शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

मुंबईची बाजारपेठ थांबल्यामुळे भाजीपाला तेलंगणा, कर्नाटकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:26 IST

सांगली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाऊन असल्यामुळे मुंबई, पुणे शहरांतील भाजीपाल्याची मागणी घटली आहे. मुंबई, पुणेला रोज सांगली ...

सांगली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाऊन असल्यामुळे मुंबई, पुणे शहरांतील भाजीपाल्याची मागणी घटली आहे. मुंबई, पुणेला रोज सांगली जिल्ह्यातून १२० ते १३० टनांपर्यंत भाजीपाला जात होता. सध्या २० ते ३० टनही भाजीपाल्याचा तेथे उठाव होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनीच मुंबई, पुणेऐवजी कर्नाटक, तेलंगण राज्यात भाजीपाला पाठविण्यास सुरुवात केली आहे. पण, तेथेही वांगी, टोमॅटो, कोबी, ढोबळी मिरचीचे दर ५० टक्क्यांनी घटले आहेत.

जिल्ह्यातील वाळवा, मिरज, आटपाडी, तासगाव, खानापूर, पलूस तालुक्यांतून वांगी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, हिरवी मिरची, ढोबळी मिरचेच बारा ते तेरा ट्रक माल रोज मुंबई, पुण्यात जात होते. लॉकडाऊन लागण्यापूर्वी ढोबळी मिरचीला किलो ४० ते ४५ रुपये, वांगी, १८ ते २०, टोमॅटो ३०, कोबी १० ते १५, फ्लॉवर १० ते १५ आणि हिरवी मिरचीला ३५ रुपये किलो दर होता. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून या दरात ५० टक्क्यांनी घट झाली आहे. रोज मुंबई, पुण्याला बारा ते तेरा ट्रकमधून १२० ते १३० टन भाजीपाला जात होता. लॉकडाऊन लागल्यामुळे मुंबई, पुणे येथील भाजीपाला विक्रेत्यांची विक्रीच बंद झाली आहे. यामुळे दहा ते पंधरा टन भाजीपाला गेला तरीही खपत नसल्याच्या व्यापाऱ्यांच्या तक्रारी आहेत. ढोबळी मिरचीला ४५ रुपये किलोचा दर सध्या १२ रुपये झाला आहे. वांगी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवरचे दर खूपच गडगडले आहेत. मुंबई, पुणे येथील बाजारपेठ थांबल्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन भाजीपाला कर्नाटकातील म्हैसूर, हसन, बंगलोर आणि तेलंगणा राज्यांतील हैदराबादला पाठवीत आहेत. पण, येथेही वाहतुकीचा खर्च वजा जाता वांगी, टोमॅटो, दोडका, ढोंबळी मिरची, कोबी, फ्लॉवरला किलोला तीन ते चार रुपयेच शेतकऱ्यांच्या पदरात पडत आहे. या पैशातून उत्पादन खर्चही मिळत नाही, तरीही शेतात पीक सडण्यापेक्षा मिळेल त्या दराने शेतकरी शेतमालाची विक्री करीत आहे.

चौकट -

भाजीपाला विक्रीस बंदी नसतानाही व्यापाऱ्यांनी दर पाडले

शासनाने लॉकडाऊनमधून भाजीपाला विक्रीवर कोणतेही बंदणे घातले नाहीत. तरीही मुंबई, पुणे येथील मोठ्या व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनच्या नावाखाली भाजीपाल्याचे दर पाडल्यामुळे शेतकरी खूप मोठ्या आर्थिक संकटात आहे. कवडीमोल दराने भाजीपाल्याची विक्री होत आहे, याकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रीया भाजीपाला उत्पादक शेतकरी महादेव पाटील यांनी दिली.