शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

शिराळा तालुक्यात पाणी टंचाई

By admin | Updated: December 8, 2015 00:45 IST

पिकचेही नुकसान : पाणी साठ्याने तळ गाठला

सहदेव खोत-- पुनवत --शिराळा तालुक्यात नोव्हेंबर संपण्याआधीच तलाव, छोटी-मोठी धरणे यातील पाणीसाठा कमालीचा कमी होत आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्याला बराच अवधी असतानाच शिराळा तालुकावासीयांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. पाण्याच्या समस्येबरोबरच भागातील शेतकऱ्यांना आता पीक, पशुधन जगविण्यासाठी मोठे कष्ट सोसावे लागणार आहेत.तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झाला आहे. परिणामी पाणीसाठे पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. तालुक्यात सुमारे ५३ तलाव व लहान-मोठी धरणे आहेत. दरवर्षी हे तलाव, धरणे पावसामुळे भरत असतात. मात्र यावर्षी विचित्र चित्र पाहावयास मिळत आहे. आता चक्क नोव्हेंबरमध्येच परिसरातील अनेक गावांतील तलाव कोरडे पडले असून पाण्याने तळ गाठला आहे. नोव्हेंबरमध्ये पाण्याची अशी परिस्थिती निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे उन्हाळ्यापर्यंत पुरणारे पाणीसाठे आताच कोरडे पडले आहेत. पाणीसाठे कोरडे पडल्याने जनावरांच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न तीव्र बनत चाललेला आहे, तर शेतीला मोठा फटका बसण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांना आता केवळ वारणा व मोरणा नदीच्या पाण्यावरच शेती पिकविण्याच्या आशा उरल्या आहेत.कमी पावसामुळे भुईमूग, ज्वारी, सोयाबीन, पावटा आदी पिकांचे मोठे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागले आहे. तसेच सध्या उपलब्ध असलेली पिके लाभतीलच याची शाश्वती शेतकऱ्यांना नाही. त्यामुळे तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेकऱ्यांकडून होत आहे. संकट वीज टंचाईचेहीतालुक्यात कमी पावसामुळे उपलब्ध पाणीसाठा जास्त काळ पुरविण्यासाठी वीज कपात होणार असून शेतीसाठी काही तासच वीज मिळणार आहे. त्यामुळे पाण्याबरोबरच वीज टंचाईचाही सामना शेतकऱ्यांना करावा लागणार असल्याचे चित्र आहे