शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
2
पुण्यात झाड कोसळून १ ठार; कोल्हापुरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना
3
एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा
4
शस्त्र परवान्यासाठी गोळीबाराचा बनाव; शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना अटक
5
Vaishnavi Hagawane Death Case :'आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास'; हगवणेंच्या वकिलांच्या युक्तीवादावर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया
6
हगवणे बंधूंनी नीलेश चव्हाणच्या मदतीने केला आई, बहिणीचा मोबाईल लंपास; पोलिसांची कोर्टात माहिती
7
Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs ENG: खुद्द रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी 'या' व्यक्तीबद्दल गौतम गंभीरकडे केली विनंती
8
सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांची हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका! लोकपालांनी दिली क्लीनचिट
9
आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील
10
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
11
पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापून टाकले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट
12
टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा
13
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
14
ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्याचे मार्ग, ऑपरेशन शील्ड' अंतर्गत उद्या या ४ राज्यांमध्ये मॉक ड्रिल होणार
15
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
16
माजी मंत्र्याचा सचिव, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती! जैसलमेरमधून पकडला गेला आणखी एक गद्दार
17
इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही
18
'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; सुषमा अंधारेंनी CM फडणवीसांना केली विनंती
19
बेडरूममध्ये बसली होती सवत, बघताच पहिल्या पत्नीला संताप झाला अनावर! पुढे पतीने जे केले, ते वाचून व्हाल हैराण
20
सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...

शिराळ्यात वारणा कालव्यास गळती

By admin | Updated: May 25, 2015 00:29 IST

मोठ्या प्रमाणावर पाणी वाया : पश्चिम भागात शेकडो एकर जमीन नापीक

सहदेव खोत - पुनवत -जिल्ह्यात एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी लोकांचे हाल सुरू असताना, दुसरीकडे मात्र शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात वारणा डाव्या कालव्याच्या गळतीमुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. या कालव्याच्या २७ कि.मी.पर्यंतच टप्प्यात गळतीमुळे ऐन उन्हाळ्यात अनेक ठिकाणी धबधबे पाहावयास मिळत असून, ओढे, नोलेही तुडुंब वाहत आहेत.वारणा डाव्या कालव्यात ० ते २७ कि.मी.च्या टप्प्यात सध्या पाणी सोडले आहे. या टप्प्यातील कालव्याच्या गळतीची समस्या जुनीच आहे. कालव्यात पाणी सोडले की ते हजारो ठिकाणांहून झिरपून शेतकऱ्यांच्या शेतातून ओढ्या-नाल्यांना मिळत आहे. त्यामुळे खुजगावपासून ते चांदोलीपर्यंतच्या भागात तर नाले-ओढे सध्या ऐन उन्हाळ्यात ओसंडून वाहत आहेत. अनेक ठिकाणी छोटे-मोठे धबधबे नजरेस पडत आहेत. सततच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणकणसे उगवली आहेत. सध्या कालवा प्रवाही असल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी भातपेरणीसाठी तयार केलेली शेते पाण्याने भरली आहेत. उसाची शेते तुडुंब झाल्याची दृश्ये पाहावयास मिळत आहेत. ही दृश्ये पाहिल्यानंतर चांदोलीला भेट देणारे पर्यटक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.कालव्याला पाणी आले की असंख्य एकरातील शेती पाण्याने भरते, तर काही ठिकाणी ओल येते. पाणी बंद झाल्यावर शेते सुकू लागल्यावर काही तरी करावे म्हटले, तर पुन्हा कालव्याला पाणी येते. अशा परिस्थितीत आमचे शेत पिकणार कसे? असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.कालव्यात पाणी सोडल्यानंतर काही लोकांचा फायदा होत असला तरी, ज्यांची शेती या कालव्यामुळे बुडाली आहे, अशा शेतकऱ्यांसाठी हा कालवा कर्दनकाळ ठरत आहे. गळतीमुळे जिल्ह्याच्या एका टोकाला घोटभर पाण्यासाठी दाहीदिशा, तर पश्चिम टोकाला पाण्याचा अपव्यय, असा विरोधाभास पाहावयास मिळत आहे. आमचे शेत पिकणार कसे?अनेक वर्षांपासून कालव्याची गळती काढण्याबाबत कोणतीही कामे झालेली नाहीत. पाटबंधारे विभाग याबाबत नेहमीच उदासीन राहिला आहे. सध्या वारणा डाव्या कालव्यात ० ते २७ कि.मी.च्या टप्प्यात पाणी सोडले आहे. कालव्याला पाणी आले की असंख्य एकरातील शेती पाण्याने भरते, तर काही ठिकाणी ओल येते. सध्या कालवा प्रवाही असल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी भातपेरणीसाठी तयार केलेली शेते पाण्याने भरली आहेत. उसाची शेते तुडुंब झाल्याची दृश्ये पाहावयास मिळत आहेत. पाणी बंद झाल्यावर शेते सुकू लागल्यावर काही तरी करावे म्हटले, तर पुन्हा कालव्याला पाणी येते. अशा परिस्थितीत आमचे शेत पिकणार कसे? असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.