शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

ही कसली संचारबंदी? हा तर मुक्त संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना प्रशासनाने संचारबंदी लागू केली. पण प्रत्यक्षात संचारबंदी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना प्रशासनाने संचारबंदी लागू केली. पण प्रत्यक्षात संचारबंदी कागदावरच असल्याचे चित्र गुरुवारी शहरात दिसत होते. सकाळपासूनच सांगलीकर रस्त्यावर होते. दुचाकी, चारचाकी वाहनांची ये-जा नेहमीसारखीच सुरू होती. भाजी, फळ विक्रेतेही रस्त्यावर बसून व्यवसाय करीत होते. शहरात संचारबंदी नव्हे तर मुक्त संचार सुरू होता. पोलिसांनी संचलन केल्यानंतर शहरातील वर्दळ कमी झाली.

शहरात बुधवारी रात्री आठपासून संचारबंदीला सुरुवात झाली. प्रशासनाकडून अनावश्यक कामासाठी घराबाहेर पडू नये, अशा सक्त सूचनाही देण्यात आल्या. पण संचारबंदीचा फारसा परिणाम नागरिकांवर झाल्याचे चित्र कुठेच दिसत नव्हते. सकाळीच शिवाजी मंडईत भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावरच व्यवसाय सुरू केला होता. बाजारपेठेतील प्रमुख रस्त्यावर फळ विक्रेतेही होते. महापालिकेने भाजी व फळे रस्त्यावर बसून विक्री करण्यास मनाई केली होती. पण या निर्णयाला विक्रेत्यांनी हरताळ फासला होता. त्यात निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेचे पथक कोठेच रस्त्यावर दिसत नव्हते.

सकाळपासूनच नागरिक काही ना काही कारणांनी घराबाहेर पडल्याचे दिसत होते. शहरातील काॅलेज कार्नर, शिवाजी मंडई, रिसाला रोड, हरभट रोड, सांगली-मिरज रस्ता अशा अनेक रस्त्यांवर गर्दी होती. दुचाकी, चारचाकी वाहनांची तर रेलचेल होती. बाहेर पडणारे नागरिक हे अत्यावश्यक सेवेतील आहेत की नाही, याची साधी चौकशीही केली जात नव्हती. सर्वत्र नागरिक, वाहनधारकांचा मुक्त संचार सुरू होता. सार्वजनिक वाहतूक व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद होती. अत्यावश्यक सेवा असे स्टीकर लावून अनेक वाहने रस्त्यावर उतरली होती. एकूणच शहरात संचारबंदीचा परिणाम कुठेच दिसत नव्हता. दुपारी पोलिसांनी संचलन केल्यानंतर शहरातील वर्दळ कमी झाली.

चौकट

चौकात बॅरिकेड्स आणि पोलीसही

शहरात सकाळच्या टप्प्यात काही ठिकाणी पोलिसांनी वाहनधारकांना अडवून चौकशी केली. पण काही वेळातच ही तपासणीही थांबली. चौकाचौकात पोलिसांनी बॅरिकेड्स लावली आहेत. पोलिसांचा बंदोबस्तही तैनात केला आहे. अनेक ठिकाणी तर पोलीस असूनही नागरिकांची चौकशी होत नसल्याचे चित्र दिसत होते.

चौकट

बँकांसमोर रांगा

संचारबंदीच्या काळात शहरातील सर्वच बँकांसमोर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर गुरुवारी बँकांसमोर गर्दी पाहायला मिळाली. एटीएमवरही ग्राहकांची गर्दी होती.