शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

मणदूरपैकी धनगरवाड्यात जमीन नेमकी कोणाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोकरुड : दीडशे वर्षांपेक्षा जास्त म्हणजे देश स्वतंत्र होण्याअगोदर पणजोबा, खापर पणजोबा जी शेती कसून खात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोकरुड : दीडशे वर्षांपेक्षा जास्त म्हणजे देश स्वतंत्र होण्याअगोदर पणजोबा, खापर पणजोबा जी शेती कसून खात होते, तेवढीच शेती आजही आम्ही कसून खात आहोत. ज्या शेतात वरी, नाचणी, कारेळा, भात याची पेरणी, उगवणी केली; तीच जमीन तुमच्या नावावर नाही असे वनविभाग सांगत आहे. अशी व्यथा शिराळा तालुक्यातील मणदूरपैकी धनगरवाडा, विनोबाग्राम या गावतील नागरिक मांडत आहेत.

धनगरवाडा ५६ घरांचे आणि चारशे लोकसंख्येचे, तर विनोबा ग्राम १६ घरांचे आणि शंभर लोकांची वस्ती आहे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी नेमिनाथ कत्ते गुरुजी यांनी बसविलेल्या या वस्त्या आहेत. या दोन्ही वस्त्या बफर झोनमध्ये येत असून, मणदूर ग्रामपंचायतीला जोडल्या आहेत. येथील नागरिक पूर्वीपासून सुमारे साडेतीनशे एकर शेती पिकवत आहे. अशी परिस्थिती असताना वनविभाग ही जमीन संबंधित शेतकऱ्यांची नसल्याचे सांगत आहे.

याबत महसूल विभागाने १९६७ ला दिलेल्या आदेशात म्हटले आहे, १६६ एकर क्षेत्रावर वनक्षेत्र राहणार नाही म्हणजे ते क्षेत्र धनगरवाडा, विनोबा ग्राम यांचे आहे, तर वनविभाग सांगते तुम्हाला ३४ एकर पेक्षा (गट नंबर २२२ मधील) जास्त जमीन मिळणार नाही. त्यामुळे गट नंबर २२१ अ/ब/क मधील जमीन नेमकी कोणाची हा वाद स्थानिक शेतकरी आणि वनविभाग यांच्यात गेल्या ८० वर्षांपेक्षा जास्त काळ सुरू आहे.

कोट

गेल्या दीडशे वर्षांपासून धनगरवाडा, विनोबाग्राम येथील पिढीजात शेतकरी तीनशे ते साडेतीनशे एकर जमीन कसत आहे. पिके घेत आहे. त्यामुळे सातबाराला नावे आहेत की नाहीत हे आम्हाला माहीत नसून, वनविभागाने त्यांच्या जमिनीची मोजणी करून हद्द ठरवावी. आमच्या जमिनीत येऊ नये.

- बाबूराव डोईफोडे, शेतकरी धनगरवाडा (मणदूर).