शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
4
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
5
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
6
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
7
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
8
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
9
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
10
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
11
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
12
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
13
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
14
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
15
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
16
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
18
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
19
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
20
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा

मुंबईची बाजारपेठ थांबल्यामुळे भाजीपाला तेलंगणा, कर्नाटकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:26 IST

सांगली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाऊन असल्यामुळे मुंबई, पुणे शहरांतील भाजीपाल्याची मागणी घटली आहे. मुंबई, पुणेला रोज सांगली ...

सांगली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाऊन असल्यामुळे मुंबई, पुणे शहरांतील भाजीपाल्याची मागणी घटली आहे. मुंबई, पुणेला रोज सांगली जिल्ह्यातून १२० ते १३० टनांपर्यंत भाजीपाला जात होता. सध्या २० ते ३० टनही भाजीपाल्याचा तेथे उठाव होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनीच मुंबई, पुणेऐवजी कर्नाटक, तेलंगण राज्यात भाजीपाला पाठविण्यास सुरुवात केली आहे. पण, तेथेही वांगी, टोमॅटो, कोबी, ढोबळी मिरचीचे दर ५० टक्क्यांनी घटले आहेत.

जिल्ह्यातील वाळवा, मिरज, आटपाडी, तासगाव, खानापूर, पलूस तालुक्यांतून वांगी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, हिरवी मिरची, ढोबळी मिरचेच बारा ते तेरा ट्रक माल रोज मुंबई, पुण्यात जात होते. लॉकडाऊन लागण्यापूर्वी ढोबळी मिरचीला किलो ४० ते ४५ रुपये, वांगी, १८ ते २०, टोमॅटो ३०, कोबी १० ते १५, फ्लॉवर १० ते १५ आणि हिरवी मिरचीला ३५ रुपये किलो दर होता. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून या दरात ५० टक्क्यांनी घट झाली आहे. रोज मुंबई, पुण्याला बारा ते तेरा ट्रकमधून १२० ते १३० टन भाजीपाला जात होता. लॉकडाऊन लागल्यामुळे मुंबई, पुणे येथील भाजीपाला विक्रेत्यांची विक्रीच बंद झाली आहे. यामुळे दहा ते पंधरा टन भाजीपाला गेला तरीही खपत नसल्याच्या व्यापाऱ्यांच्या तक्रारी आहेत. ढोबळी मिरचीला ४५ रुपये किलोचा दर सध्या १२ रुपये झाला आहे. वांगी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवरचे दर खूपच गडगडले आहेत. मुंबई, पुणे येथील बाजारपेठ थांबल्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन भाजीपाला कर्नाटकातील म्हैसूर, हसन, बंगलोर आणि तेलंगणा राज्यांतील हैदराबादला पाठवीत आहेत. पण, येथेही वाहतुकीचा खर्च वजा जाता वांगी, टोमॅटो, दोडका, ढोंबळी मिरची, कोबी, फ्लॉवरला किलोला तीन ते चार रुपयेच शेतकऱ्यांच्या पदरात पडत आहे. या पैशातून उत्पादन खर्चही मिळत नाही, तरीही शेतात पीक सडण्यापेक्षा मिळेल त्या दराने शेतकरी शेतमालाची विक्री करीत आहे.

चौकट -

भाजीपाला विक्रीस बंदी नसतानाही व्यापाऱ्यांनी दर पाडले

शासनाने लॉकडाऊनमधून भाजीपाला विक्रीवर कोणतेही बंदणे घातले नाहीत. तरीही मुंबई, पुणे येथील मोठ्या व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनच्या नावाखाली भाजीपाल्याचे दर पाडल्यामुळे शेतकरी खूप मोठ्या आर्थिक संकटात आहे. कवडीमोल दराने भाजीपाल्याची विक्री होत आहे, याकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रीया भाजीपाला उत्पादक शेतकरी महादेव पाटील यांनी दिली.