शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईची बाजारपेठ थांबल्यामुळे भाजीपाला तेलंगणा, कर्नाटकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:26 IST

सांगली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाऊन असल्यामुळे मुंबई, पुणे शहरांतील भाजीपाल्याची मागणी घटली आहे. मुंबई, पुणेला रोज सांगली ...

सांगली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाऊन असल्यामुळे मुंबई, पुणे शहरांतील भाजीपाल्याची मागणी घटली आहे. मुंबई, पुणेला रोज सांगली जिल्ह्यातून १२० ते १३० टनांपर्यंत भाजीपाला जात होता. सध्या २० ते ३० टनही भाजीपाल्याचा तेथे उठाव होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनीच मुंबई, पुणेऐवजी कर्नाटक, तेलंगण राज्यात भाजीपाला पाठविण्यास सुरुवात केली आहे. पण, तेथेही वांगी, टोमॅटो, कोबी, ढोबळी मिरचीचे दर ५० टक्क्यांनी घटले आहेत.

जिल्ह्यातील वाळवा, मिरज, आटपाडी, तासगाव, खानापूर, पलूस तालुक्यांतून वांगी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, हिरवी मिरची, ढोबळी मिरचेच बारा ते तेरा ट्रक माल रोज मुंबई, पुण्यात जात होते. लॉकडाऊन लागण्यापूर्वी ढोबळी मिरचीला किलो ४० ते ४५ रुपये, वांगी, १८ ते २०, टोमॅटो ३०, कोबी १० ते १५, फ्लॉवर १० ते १५ आणि हिरवी मिरचीला ३५ रुपये किलो दर होता. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून या दरात ५० टक्क्यांनी घट झाली आहे. रोज मुंबई, पुण्याला बारा ते तेरा ट्रकमधून १२० ते १३० टन भाजीपाला जात होता. लॉकडाऊन लागल्यामुळे मुंबई, पुणे येथील भाजीपाला विक्रेत्यांची विक्रीच बंद झाली आहे. यामुळे दहा ते पंधरा टन भाजीपाला गेला तरीही खपत नसल्याच्या व्यापाऱ्यांच्या तक्रारी आहेत. ढोबळी मिरचीला ४५ रुपये किलोचा दर सध्या १२ रुपये झाला आहे. वांगी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवरचे दर खूपच गडगडले आहेत. मुंबई, पुणे येथील बाजारपेठ थांबल्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन भाजीपाला कर्नाटकातील म्हैसूर, हसन, बंगलोर आणि तेलंगणा राज्यांतील हैदराबादला पाठवीत आहेत. पण, येथेही वाहतुकीचा खर्च वजा जाता वांगी, टोमॅटो, दोडका, ढोंबळी मिरची, कोबी, फ्लॉवरला किलोला तीन ते चार रुपयेच शेतकऱ्यांच्या पदरात पडत आहे. या पैशातून उत्पादन खर्चही मिळत नाही, तरीही शेतात पीक सडण्यापेक्षा मिळेल त्या दराने शेतकरी शेतमालाची विक्री करीत आहे.

चौकट -

भाजीपाला विक्रीस बंदी नसतानाही व्यापाऱ्यांनी दर पाडले

शासनाने लॉकडाऊनमधून भाजीपाला विक्रीवर कोणतेही बंदणे घातले नाहीत. तरीही मुंबई, पुणे येथील मोठ्या व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनच्या नावाखाली भाजीपाल्याचे दर पाडल्यामुळे शेतकरी खूप मोठ्या आर्थिक संकटात आहे. कवडीमोल दराने भाजीपाल्याची विक्री होत आहे, याकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रीया भाजीपाला उत्पादक शेतकरी महादेव पाटील यांनी दिली.