शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वसंतदादांच्या वारसदारांची संघर्ष एक्स्प्रेस

By admin | Updated: April 28, 2015 23:45 IST

जिल्हा बँक निवडणूक : विधानसभा, लोकसभा, कारखान्यानंतर आता बँकेत आमने-सामने--जिल्हा बँक निवडणूक

अविनाश कोळी - सांगली  --वसंतदादा घराण्यातील सत्तासंघर्षाची कहाणी जुनी आहे. विधानसभा, लोकसभा, वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना अशा अनेक निवडणुकांमध्ये एकमेकांशी लढलेले वारसदार आता याच परंपरेचा भाग म्हणून सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत आमने-सामने आले आहेत. दादा घराण्यातील फुटीचा मुद्दा या निवडणुकीत केंद्रस्थानी आल्याने, या निवडणुकीची चर्चा आता राज्यभर सुरू झाली आहे. सांगली जिल्ह्याच्या राजकारणात प्रदीर्घ काळ माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा प्रभाव राहिला. त्यांच्याभोवतीच कॉँग्रेस पक्षातील राजकारण फिरत राहिले. निष्ठावंतांबरोबरच बंडखोरांचा, स्वकियांच्या कुरघोड्यांचा अनुभव दादांनी व कॉँग्रेसनेही घेतला. संघर्षाची ही कहाणी स्वातंत्र्यानंतर लगेचच कॉँग्रेसच्या वाट्याला आली. वसंतदादांच्या घराण्यातील छुपा संघर्ष जुना असला तरी, १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत तो चव्हाट्यावर आला. त्यानंतर लोकसभा, वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना असा प्रवास करीत हा संघर्ष आता जिल्हा बॅँकेपर्यंत आला आहे. जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत आता मदन पाटील आणि विशाल पाटील हे दोन्ही चुलत बंधू एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. संघर्ष करूनही दादा घराण्यातील वारसदार अनेक कार्यक्रमांमध्ये पक्षीय राजकारणात, निवडणुकांत एकत्रही असतात. अशावेळी दादा घराण्यात कोणताही संघर्ष नसल्याचे वारंवार सांगण्यासही ते कमी पडत नाहीत. लोकसभा निवडणुकीत सुरुवातीच्या काळात मदन पाटील प्रचारात उतरले नव्हते. तेव्हाही या संघर्षाची जोरदार चर्चा सुरू होती. अल्पावधितच मदन पाटील प्रचारात उतरले आणि त्यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला. २००९ च्या विधानसभा निवडणुकीतही प्रतीक पाटील यांच्या भूमिकेबद्दल मदन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी साशंकता व्यक्त केली होती. २०१४ च्या निवडणुकीतही काही काळ मागील विधानसभा निवडणुकीचे पडसाद उमटले होते. शंकेच्या कुंपणातच दादांच्या वारसदारांमधील एकीची चर्चा केली जाते. प्रतीक पाटील, विशाल पाटील आणि मदन पाटील यांच्या बंधूंमधील संघर्षाला जिल्हा बॅँकेच्या निमित्ताने तोंड फुटले आहे. मदन पाटील हे वसंतदादांच्या विचारांचेही वारसदार नाहीत, अशी टीका विशाल पाटील यांनी नुकतीच केली. विशाल पाटील यांनी एका बाजूने मदन पाटील यांच्यावर टीका सुरू केली असताना, मदन पाटील शांत आहेत. त्यांनी अद्याप यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. तरीही विशाल पाटील यांच्याविरोधात लढण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. विचारांचा वारसा दोन्हीकडे असला तरी, संघर्षाची परंपराही या वारसदारांना लाभली आहे. त्यामुळेच टप्प्या-टप्प्यावर हे वारसदार आपसात लढण्याची संधी सोडत नसल्याचे चित्र आहे. दादा घराण्यात यानिमित्ताने पडलेली फूट आता जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा विषय बनली आहे. या चर्चेभोवतीच आता राजकारणही रंगले आहे. दादा घराण्यातील दोन वारसदार एकमेकांविरोधात लढत असल्याने जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचेही लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. अशी आहे परंपरा संघर्षाची...१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसतर्फे प्रकाशबापू पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्याचवेळी मदन पाटील यांनी बंडखोरी केली. चुलते-पुतणे एकमेकांच्या विरोधात मैदानात आले. उघडपणे मैदानात येण्याची ही कहाणी तशीच सुरू राहिली. १९९८ नंतर दादा घराण्यातील दोन कुटुंबांच्या वाटा वेगळ्या झाल्या. विष्णुअण्णांचे कुटुंब राष्ट्रवादीत, तर प्रकाशबापूंचे कुटुंब कॉँग्रेसमध्ये राहिले. त्यामुळे १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाशबापू व मदन पाटील पुन्हा आमने-सामने आले. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतही प्रकाशबापू व विष्णुअण्णा या दोघांनी वेगवेगळी पॅनेल उभी करून एकमेकांना आव्हान दिले होते.शंका-कुशंकाविधानसभा, लोकसभा निवडणुकीत कोणालाही उमेदवारी मिळाली, तरी घराण्यातील अंतर्गत छुप्या संघर्षाचा मुद्दा चर्चेला येतोच. दोन्ही कुटुंबांमधील नेत्यांच्या प्रत्येक कृतीवरून संशयकल्लोळही निर्माण होतो. २००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर या वारसदारांमधील हालचालींना शंका-कुशंकांचे ग्रहण लागले, ते अजून कायम आहे.