परिवर्तन घडून आले. मात्र या पॅनेलचा कालावधी पूर्ण होण्याआधीच संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्यात आला. गेल्या अडीच वर्षांपासून या संस्थेवर प्रशासक आहे. (प्रतिनिधी)निवडून येणारा उमेदवार आमचाया निवडणुकीत पहिल्यांदाच व्यापाऱ्यांच्या दोन जागांसाठी तेरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आजपर्यंतची ही विक्रमी संख्या आहे. निवडून येणारा आमचा प्रतिनिधी असेल, अशी माहिती चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष मनोहर सारडा यांनी दिली. व्यापाऱ्यांमध्ये राजकारण असू नये म्हणून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र त्यात अपयश आले. निवडणुकीनंतरही व्यापाऱ्यांमध्ये राजकारणाला थारा देण्यात येणार नाही. निवडून येणाऱ्या उमेदवारांनी सर्वच व्यापाऱ्यांचे प्रतिनिधीत्व कोणतेही राजकारण न करता करावे, असे चेंबरचे प्रयत्न असणार आहेत.७० उमेदवार रिंगणात १९ जागांसाठी ७० उमेदवार मैदानात असून, सोसायटी, व्यापारी, ग्रामपंचायत व हमाल तोलाईदार गटात सर्वाधिक उमेदवार आहेत. ग्रामपंचायतीच्या २ जागांसाठी १० उमेदवार, सोसायटी- ७ जागा २१ उमेदवार, महिला- २ जागा ४ उमेदवार, भटके विमुक्त- १ जागा २ उमेदवार, ओबीसी- १ जागा ५ उमेदवार, आर्थिक दुर्बल- १ जागा ४ उमेदवार, अनुसूचित जाती-जमाती- १ जागा ३ उमेदवार, व्यापारी- २ जागा १३ उमेदवार, प्रक्रिया- १ जागा ३ उमेदवार, तर हमाल-तोलाईदारच्या एका जागेसाठी ५ उमेदवार रिंंगणात आहेत.