शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

गैरसोयींच्या विळख्यात पशुधनाची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2015 00:20 IST

जत तालुक्यातील स्थिती : दोन लाख जनावरांची उपेक्षा, गैरसोयीमुळे पशुपालक त्रस्त

गजानन पाटील - संख -जिल्ह्यामध्ये विस्ताराने मोठा असलेला जत तालुका हा कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. दुष्काळामुळे शेतीतून शाश्वत उत्पन्नाची खात्री नसल्याने पशू व कुक्कुटपालन हा येथील प्रमुख जोडधंदा बनला आहे. तालुक्यात सहा लाखाहून अधिक पशूंची संख्या आहे. मात्र येथील सर्वच पशुवैद्यकीय दवाखान्यांची अवस्था अगदी केवीलवाणी बनली आहे. जिल्हास्तरावर याबाबत माहिती असूनही याकडे अगदी सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ २ लाख २४ हजार ८२४ हेक्टर इतके आहे. एकूण लागवडीखालील क्षेत्र १ लाख ५८ हजार ७०० हेक्टर आहे. त्यापैकी खरीप क्षेत्र ६५ हजार ७० हेक्टर, तर रब्बीचे क्षेत्र २३ हजार ३८० हेक्टर आहे. तालुक्यातील एकूण बागायती क्षेत्र २२ हजार ७५ हेक्टर, तर जिरायत क्षेत्र ६२ हजार २९९ हेक्टर आहे. खिलार जनावरांसाठी व माडग्याळ जातीच्या मेंढीसाठी हा तालुका प्रसिद्ध आहे. भूमिहीन शेतमजूर, ऊसतोडणी मजूर शेळी पाळतो. शेळीला गरिबाची गाय म्हणतात. तिच्या पालनासाठी कमी खर्च लागतो. खुरटे गवत आणि काटेरी वनस्पतीवर तिचे पोषण होते. देखणी खिलार गाय आणि देखणा खोंड हे दुष्काळी माणदेशाचे वैभव आहे. जातीवंत देखणी, चपळ, काटक, अत्यंत चिवट आणि प्रचंड रोगप्रतिकारक शक्ती असणारी खिलार जनावरे प्रसिद्ध आहेत. खरीप व रब्बी हंगामातील ज्वारी, बाजरी, मका या पिकांचा कडबा जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरला जातो. शेतीला शेणखताची गरज आहे. त्यामुळे शेतीला जोडव्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय केला जातो. आर्थिक अर्थव्यवस्था पशूंवर आधारित बनली आहे. बाजारामध्ये बैल, खोंड, बोकड यापासून मोठे आर्थिक उत्पन्न मिळते. तालुक्यामध्ये एकूण जनावरांची संख्या ६ लाख १० हजार ६०५ इतकी आहे. त्यामध्ये बैल, गाई ८८ हजार ९०५, म्हैशी ६२ हजार १३९, शेळ्या १ लाख ३० हजार ३९५, मेंढ्या ७७ हजार ९७६, कोंबड्या २ लाख ५१ हजार १९० इतक्या आहेत. पशुंच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे २३ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. त्यामध्ये श्रेणी १ चे १४ दवाखाने व श्रेणी -२ चे ९ आहेत. श्रेणी १ मध्ये दरीबडची, जत, उमदी, सोन्याळ, येळवी, कुंभारी, बोर्गी, सनमडी, संख, आवंढी, उमराणी, वज्रवाड, माडग्याळ, बाज असे १४ दवाखाने, तर श्रेणी - २ मध्ये वाळेखिंडी, शेगाव, डफळापूर, अंकले, मुचंडी, बिळूर, तिकोंडी, वळसंग, कोंतेवबोबलाद असे ९ दवाखाने आहेत. पण येथील सुविधा मात्र बेभरवशाच्या ठरत असल्याचे चित्र आहे.जत तालुका अजूनही सर्वच क्षेत्रात अन्य तालुक्यांच्या तुलनेत विकासासाठी झगडतोय... बेभरवशाची शेती, तर दुसरीकडे पशुपालनात वाढत चाललेल्या समस्या, यामुळे शेतकरी व पशुपालक मेटाकुटीला आला आहे. पशूंचे आरोग्य राखणारे व त्यांना संरक्षण देणारे पशुवैद्यकीय दवाखाने शो पीस बनले आहेत. अनेक दवाखान्यात ना डॉक्टर, ना सुसज्ज इमारती, ना मुबलक औषधे. हजारो जनावरांच्या आरोग्याचा भार नेहमीच प्रभारी... अशा परिस्थितीत पशुवैद्यकीय दवाखाने व पर्यायाने पशूंची होणारी परवड, यावर प्रकाश टाकणारी मालिका आजपासून...२०१२ ची पशुगणना दफ्तरदिरंगाईत पशुसंवर्धन विभागातर्फे दर पाच वर्षांनी पाळीव जनावरांचे सर्वेक्षण करून त्यांची संख्या मोजण्यात येते. २००७ मध्ये पशुगणना करून त्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. २०१२ ची पशुगणना होऊन तीन वर्षे पूर्ण होऊनसुद्धा अद्याप तालुकानिहाय पशुगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. ती लालफितीच्या दफ्तरदिरंगाईत धूळ खात पडली आहे. पशुंची निश्चित संख्या नसल्याने वैद्यकीय सुविधा, लसीकरणासह विविध कामांचे नियोजन करण्यात अडचणीचे ठरत आहे. माडग्याळ येथील शेळ्या-मेंढ्यांच्या बाजाराला सुमारे ५० वर्षांची परंपरा आहे. शुक्रवारच्या या बाजारात शेळ्या-मेंढ्यांची मोठी खरेदी-विक्री होते. माडग्याळ मेंढीसाठी या बाजाराची ख्याती सर्वदूर आहे. जत येथे गुरुवारी शेळ्या-मेंढ्यांचा बाजार भरतो. कोट्यवधींची उलाढाल होते. बाजार समितीत शेळ्या-मेंढ्यांची झालेली आवक व विक्रीवर्षआवक नगविक्री नग सरासरी दर २०१२-१३३३,५००१८,८०० ३,००० रु२०१३-१४३३,०००२२,०००३,५०० रु.