शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

मणदूरपैकी धनगरवाड्यात जमीन नेमकी कोणाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोकरुड : दीडशे वर्षांपेक्षा जास्त म्हणजे देश स्वतंत्र होण्याअगोदर पणजोबा, खापर पणजोबा जी शेती कसून खात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोकरुड : दीडशे वर्षांपेक्षा जास्त म्हणजे देश स्वतंत्र होण्याअगोदर पणजोबा, खापर पणजोबा जी शेती कसून खात होते, तेवढीच शेती आजही आम्ही कसून खात आहोत. ज्या शेतात वरी, नाचणी, कारेळा, भात याची पेरणी, उगवणी केली; तीच जमीन तुमच्या नावावर नाही असे वनविभाग सांगत आहे. अशी व्यथा शिराळा तालुक्यातील मणदूरपैकी धनगरवाडा, विनोबाग्राम या गावतील नागरिक मांडत आहेत.

धनगरवाडा ५६ घरांचे आणि चारशे लोकसंख्येचे, तर विनोबा ग्राम १६ घरांचे आणि शंभर लोकांची वस्ती आहे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी नेमिनाथ कत्ते गुरुजी यांनी बसविलेल्या या वस्त्या आहेत. या दोन्ही वस्त्या बफर झोनमध्ये येत असून, मणदूर ग्रामपंचायतीला जोडल्या आहेत. येथील नागरिक पूर्वीपासून सुमारे साडेतीनशे एकर शेती पिकवत आहे. अशी परिस्थिती असताना वनविभाग ही जमीन संबंधित शेतकऱ्यांची नसल्याचे सांगत आहे.

याबत महसूल विभागाने १९६७ ला दिलेल्या आदेशात म्हटले आहे, १६६ एकर क्षेत्रावर वनक्षेत्र राहणार नाही म्हणजे ते क्षेत्र धनगरवाडा, विनोबा ग्राम यांचे आहे, तर वनविभाग सांगते तुम्हाला ३४ एकर पेक्षा (गट नंबर २२२ मधील) जास्त जमीन मिळणार नाही. त्यामुळे गट नंबर २२१ अ/ब/क मधील जमीन नेमकी कोणाची हा वाद स्थानिक शेतकरी आणि वनविभाग यांच्यात गेल्या ८० वर्षांपेक्षा जास्त काळ सुरू आहे.

कोट

गेल्या दीडशे वर्षांपासून धनगरवाडा, विनोबाग्राम येथील पिढीजात शेतकरी तीनशे ते साडेतीनशे एकर जमीन कसत आहे. पिके घेत आहे. त्यामुळे सातबाराला नावे आहेत की नाहीत हे आम्हाला माहीत नसून, वनविभागाने त्यांच्या जमिनीची मोजणी करून हद्द ठरवावी. आमच्या जमिनीत येऊ नये.

- बाबूराव डोईफोडे, शेतकरी धनगरवाडा (मणदूर).