शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाणी योजनांची पाणीपट्टी भरणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:25 IST

सांगली : शेतकऱ्यांना शेतीसाठी व ग्रामीण भागातील टंचाई दूर करण्यासाठी लाभदायी ठरणाऱ्या पाणी योजनांची पाणीपट्टी भरणे आवश्यक आहे. पाणीपट्टी ...

सांगली : शेतकऱ्यांना शेतीसाठी व ग्रामीण भागातील टंचाई दूर करण्यासाठी लाभदायी ठरणाऱ्या पाणी योजनांची पाणीपट्टी भरणे आवश्यक आहे. पाणीपट्टी भरल्यास योजनांचे आवर्तन चालू ठेवणे यंत्रणेस सोयीस्कर जात असल्याने थकबाकी ठेवू नये, तरीही कोणी अनधिकृतपणे पाणी वापर करत असल्याच्या त्याच्यावर कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रविवारी सांगलीत दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा व उपसा सिंचन योजनांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री पाटील बोलत होते. पालकमंत्री जयंत म्हणाले, सध्या या भागात उपसा सिंचन योजनेची काही कामे सुरू आहेत. या सर्व कामांचा चांगला दर्जा ठेवावा. पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी पावसाळ्यातच पुराच्या पाण्याने तलाव, विहिरी भरून घेण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे.जास्त लोकसंख्या असलेली गावांसाठी स्वतंत्र योजना करून प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेतून बाहेर पडली आहेत. त्यामुळे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना बंद आहेत. लहान गावांसाठी स्वतंत्र योजना राबविण्यास प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून नाव वगळल्याचा दाखला मिळण्यासाठी आलेल्या प्रस्तावांबाबत चर्चा करून प्रश्न सोडविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, कार्यकारी अभियंता सुर्यकांत नलवडे, सचिन पवार, अभिनंदन हरूगडे, ज्योती देवकर आदी उपस्थित होते.