-----------------
वाढत्या शेतमजुरीने शेतकरी त्रस्त
सांगली : आता शेतीमधील उन्हाळी कामांनी गती घेतली आहे. मात्र, अनेक ठिकाणी शेतमजुरांकडून शेतकरी वर्गाची जादा मजुरीसाठी अडवणूक होत आहे. जादा मोबदला देऊनदेखील अपेक्षित काम होत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त आहेत.
-------------
जिल्ह्यात नदीकाठ खचू लागला
सांगली : महापूर तसेच नंतरच्या अतिवृष्टीमुळे कृष्णा तसेच वारणाकाठची शेतजमीन आता खचू लागली आहे. अनेक ठिकाणी जमिनीचे कडेच्या कडे उन्मळून नदीपात्रात पडू लागले आहेत. त्यामुळे नदीकाठावरील शेतीला धोका निर्माण होऊ लागला आहे.
----------------
राम मंदिर-सिव्हिल रस्त्याचे काम पूर्ण करा
सांगली : शहरातील राम मंदिर चौक ते सिव्हिल हॉस्पिटल रस्ता गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. हा मार्ग बंद असल्याने रुग्णवाहिका व इतर वाहनांना दूरच्या रस्त्याने जावे लागत आहे. रस्त्याचे काम तत्काळ संपवून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी होत आहे.
-----------------
प्लास्टिकने जनावरांचे आरोग्य धोक्यात
सांगली : शहरात अनेक मोकाट जनावरे फिरत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी परिसरात फेकलेला केरकचरा, प्लास्टिक ही जनावरे खात असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यातून अनेकदा जनावरांचा मृत्यू होण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
------------