शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

कडेगाव तालुक्यात गावाेगावचे रस्ते अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:19 IST

शासनस्तरावर ग्रामविकास विभागाकडून मिळणाऱ्या चाैदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतील २५ टक्के रकमेतून पथदिव्यांचे वीजबिल भरण्याची तरतूद आहे. ...

शासनस्तरावर ग्रामविकास विभागाकडून मिळणाऱ्या चाैदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतील २५ टक्के रकमेतून पथदिव्यांचे वीजबिल भरण्याची तरतूद आहे. ही २५ टक्के रक्कम कपात करून घेऊनच जिल्हा परिषदेने उर्वरित ७५ टक्के रक्कम ग्रामपंचायतींकडे वर्ग केली आहे. राज्य शासन व जिल्हा परिषदेकडून महावितरणकडे ही रक्कम भरलेली नसल्याने महावितरणने पथदिव्यांचा वीजपुरवठा बंद करण्याची मोहीम उघडली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत व ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेकडून मात्र याबाबत ग्रामपंचायतीना कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांचे वीज बिल भरण्यासाठी शासन स्तरावर ग्रामविकास विभागाकडून अंदाजपत्रकामध्येच वित्त आयोगाच्या निधीतच तरतूद केली जाते. ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदेकडे प्राप्त झालेली रक्कम पथदिव्यांच्या बिलासाठी महावितरणकडे परस्पर दिली जाते. परंतु वीज बिलाची थकबाकी कोट्यवधी रुपयांच्या घरात गेली आहे. त्यामुळे महावितरणने ग्रामपंचायतींना कोणतीही सूचना न देता एकापाठोपाठ एक ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांचे कनेक्‍शन तोडण्याची मोहीम उघडली आहे. कडेगाव तालुक्यातील अनेक गावांच्या पथदिव्यांचा वीज पुरवठा ताेडला आहे. त्यामुळे गावांमधील प्रमुख रस्ते अंधारात बुडाले आहेत. वीज कनेक्‍शन तोडल्यामुळे गावपातळीवरून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. वीजबिल भरण्याची जबाबदारी ग्रामविकास विभागाची व जिल्हा परिषदेची आहे. ही वीजबिलाची रक्कमही खूप मोठी आहे. १० लाखांपासून १ कोटींपर्यंतची बिले महावितरणने ग्रामपंचायतीकडे दिली आहेत. त्याचे सविस्तरपणे विवरण मात्र दिलेले नाही. महावितरणने वीज तोडल्यामुळे सद्यस्थितीत तालुक्यातील बहुतांशी सर्व गावे अंधारात आहेत. त्यामुळे तेथे अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तसेच चोऱ्यांची भीतीही व्यक्त केली जात आहे.

चौकट :

‘ती’ रक्कम शासनाकडे की जिल्हा परिषदेकडे?

चाैदावा वित्त आयोग सुरू झाला तेव्हापासून या निधीतील २५ टक्के रक्कम पथदिव्यांच्या बिलासाठी कपात करून घेऊन उर्वरित ७५ टक्के रक्कम ग्रामपंचायतींकडे वर्ग केली जाते. कपात केलेली २५ टक्के रक्कम जिल्हा परिषदेकडे आहे की राज्य शासनाकडून येणार आहे, याबाबत ग्रामपंचायतींना कोणतीही अधिकृत माहिती नाही.