शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

सात गावांचे पाणी बंद होणार

By admin | Updated: July 16, 2015 00:08 IST

तानंग नळ योजना अडचणीत : काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

मिरज : तानंगसह सात गावांची नळपाणी पुरवठा योजना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने घ्यावी, अन्यथा ही पाणी योजना ३ आॅगस्टपासून बंद करण्याचा फतवा जीवन प्राधिकरण विभागाने काढला आहे. हा निर्णय रद्द करून सुरळीत पाणी पुरवठा करावा, अन्यथा मिरजेतील जीवन प्राधिकरण विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सुभाष खोत यांनी दिला आहे. तानंग प्रादेशिक योजनेत सावळी, कानडवाडी, सुभाषनगरसह ७ गावांचा समावेश आहे. सुमारे एक कोटीचा तोटा असल्याने ही योजनाच बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कुपवाड औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांच्या प्रदूषित सांडपाण्यामुळे सावळी, कानडवाडी, तानंगच्या विहिरी, कूपनलिकांचे पाणी खराब झाले आहे. पिण्याच्या पाण्याची अशी गंभीर परिस्थिती असताना, नळपाणी योजना बंद करण्याचा घाट घालण्यात आला आहे. जिल्हा परिषदेकडे ही योजना हस्तांतरित करून जबाबदारी टाळण्याचा प्रकार होत आहे. जीवन प्राधिकरण विभागानेच योजना चालवून थकित रक्कम माफ करावी. पावसाअभावी शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे आहे. योजनेचे पाणी बंद करून जखमेवर मीठ चोळण्याऐवजी पाणी योजना हस्तांतरणाची प्रक्रिया थांबवावी. पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा ३१ जुलैपासून मिरजेतील जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर विविध गावांतील पदाधिकाऱ्यांसह आंदोलन करणार असल्याचे खोत यांनी सांगितले. (वार्ताहर)तीन आॅगस्टची डेडलाईनतानंग, सावळी, कानडवाडी, सुभाषनगरसह सात गावांच्या प्रादेशिक नळ योजनेची एक कोटी रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी तीन आॅगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत थकबाकी जमा न झाल्यास योजनाच बंद करण्याचा फतवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काढला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पळापळ करावी लागणार आहे.