शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

आळसंदच्या तलावातील ‘ताकारी’चे पाणी पेटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:28 IST

विटा : विटा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था केलेल्या आळसंद (ता. खानापूर) येथील कोरड्या पडलेल्या तलावात बुधवारी ताकारी योजनेचे ...

विटा : विटा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था केलेल्या आळसंद (ता. खानापूर) येथील कोरड्या पडलेल्या तलावात बुधवारी ताकारी योजनेचे पाणी दाखल होताच आजी-माजी आमदार समर्थकांत श्रेयवादाची ठिणगी पडली. सोशल मीडियावर दोन्ही गट सक्रिय झाले आहेत.

मंगळवारी आ. अनिल बाबर यांनी आळसंद तलावाची पाहणी करून पाटबंधारे अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतल्यानंतर माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी तलावाची पाहणी करण्याचा केवळ फार्स असल्याची टीका आ. बाबर यांच्यावर केली. त्यामुळे आळसंदच्या तलावात सोडण्यात आलेले ताकारी योजनेचे पाणी पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

विटा नगरपरिषदेची घोगावच्या कृष्णा नदीतून पिण्याची पाणी पुरवठा करणारी योजना आहे. मात्र, तेथे काही बिघाड झाला तर पर्यायी व्यवस्था म्हणून आळसंद तलावातील जलशुद्धिकरण केंद्रात पाणी घेऊन तेथून शहराला पाणी पुरवठा केला जातो. परंतु, महिनाभरापासून घोगाव योजनेच्या जलवाहिन्यांना गळती असल्याने तसेच आळसंद तलावात पाणीसाठा नसल्याने शहरात टंचाई निर्माण झाली आहे.

त्यामुळे आळसंद तलावात ताकारीचे पाणी सोडणे गरजेचे होते. त्यासाठी आ. बाबर यांनी आळसंद तलावाची पाहणी करून पाटबंधारे अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी तत्काळ पाणी सोडत असल्याचे सांगितले. त्यानंतर माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्या विनंतीवरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आदेश दिल्याने ताकारीचे पाणी आळसंद तलावात आल्याचे सांगितले. विरोधकांनी आळसंद तलावाची केलेली पाहणी केवळ फार्स असल्याची टीका केली.

ताकारीचे पाणी बुधवारी आळसंद तलावात दाखल झाले आहे. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी ताकारी कालव्यातून पाणी येताना पुढे चालत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, तर माजी आ. पाटील समर्थक कार्यकर्त्यांनीही पालकमंत्र्यांमुळेच पाणी आल्याच्या पोस्ट टाकल्या आहेत.

त्यामुळे राजकीय श्रेयवादाला सुरुवात झाली आहे. मात्र, कोणामुळे पाणी आले यापेक्षा विटेकर नागरिकांची तहान भागणे महत्त्वाचे असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून व्यक्त होऊ लागल्या आहेत.

फोटो - ०५०५२०२१-विटा-ताकारी पाणी : ताकारी योजनेच्या कालव्यातून बुधवारी ताकारी योजनेचे पाणी आळसंद तलावात दाखल झाले. त्यामुळे विटेकर नागरिकांसह आळसंद परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.