शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

वसंतदादांच्या वारसदारांची संघर्ष एक्स्प्रेस

By admin | Updated: April 28, 2015 23:45 IST

जिल्हा बँक निवडणूक : विधानसभा, लोकसभा, कारखान्यानंतर आता बँकेत आमने-सामने--जिल्हा बँक निवडणूक

अविनाश कोळी - सांगली  --वसंतदादा घराण्यातील सत्तासंघर्षाची कहाणी जुनी आहे. विधानसभा, लोकसभा, वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना अशा अनेक निवडणुकांमध्ये एकमेकांशी लढलेले वारसदार आता याच परंपरेचा भाग म्हणून सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत आमने-सामने आले आहेत. दादा घराण्यातील फुटीचा मुद्दा या निवडणुकीत केंद्रस्थानी आल्याने, या निवडणुकीची चर्चा आता राज्यभर सुरू झाली आहे. सांगली जिल्ह्याच्या राजकारणात प्रदीर्घ काळ माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा प्रभाव राहिला. त्यांच्याभोवतीच कॉँग्रेस पक्षातील राजकारण फिरत राहिले. निष्ठावंतांबरोबरच बंडखोरांचा, स्वकियांच्या कुरघोड्यांचा अनुभव दादांनी व कॉँग्रेसनेही घेतला. संघर्षाची ही कहाणी स्वातंत्र्यानंतर लगेचच कॉँग्रेसच्या वाट्याला आली. वसंतदादांच्या घराण्यातील छुपा संघर्ष जुना असला तरी, १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत तो चव्हाट्यावर आला. त्यानंतर लोकसभा, वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना असा प्रवास करीत हा संघर्ष आता जिल्हा बॅँकेपर्यंत आला आहे. जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत आता मदन पाटील आणि विशाल पाटील हे दोन्ही चुलत बंधू एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. संघर्ष करूनही दादा घराण्यातील वारसदार अनेक कार्यक्रमांमध्ये पक्षीय राजकारणात, निवडणुकांत एकत्रही असतात. अशावेळी दादा घराण्यात कोणताही संघर्ष नसल्याचे वारंवार सांगण्यासही ते कमी पडत नाहीत. लोकसभा निवडणुकीत सुरुवातीच्या काळात मदन पाटील प्रचारात उतरले नव्हते. तेव्हाही या संघर्षाची जोरदार चर्चा सुरू होती. अल्पावधितच मदन पाटील प्रचारात उतरले आणि त्यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला. २००९ च्या विधानसभा निवडणुकीतही प्रतीक पाटील यांच्या भूमिकेबद्दल मदन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी साशंकता व्यक्त केली होती. २०१४ च्या निवडणुकीतही काही काळ मागील विधानसभा निवडणुकीचे पडसाद उमटले होते. शंकेच्या कुंपणातच दादांच्या वारसदारांमधील एकीची चर्चा केली जाते. प्रतीक पाटील, विशाल पाटील आणि मदन पाटील यांच्या बंधूंमधील संघर्षाला जिल्हा बॅँकेच्या निमित्ताने तोंड फुटले आहे. मदन पाटील हे वसंतदादांच्या विचारांचेही वारसदार नाहीत, अशी टीका विशाल पाटील यांनी नुकतीच केली. विशाल पाटील यांनी एका बाजूने मदन पाटील यांच्यावर टीका सुरू केली असताना, मदन पाटील शांत आहेत. त्यांनी अद्याप यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. तरीही विशाल पाटील यांच्याविरोधात लढण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. विचारांचा वारसा दोन्हीकडे असला तरी, संघर्षाची परंपराही या वारसदारांना लाभली आहे. त्यामुळेच टप्प्या-टप्प्यावर हे वारसदार आपसात लढण्याची संधी सोडत नसल्याचे चित्र आहे. दादा घराण्यात यानिमित्ताने पडलेली फूट आता जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा विषय बनली आहे. या चर्चेभोवतीच आता राजकारणही रंगले आहे. दादा घराण्यातील दोन वारसदार एकमेकांविरोधात लढत असल्याने जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचेही लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. अशी आहे परंपरा संघर्षाची...१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसतर्फे प्रकाशबापू पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्याचवेळी मदन पाटील यांनी बंडखोरी केली. चुलते-पुतणे एकमेकांच्या विरोधात मैदानात आले. उघडपणे मैदानात येण्याची ही कहाणी तशीच सुरू राहिली. १९९८ नंतर दादा घराण्यातील दोन कुटुंबांच्या वाटा वेगळ्या झाल्या. विष्णुअण्णांचे कुटुंब राष्ट्रवादीत, तर प्रकाशबापूंचे कुटुंब कॉँग्रेसमध्ये राहिले. त्यामुळे १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाशबापू व मदन पाटील पुन्हा आमने-सामने आले. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतही प्रकाशबापू व विष्णुअण्णा या दोघांनी वेगवेगळी पॅनेल उभी करून एकमेकांना आव्हान दिले होते.शंका-कुशंकाविधानसभा, लोकसभा निवडणुकीत कोणालाही उमेदवारी मिळाली, तरी घराण्यातील अंतर्गत छुप्या संघर्षाचा मुद्दा चर्चेला येतोच. दोन्ही कुटुंबांमधील नेत्यांच्या प्रत्येक कृतीवरून संशयकल्लोळही निर्माण होतो. २००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर या वारसदारांमधील हालचालींना शंका-कुशंकांचे ग्रहण लागले, ते अजून कायम आहे.