शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
5
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
6
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
7
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
8
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
9
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
10
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
11
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
12
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
13
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
14
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
15
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
16
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
17
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
18
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
19
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
20
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन

उद्योगांचे चाक मंदावले, पन्नास टक्के कारखान्यांना कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:25 IST

सांगली : सांगलीच्या उद्योग क्षेत्राचे चाक सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाऊनमुळे रुतले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ट्रॅकवर आलेली उद्योगांची गाडी ...

सांगली : सांगलीच्या उद्योग क्षेत्राचे चाक सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाऊनमुळे रुतले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ट्रॅकवर आलेली उद्योगांची गाडी आता पुन्हा घसरली असून महापालिका क्षेत्रातील चार औद्योगिक वसाहतींमधील ५० ते ६० टक्के कारखाने बंद झाले आहेत. कामगारांच्या कामालाही यामुळे ब्रेक लागला आहे.

सांगली जिल्ह्यात एकूण ६ औद्योगिक वसाहती असून महापालिका क्षेत्रातच यातील चार मोठ्या वसाहती आहेत. यात फूड प्रोसेसिंग, पशू खाद्य, स्टार्च, ग्लुकोज, फौंड्री, ऑटो कंपोनंट, टेक्सटाइल, गारमेंट, प्लास्टिक, सिमेंट आर्टिकल, फार्मास्युटिकल्स, हेवी फॅब्रिकेशन, शुगर मशिनरी, टेस्टिंग मशिन्स, केमिकल आदी विविध प्रकारच्या उद्योगांचा समावेश आहे. यातील अन्नप्रक्रियेसह अत्यावश्यक उद्योगांची चाके सुरळीत असून अन्य उद्योगांची चाके पूर्णपणे थांबली आहेत. त्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीस येथील उद्योजकांना सामोरे जावे लागत आहे.

दोन वर्षांपूर्वी महापूर आणि गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना येथील औद्योगिक क्षेत्रास करावा लागत आहे. महापुरातून सावरण्याची संधी मिळण्यापूर्वीच कोरोनाच्या संकटाची काळी छाया या क्षेत्रावर पडली. सुमारे १ हजार २00 कारखाने, २0 हजार कामगार आणि या क्षेत्रावर अवलंबून असलेले १ हजाराहून अधिक छोटे व्यावसायिक या सर्वांना फटका बसला आहे.

चौकट

औद्योगिक वसाहती व सुरू उद्योग

वसंतदादा औद्योगिक वसाहत ५० टक्के

गोविंदराव मराठे ५० टक्के

कुपवाड एमआयडीसी ३० टक्के

मिरज एमआयडीसी ६० टक्के

कोट

कधीही भरून न येणारे कोट्यवधी रुपयांचे नुकसान उद्योगांना सोसावे लागत आहे. शासनाने आता यातून सावरण्यासाठी भरीव मदत करावी, अन्यथा अनेक उद्योग कायमचे बंद पडतील.

- सतीश मालू, अध्यक्ष कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज

कोट

मिरजेतील निर्यातदार उद्योगांना कच्च्या मालाच्या पुरवठ्याचा प्रश्न सतावत असून मुदतीत ग्राहकांना माल देणे अडचणीचे झाले आहे. वाहतुकीचा प्रश्नही गंभीर बनला आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदाही मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे.

- गणेश निकम, व्यवस्थापक

सांगली, मिरज एम.आय.डी.सी. मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन

कोट

सध्या अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना उद्योजकांना करावा लागत आहे. कच्च्या मालाचे भाव जवळपास ४० ते ४५ टक्के वाढले आहेत. त्या मालाचाही व्यवस्थित पुरवठा होत नाही. त्यामुळे कारखान्यांची यंत्रणा विस्कळीत झाली आहे.

- संतोष भावे, अध्यक्ष, गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहत