शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

आळसंदच्या तलावातील ‘ताकारी’चे पाणी पेटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:28 IST

विटा : विटा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था केलेल्या आळसंद (ता. खानापूर) येथील कोरड्या पडलेल्या तलावात बुधवारी ताकारी योजनेचे ...

विटा : विटा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था केलेल्या आळसंद (ता. खानापूर) येथील कोरड्या पडलेल्या तलावात बुधवारी ताकारी योजनेचे पाणी दाखल होताच आजी-माजी आमदार समर्थकांत श्रेयवादाची ठिणगी पडली. सोशल मीडियावर दोन्ही गट सक्रिय झाले आहेत.

मंगळवारी आ. अनिल बाबर यांनी आळसंद तलावाची पाहणी करून पाटबंधारे अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतल्यानंतर माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी तलावाची पाहणी करण्याचा केवळ फार्स असल्याची टीका आ. बाबर यांच्यावर केली. त्यामुळे आळसंदच्या तलावात सोडण्यात आलेले ताकारी योजनेचे पाणी पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

विटा नगरपरिषदेची घोगावच्या कृष्णा नदीतून पिण्याची पाणी पुरवठा करणारी योजना आहे. मात्र, तेथे काही बिघाड झाला तर पर्यायी व्यवस्था म्हणून आळसंद तलावातील जलशुद्धिकरण केंद्रात पाणी घेऊन तेथून शहराला पाणी पुरवठा केला जातो. परंतु, महिनाभरापासून घोगाव योजनेच्या जलवाहिन्यांना गळती असल्याने तसेच आळसंद तलावात पाणीसाठा नसल्याने शहरात टंचाई निर्माण झाली आहे.

त्यामुळे आळसंद तलावात ताकारीचे पाणी सोडणे गरजेचे होते. त्यासाठी आ. बाबर यांनी आळसंद तलावाची पाहणी करून पाटबंधारे अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी तत्काळ पाणी सोडत असल्याचे सांगितले. त्यानंतर माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्या विनंतीवरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आदेश दिल्याने ताकारीचे पाणी आळसंद तलावात आल्याचे सांगितले. विरोधकांनी आळसंद तलावाची केलेली पाहणी केवळ फार्स असल्याची टीका केली.

ताकारीचे पाणी बुधवारी आळसंद तलावात दाखल झाले आहे. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी ताकारी कालव्यातून पाणी येताना पुढे चालत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, तर माजी आ. पाटील समर्थक कार्यकर्त्यांनीही पालकमंत्र्यांमुळेच पाणी आल्याच्या पोस्ट टाकल्या आहेत.

त्यामुळे राजकीय श्रेयवादाला सुरुवात झाली आहे. मात्र, कोणामुळे पाणी आले यापेक्षा विटेकर नागरिकांची तहान भागणे महत्त्वाचे असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून व्यक्त होऊ लागल्या आहेत.

फोटो - ०५०५२०२१-विटा-ताकारी पाणी : ताकारी योजनेच्या कालव्यातून बुधवारी ताकारी योजनेचे पाणी आळसंद तलावात दाखल झाले. त्यामुळे विटेकर नागरिकांसह आळसंद परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.