शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
4
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
5
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
6
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
7
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
8
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
9
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
10
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
11
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
12
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
13
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
14
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
15
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
16
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
17
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
18
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
19
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
20
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?

वसंतदादा कारखान्याची वाटचाल कर्जमुक्तीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:24 IST

सांगली : वसंतदादा कारखान्याची ४०० कोटींची देणी होती. त्यातील १९० कोटी रुपयांची देणी भागविली असून, कारखान्याची वाटचाल कर्जमुक्तीकडे सुरु ...

सांगली : वसंतदादा कारखान्याची ४०० कोटींची देणी होती. त्यातील १९० कोटी रुपयांची देणी भागविली असून, कारखान्याची वाटचाल कर्जमुक्तीकडे सुरु आहे, अशी माहिती अध्यक्ष विशाल पाटील यांनी मंगळवारी वार्षिक सभेत दिली.

साखर कारखान्याची ६३वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी कारखाना कार्यस्थळात व्हीडिओ कॉन्फरन्सव्दारे पार पडली. यावेळी विशाल पाटील म्हणाले की , लवकरच कारखाना सर्व देण्यातून मुक्त होईल. कारखाना अडचणीच्या परिस्थितीतही यशस्वी वाटचाल करीत असताना आम्हास फौजदारीच्या नोटीस देऊन घाबरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही त्यास प्रत्युत्तर देण्यास तयार आहोत. शासनाला कराच्या रुपाने आम्ही खूप दिले आहे. देणी देताना आता प्रथम प्राधान्य शेतकऱ्यांना असेल. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचीही राहिलेली देणी दिली जातील. शेतकरी व कामगारांची देणी भागविल्यानंतर शासनाची देणी दिली जातील.

गतवर्षी एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या सुमारे ७७ कोटी कर्जाची परतफेड करुन कारखान्याची मालमत्ता त्या बँकेकडून सोडवून घेतली आहे. आता केवळ सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचेच कर्ज शिल्लक आहे. कारखान्याने कोरोना काळात देशात सर्वप्रथम सॅनिटायझर बनवून जिल्ह्यात सर्वत्र तसेच प्रत्येक सभासदाच्या घरी सॅनिटायझर पोहोच केले. बुधगाव, नावरसवाडी येथे ठिबक सिंचन सुरु करुन त्या माध्यमातून चांगल्या रिकव्हरीचा व एकरी जास्त उत्पादनाचा ऊस निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. याच पद्धतीने कारखाना परिसरात आणखी चार ते पाच ड्रिप एरिगेशन योजना कारखान्याच्या माध्यमातून लवकरच सुरू केल्या जातील.

कारखाना स्थापनेवेळी घेतलेले शेअर्स वारसांच्या नावांवर वर्ग करण्यासाठी कारखान्याकडून विशेष सहकार्य केले जाईल. शेतकरी सभासदांच्या पाल्यांना दरवर्षी वसंतदादा इंजिनिअरिंग कॉलेजमार्फत दीड कोटीची फी सवलत दिली जात आहे. त्यामुळे शेतकरी सभासदांच्या मुलांना चांगले शिक्षण घेता येत आहे. यावेळी कारखान्याचे सभासद प्रभाकर पाटील यांनी भूविकास बँकेच्या पुनर्जीवन प्रकरणी कारखान्याने विशेष लक्ष घालावे व तोडणी वाहतूकदारांकडून शेतकऱ्यांच्या अडवणुकीवर कार्यवाही करावी, अशी मागणी केली.

शेतकरी संघटनेचे प्रदीप पाटील यांनी दत्त इंडियाने गळीत हंगाम सन २०१७-१८ मधील २०० रुपये फरकाची रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ देण्याची मागणी केली. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील आवटी, संचालक अमित पाटील, यशवंतराव पाटील, अशोक अनुगडे, शिवाजीराव पाटील, सपंत माने, संभाजी मेंडे, सुरेश पाटील, गणपतराव सावंत, राजेंद्र पाटील उपस्थित होते. कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी स्वागत केले. संचालक अमित पाटील यांनी आभार मानले.