शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

‘म्हैसाळ’चे पाणी कवठेमहांकाळ तालुक्यात पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:48 IST

मिरज : म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू झाल्यानंतर कवठेमहांकाळ तालुक्यात पाणी पोहोचले आहे. दोन दिवसांत जतपर्यंत पाणी ...

मिरज : म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू झाल्यानंतर कवठेमहांकाळ तालुक्यात पाणी पोहोचले आहे. दोन दिवसांत जतपर्यंत पाणी पोहोचण्याची शक्यता आहे. उन्हाळी आवर्तन जूनपर्यंत सुरू राहणार आहे.

म्हैसाळ योजना सुरू झाल्याने मिरज पूर्व भागासह जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला आहे. दरवर्षी फेब्रुवारीपासून उन्हाळी व पावसाळ्यानंतर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्यात येते.

गतवर्षी चांगल्या पावसामुळे पाण्याला मागणी नसल्याने नोव्हेंबर व डिसेंबरचे आवर्तन रद्द करण्यात आले होते. मात्र, फेब्रुवारीअखेर उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याने आवर्तन सुरू करण्यात आले आहे. विहीर व कूपनलिकाची पाणीपातळी घटल्याने सद्यःस्थितीत पिकांना पाण्याची गरज आहे. म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू झाल्यानंतर कवठेमहांकाळ तालुक्यात पाणी पोहोचले असून, विस्तारित गव्हाण योजना सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसांत जतपर्यंत पाणी पोहोचणार आहे. म्हैसाळचे आवर्तन जूनपर्यंत सुरू राहणार असल्याने शेती व पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होणार आहे.