शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

आळसंदच्या तलावातील ‘ताकारी’चे पाणी पेटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:28 IST

विटा : विटा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था केलेल्या आळसंद (ता. खानापूर) येथील कोरड्या पडलेल्या तलावात बुधवारी ताकारी योजनेचे ...

विटा : विटा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था केलेल्या आळसंद (ता. खानापूर) येथील कोरड्या पडलेल्या तलावात बुधवारी ताकारी योजनेचे पाणी दाखल होताच आजी-माजी आमदार समर्थकांत श्रेयवादाची ठिणगी पडली. सोशल मीडियावर दोन्ही गट सक्रिय झाले आहेत.

मंगळवारी आ. अनिल बाबर यांनी आळसंद तलावाची पाहणी करून पाटबंधारे अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतल्यानंतर माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी तलावाची पाहणी करण्याचा केवळ फार्स असल्याची टीका आ. बाबर यांच्यावर केली. त्यामुळे आळसंदच्या तलावात सोडण्यात आलेले ताकारी योजनेचे पाणी पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

विटा नगरपरिषदेची घोगावच्या कृष्णा नदीतून पिण्याची पाणी पुरवठा करणारी योजना आहे. मात्र, तेथे काही बिघाड झाला तर पर्यायी व्यवस्था म्हणून आळसंद तलावातील जलशुद्धिकरण केंद्रात पाणी घेऊन तेथून शहराला पाणी पुरवठा केला जातो. परंतु, महिनाभरापासून घोगाव योजनेच्या जलवाहिन्यांना गळती असल्याने तसेच आळसंद तलावात पाणीसाठा नसल्याने शहरात टंचाई निर्माण झाली आहे.

त्यामुळे आळसंद तलावात ताकारीचे पाणी सोडणे गरजेचे होते. त्यासाठी आ. बाबर यांनी आळसंद तलावाची पाहणी करून पाटबंधारे अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी तत्काळ पाणी सोडत असल्याचे सांगितले. त्यानंतर माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्या विनंतीवरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आदेश दिल्याने ताकारीचे पाणी आळसंद तलावात आल्याचे सांगितले. विरोधकांनी आळसंद तलावाची केलेली पाहणी केवळ फार्स असल्याची टीका केली.

ताकारीचे पाणी बुधवारी आळसंद तलावात दाखल झाले आहे. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी ताकारी कालव्यातून पाणी येताना पुढे चालत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, तर माजी आ. पाटील समर्थक कार्यकर्त्यांनीही पालकमंत्र्यांमुळेच पाणी आल्याच्या पोस्ट टाकल्या आहेत.

त्यामुळे राजकीय श्रेयवादाला सुरुवात झाली आहे. मात्र, कोणामुळे पाणी आले यापेक्षा विटेकर नागरिकांची तहान भागणे महत्त्वाचे असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून व्यक्त होऊ लागल्या आहेत.

फोटो - ०५०५२०२१-विटा-ताकारी पाणी : ताकारी योजनेच्या कालव्यातून बुधवारी ताकारी योजनेचे पाणी आळसंद तलावात दाखल झाले. त्यामुळे विटेकर नागरिकांसह आळसंद परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.