शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
3
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
4
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
5
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
6
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
7
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
8
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
9
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
10
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
11
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
12
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
13
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
14
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  
15
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश
16
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
17
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
18
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
19
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
20
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!

पाणी योजनांची पाणीपट्टी भरणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:25 IST

सांगली : शेतकऱ्यांना शेतीसाठी व ग्रामीण भागातील टंचाई दूर करण्यासाठी लाभदायी ठरणाऱ्या पाणी योजनांची पाणीपट्टी भरणे आवश्यक आहे. पाणीपट्टी ...

सांगली : शेतकऱ्यांना शेतीसाठी व ग्रामीण भागातील टंचाई दूर करण्यासाठी लाभदायी ठरणाऱ्या पाणी योजनांची पाणीपट्टी भरणे आवश्यक आहे. पाणीपट्टी भरल्यास योजनांचे आवर्तन चालू ठेवणे यंत्रणेस सोयीस्कर जात असल्याने थकबाकी ठेवू नये, तरीही कोणी अनधिकृतपणे पाणी वापर करत असल्याच्या त्याच्यावर कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रविवारी सांगलीत दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा व उपसा सिंचन योजनांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री पाटील बोलत होते. पालकमंत्री जयंत म्हणाले, सध्या या भागात उपसा सिंचन योजनेची काही कामे सुरू आहेत. या सर्व कामांचा चांगला दर्जा ठेवावा. पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी पावसाळ्यातच पुराच्या पाण्याने तलाव, विहिरी भरून घेण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे.जास्त लोकसंख्या असलेली गावांसाठी स्वतंत्र योजना करून प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेतून बाहेर पडली आहेत. त्यामुळे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना बंद आहेत. लहान गावांसाठी स्वतंत्र योजना राबविण्यास प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून नाव वगळल्याचा दाखला मिळण्यासाठी आलेल्या प्रस्तावांबाबत चर्चा करून प्रश्न सोडविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, कार्यकारी अभियंता सुर्यकांत नलवडे, सचिन पवार, अभिनंदन हरूगडे, ज्योती देवकर आदी उपस्थित होते.