शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मैदान येईल, तेव्हा कुस्तीचे ठरवू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लांब आहेत. जेव्हा मैदान येईल, तेव्हा कसे लढायचे ते ठरवू, अशी प्रतिक्रिया खासदार संजयकाका पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठीच आपली तयारी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले की, मी कोणाच्या वशिल्याने, कोणासाठी लाचारी करून या पदापर्यंत पोहोचलो नाही. ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लांब आहेत. जेव्हा मैदान येईल, तेव्हा कसे लढायचे ते ठरवू, अशी प्रतिक्रिया खासदार संजयकाका पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठीच आपली तयारी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले की, मी कोणाच्या वशिल्याने, कोणासाठी लाचारी करून या पदापर्यंत पोहोचलो नाही. स्वाभिमानानेच राजकारण केले आहे. त्यामुळे यापुढेही त्याचपद्धतीने मी राजकारण करणार आहे. पक्षांतर्गत संघर्षाचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही. माझे काम मी फक्त करीत आहे. कोणावर विनाकारण टीकाटिपणी करणार नाही. वेळ येते तेव्हा मी समोरूनच वार करतो. लपून वार करण्याचा माझा स्वभाव नाही. विधानसभा किंवा लोकसभा लढविण्याविषयी लोकच चर्चा करीत आहेत.लोकसभेला लोकांनी माझ्यावर इतक्या मोठ्या प्रमाणावर विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे लोकसभेचीच तयारी मी करेन. तरीही या गोष्टीवर आताच बोलणे बरोबर नाही. कोणत्याही निवडणुकीचा निर्णय पक्षीय पातळीवर घेतला जातो. त्यामुळे पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करीत राहणार आहे.अजितराव घोरपडे यांचे नाव न घेता ते म्हणाले की, काही लोकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न वारंवार करीत आहे. त्याबाबत आशावादी आहे. पक्षीय बैठकांना, कार्यक्रमांना कोण उपस्थित राहत आहे यापेक्षा, त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करणे हे महत्त्वाचे आहे.पतंगरावांची भेट राजकीय नव्हेसंजयकाका पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील प्रत्येक भागातील नागरिकांनी मला निवडून दिले आहे. नागठाण्यातूनही मला मोठ्या प्रमाणावर मतदान झाले आहे. त्यामुळे कोणत्याही गावातील नागरिकांनी मला बोलावले, तर तेथे जाणे माझे कर्तव्य आहे. याच कर्तव्यभावनेने नागठाण्यातील बालगंधर्व पुरस्कार प्रदान सोहळ्यास उपस्थित होतो. पतंगराव कदम यांनी माझे व मीही त्यांच्या काही गोष्टींचे कौतुक केले. ज्यावेळी आमच्या दोघांमध्ये संघर्ष झाला, तेव्हा उघडपणे त्यांच्यावर मी आरोपही केले होते. त्यामुळे आमची भेट ही कार्यक्रमातून झालेली औपचारिकता होती. राजकीय भेट म्हणून त्याची चर्चा चुकीची आहे.