शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

ही कसली संचारबंदी? हा तर मुक्त संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना प्रशासनाने संचारबंदी लागू केली. पण प्रत्यक्षात संचारबंदी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना प्रशासनाने संचारबंदी लागू केली. पण प्रत्यक्षात संचारबंदी कागदावरच असल्याचे चित्र गुरुवारी शहरात दिसत होते. सकाळपासूनच सांगलीकर रस्त्यावर होते. दुचाकी, चारचाकी वाहनांची ये-जा नेहमीसारखीच सुरू होती. भाजी, फळ विक्रेतेही रस्त्यावर बसून व्यवसाय करीत होते. शहरात संचारबंदी नव्हे तर मुक्त संचार सुरू होता. पोलिसांनी संचलन केल्यानंतर शहरातील वर्दळ कमी झाली.

शहरात बुधवारी रात्री आठपासून संचारबंदीला सुरुवात झाली. प्रशासनाकडून अनावश्यक कामासाठी घराबाहेर पडू नये, अशा सक्त सूचनाही देण्यात आल्या. पण संचारबंदीचा फारसा परिणाम नागरिकांवर झाल्याचे चित्र कुठेच दिसत नव्हते. सकाळीच शिवाजी मंडईत भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावरच व्यवसाय सुरू केला होता. बाजारपेठेतील प्रमुख रस्त्यावर फळ विक्रेतेही होते. महापालिकेने भाजी व फळे रस्त्यावर बसून विक्री करण्यास मनाई केली होती. पण या निर्णयाला विक्रेत्यांनी हरताळ फासला होता. त्यात निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेचे पथक कोठेच रस्त्यावर दिसत नव्हते.

सकाळपासूनच नागरिक काही ना काही कारणांनी घराबाहेर पडल्याचे दिसत होते. शहरातील काॅलेज कार्नर, शिवाजी मंडई, रिसाला रोड, हरभट रोड, सांगली-मिरज रस्ता अशा अनेक रस्त्यांवर गर्दी होती. दुचाकी, चारचाकी वाहनांची तर रेलचेल होती. बाहेर पडणारे नागरिक हे अत्यावश्यक सेवेतील आहेत की नाही, याची साधी चौकशीही केली जात नव्हती. सर्वत्र नागरिक, वाहनधारकांचा मुक्त संचार सुरू होता. सार्वजनिक वाहतूक व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद होती. अत्यावश्यक सेवा असे स्टीकर लावून अनेक वाहने रस्त्यावर उतरली होती. एकूणच शहरात संचारबंदीचा परिणाम कुठेच दिसत नव्हता. दुपारी पोलिसांनी संचलन केल्यानंतर शहरातील वर्दळ कमी झाली.

चौकट

चौकात बॅरिकेड्स आणि पोलीसही

शहरात सकाळच्या टप्प्यात काही ठिकाणी पोलिसांनी वाहनधारकांना अडवून चौकशी केली. पण काही वेळातच ही तपासणीही थांबली. चौकाचौकात पोलिसांनी बॅरिकेड्स लावली आहेत. पोलिसांचा बंदोबस्तही तैनात केला आहे. अनेक ठिकाणी तर पोलीस असूनही नागरिकांची चौकशी होत नसल्याचे चित्र दिसत होते.

चौकट

बँकांसमोर रांगा

संचारबंदीच्या काळात शहरातील सर्वच बँकांसमोर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर गुरुवारी बँकांसमोर गर्दी पाहायला मिळाली. एटीएमवरही ग्राहकांची गर्दी होती.