शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

विवेकाचे आणि संत विचारांचे खूप जवळचे नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:19 IST

संजयनगर : विवेकाचे आणि संत विचारांचे खूप जवळचे नाते आहे, असे प्रतिपादन ॲड. देवदत्त परुळेकर यांनी केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा ...

संजयनगर : विवेकाचे आणि संत विचारांचे खूप जवळचे नाते आहे, असे प्रतिपादन ॲड. देवदत्त परुळेकर यांनी केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आषाढी वारीनिमित्त ‘विवेकाची वारी’ या तीन दिवसीय ऑनलाईन व्याख्यानमालेची सुरुवात शुक्रवारपासून झाली. यात पहिल्या दिवशी ‘संत विचार आणि धर्म चिकित्सा’ या विषयावर ॲड. देवदत्त परुळेकर यांनी व्याख्यान दिले.

ते म्हणाले, संत आणि विवेक हे वेगळे होऊ शकत नाहीत. राजकीय क्रांती व्हायची असेल, तर त्यासाठी सामाजिक आणि धार्मिक क्रांती व्हावी लागेल, असे आंबेडकर म्हणत. त्यासाठी बाबासाहेब हे गौतम बुद्ध, गुरुनानक आणि महाराष्ट्रातील संतांच्या योगदानाचा जयजयकार करतात. हेच प्रतिपादन महादेव गोविंद रानडे हे त्यांच्या ‘राईज् ऑफ मराठा पॉवर’ या पुस्तकात केले आहे. आपल्या महाराष्ट्राला समाज सुधारकांचा माेठा वारसा आहे, त्यामध्ये फुले, शाहू, आंबेडकर, गांधी यांनी धर्माला मानलेले आहे आणि धर्माची चिकित्सासुद्धा केली आहे.

ॲड. परुळेकर म्हणाले, मुळात संत कुणाला म्हणायचे, यातूनच आपली धर्माची चिकित्सा सुरू होऊ शकते. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, संत मुक्ताबाई यांनी संतांची व्याख्या वेगवेगळ्या शब्दांत केली आहे. प्रत्येक धर्मात काही शाश्वत मूल्ये, काही कर्मकांड, मिथके आणि शोषण असते. संतांनी या धर्माची चिकित्सा या चार पातळीवर केलेली आहे. आपल्या तत्त्वज्ञानात असलेली धर्म, अर्थ, काम, मोक्ष ही चौकट संतांनी नाकारली आहे. भक्तीमध्येच मुक्ती सांगितली आहे. वारकरी संप्रदायातील सगळ्या संतांनी मोक्ष, मुक्ती, आणि स्वर्ग-नरक ही संकल्पना नाकारली आहे. पाप-पुण्य संकल्पनेला परोपकार आणि परपीडा याच्या नजरेतून नवीन आकलन दिले. देवाची पूजा करण्यासाठी यम-नियम, उपास-तापास करण्याची गरज नाही हे सांगितले आहे.

सुनीता देवलवार यांनी परिचय करून दिला. सुनील स्वामी यांनी प्रास्ताविक केले. धनंजय कोठावळे यांनी सूत्रसंचालन केले.