शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिराळा तालुक्यात पाणी टंचाई

By admin | Updated: December 8, 2015 00:45 IST

पिकचेही नुकसान : पाणी साठ्याने तळ गाठला

सहदेव खोत-- पुनवत --शिराळा तालुक्यात नोव्हेंबर संपण्याआधीच तलाव, छोटी-मोठी धरणे यातील पाणीसाठा कमालीचा कमी होत आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्याला बराच अवधी असतानाच शिराळा तालुकावासीयांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. पाण्याच्या समस्येबरोबरच भागातील शेतकऱ्यांना आता पीक, पशुधन जगविण्यासाठी मोठे कष्ट सोसावे लागणार आहेत.तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झाला आहे. परिणामी पाणीसाठे पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. तालुक्यात सुमारे ५३ तलाव व लहान-मोठी धरणे आहेत. दरवर्षी हे तलाव, धरणे पावसामुळे भरत असतात. मात्र यावर्षी विचित्र चित्र पाहावयास मिळत आहे. आता चक्क नोव्हेंबरमध्येच परिसरातील अनेक गावांतील तलाव कोरडे पडले असून पाण्याने तळ गाठला आहे. नोव्हेंबरमध्ये पाण्याची अशी परिस्थिती निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे उन्हाळ्यापर्यंत पुरणारे पाणीसाठे आताच कोरडे पडले आहेत. पाणीसाठे कोरडे पडल्याने जनावरांच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न तीव्र बनत चाललेला आहे, तर शेतीला मोठा फटका बसण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांना आता केवळ वारणा व मोरणा नदीच्या पाण्यावरच शेती पिकविण्याच्या आशा उरल्या आहेत.कमी पावसामुळे भुईमूग, ज्वारी, सोयाबीन, पावटा आदी पिकांचे मोठे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागले आहे. तसेच सध्या उपलब्ध असलेली पिके लाभतीलच याची शाश्वती शेतकऱ्यांना नाही. त्यामुळे तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेकऱ्यांकडून होत आहे. संकट वीज टंचाईचेहीतालुक्यात कमी पावसामुळे उपलब्ध पाणीसाठा जास्त काळ पुरविण्यासाठी वीज कपात होणार असून शेतीसाठी काही तासच वीज मिळणार आहे. त्यामुळे पाण्याबरोबरच वीज टंचाईचाही सामना शेतकऱ्यांना करावा लागणार असल्याचे चित्र आहे