शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

सांगली जिल्ह्यातील दोन हजार गुंड रडारवर!

By admin | Updated: September 23, 2014 23:54 IST

विधानसभा निवडणूक : पोलीस प्रमुखांकडून जिल्ह्याचा दौरा

सचिन लाड-सांगली -विधानसभा निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी दोनपेक्षा जादा गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू आहे. सुमारे दोन हजार गुंड कारवाईसाठी पोलिसांच्या रडारवर आहेत. यातील पाचशेहून अधिक गुन्हेगारांवरील कारवाई पूर्ण झाली आहे. दरम्यान, जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत जिल्ह्याचा दौरा करून शांततेसाठी थेट लोकांशी संवाद साधत आहेत.निवडणुकीत वाद-विवाद व प्रसंगी हाणामारीचे प्रकार घडतात. सांगली जिल्ह्याची संवेदनशील म्हणून ओळख आहे. यामुळे सावंत यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्यानुसार यंत्रणा कामाला लागली आहे. दररोज नाकाबंदी करून, दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या तळीरामांची धरपकड केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून फरारी असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे. खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, गर्दी मारामारी यासह दोनपेक्षा जादा गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी यादी काढण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. चार दिवसांपूर्वी यादी काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. (प्रतिनिधी)सांगलीचे कारागृहखचाखच भरलेपोलिसांनी सुरू केलेली प्रतिबंधात्मक कारवाई व बजावण्यात आलेल्या अजामीनपात्र वॉरंटमुळे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. आजअखेर (मंगळवार) ३७८ कैदी असून, यामध्ये ३६५ पुरुष व १३ महिलांचा समावेश आहे. यापूर्वी वकिलांनी खंडपीठासाठी केलेल्या आंदोलनावेळी कैद्यांना जामीन मंजूर न झाल्याने ही संख्या ३८५ पर्यंत गेली होती. कैद्यांची संख्या वाढली असली, तरी त्याचा कारागृह प्रशासनाच्या कामकाजावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे अधीक्षक एम. एस. पवार यांनी सांगितले.निवडणुकीत गुन्हेगारांचा त्रास वाढतो. हॉटेल, ढाबे, दारूची दुकाने येथे गर्दी असते, यातून हाणामारीचे प्रकार घडतात. पोलिसांनी या सर्वांना ‘टार्गेट’ करून कारवाईचा धडाका लावला आहे. त्याचा अनुकूल परिणाम झाला आहे. पोलीसप्रमुख सावंत यांनीही जेथे तणाव निर्माण होऊ शकतो, अशा ठिकाणी जाऊन थेट लोकांशी संवाद साधण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या आठवड्यात ते जत तालुक्यात जाऊन आले. निवडणुकीत पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन तेथील लोकांना त्यांनी केले.