शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मतदारराजा आज देणार महाकौल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 23:27 IST

 सांगली । जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी सोमवारी मतदान होणार असून, जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार ...

 सांगली । जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी सोमवारी मतदान होणार असून, जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. २0१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलताना मोठी उलथापालथ झाली होती. त्यामुळे महायुती आणि महाआघाडीसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. बहुतांश मतदारसंघात तुल्यबळ उमेदवारांमुळे लढती चुरशीच्या ठरल्या आहेत. प्रचाराची रणधुमाळी शांत झाल्यानंतर आता प्रत्यक्ष मतदानाची वेळ आल्याने उमेदवार, त्यांचे समर्थक व राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अपेक्षित कौल मिळावा म्हणून देव पाण्यात ठेवले आहेत. दुसरीकडे प्रशासनाने मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून प्रयत्न चालविले आहेत.कडेकोट बंदोबस्त२,५०० स्थानिक पोलीस, ३००0 होमगार्डस्, केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या, कोल्हापूर, कर्नाटक तसेच अतिरिक्त पोलीस बळ मदतीला, रात्रंदिवस गस्त, आकस्मिक नाकेबंदी, सर्वच आठ मतदारसंघांत कडेकोट बंदोबस्त.कुठे काही गडबड झाली तर काय?शहरातील कोणत्याही भागात मतदानाच्यावेळी कसलीही गडबड झाली किंवा कुठे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली तर, अवघ्या ५ ते ७ मिनिटात शीघ्र कृती दल (क्यूआरटी) तेथे पोहोचेल. कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सीआयएसएफ आणि एसआरपीएफची कंपनी तात्काळ धाव घेईल आणि स्थिती निर्माण करणाऱ्यावर कडक कारवाई करेल. सोमवारी सकाळपासून मतदान संपेपर्यंत पोलीसप्रमुख ते पोलीस कर्मचारी असे सर्वच बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळणार आहेत.मतदारांसाठी ३५३0 व्हीव्हीपॅटविधानसभा निवडणुकीत पारदर्शी मतदान व्हावे, यासाठी ३ हजार ५३0 व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफायबल पेपर आॅडिट्रेल) यंत्रांचा वापर केला जाणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. मतदान केल्यानंतर सात सेकंदामध्ये मतदाराला पावती मिळेल. त्यावर निवडणूक चिन्ह, नाव व उमेदवाराचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक नमूद असेल. या पावतीमुळे मतदाराने दिलेल्या मताची खात्री करणे शक्य आहे.ईव्हीएम बिघडल्यास काय आहे व्यवस्था?ईव्हीएम मशीन बिघडण्याची शक्यता लक्षात घेता आधीपासूनच अतिरिक्त मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. बिघाड झाल्यास त्याठिकाणी अतिरिक्त मशीन बसविण्यात येईल. मतदान प्रक्रियेसाठी एकूण बॅलेट युनिट ४ हजार ५४0, सेंट्रल युनिट ३ हजार २७0 ठेवण्यात आली आहेत.मतदानासाठी ‘सुटी’ जाहीर झाली का?सर्व आस्थापना सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळात बंद ठेवण्यात येतील. त्या दिवशी बंद राहिलेली दुकाने, आस्थापनामधील कर्मचाºयांच्या पगाराची कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येणार नाही, असे अप्पर कामगार आयुक्त यांनी कळविले आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी आदींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी दोन तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.