शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मैदान येईल, तेव्हा कुस्तीचे ठरवू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लांब आहेत. जेव्हा मैदान येईल, तेव्हा कसे लढायचे ते ठरवू, अशी प्रतिक्रिया खासदार संजयकाका पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठीच आपली तयारी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले की, मी कोणाच्या वशिल्याने, कोणासाठी लाचारी करून या पदापर्यंत पोहोचलो नाही. ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लांब आहेत. जेव्हा मैदान येईल, तेव्हा कसे लढायचे ते ठरवू, अशी प्रतिक्रिया खासदार संजयकाका पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठीच आपली तयारी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले की, मी कोणाच्या वशिल्याने, कोणासाठी लाचारी करून या पदापर्यंत पोहोचलो नाही. स्वाभिमानानेच राजकारण केले आहे. त्यामुळे यापुढेही त्याचपद्धतीने मी राजकारण करणार आहे. पक्षांतर्गत संघर्षाचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही. माझे काम मी फक्त करीत आहे. कोणावर विनाकारण टीकाटिपणी करणार नाही. वेळ येते तेव्हा मी समोरूनच वार करतो. लपून वार करण्याचा माझा स्वभाव नाही. विधानसभा किंवा लोकसभा लढविण्याविषयी लोकच चर्चा करीत आहेत.लोकसभेला लोकांनी माझ्यावर इतक्या मोठ्या प्रमाणावर विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे लोकसभेचीच तयारी मी करेन. तरीही या गोष्टीवर आताच बोलणे बरोबर नाही. कोणत्याही निवडणुकीचा निर्णय पक्षीय पातळीवर घेतला जातो. त्यामुळे पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करीत राहणार आहे.अजितराव घोरपडे यांचे नाव न घेता ते म्हणाले की, काही लोकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न वारंवार करीत आहे. त्याबाबत आशावादी आहे. पक्षीय बैठकांना, कार्यक्रमांना कोण उपस्थित राहत आहे यापेक्षा, त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करणे हे महत्त्वाचे आहे.पतंगरावांची भेट राजकीय नव्हेसंजयकाका पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील प्रत्येक भागातील नागरिकांनी मला निवडून दिले आहे. नागठाण्यातूनही मला मोठ्या प्रमाणावर मतदान झाले आहे. त्यामुळे कोणत्याही गावातील नागरिकांनी मला बोलावले, तर तेथे जाणे माझे कर्तव्य आहे. याच कर्तव्यभावनेने नागठाण्यातील बालगंधर्व पुरस्कार प्रदान सोहळ्यास उपस्थित होतो. पतंगराव कदम यांनी माझे व मीही त्यांच्या काही गोष्टींचे कौतुक केले. ज्यावेळी आमच्या दोघांमध्ये संघर्ष झाला, तेव्हा उघडपणे त्यांच्यावर मी आरोपही केले होते. त्यामुळे आमची भेट ही कार्यक्रमातून झालेली औपचारिकता होती. राजकीय भेट म्हणून त्याची चर्चा चुकीची आहे.