शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

शेततळ्यात बुडून दोन बहिणींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : तालुक्यातील करोली (एम) येथे शेततळ्यात बुडाल्याने जिजाबाई सतीश वाघ (वय १३), केशवनी सतीश वाघ (६) या दोन सावत्र बहिणींचा मृत्यू झाला. जिजाबाई व केशवनी या शनिवारी सायंकाळी शेतात जळण आणण्यासाठी गेल्या असता, शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ही दुर्दैवी घटना घडली.करोली (एम) येथील वाघमारे वस्तीवर राहणाºया जिजाबाई ...

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : तालुक्यातील करोली (एम) येथे शेततळ्यात बुडाल्याने जिजाबाई सतीश वाघ (वय १३), केशवनी सतीश वाघ (६) या दोन सावत्र बहिणींचा मृत्यू झाला. जिजाबाई व केशवनी या शनिवारी सायंकाळी शेतात जळण आणण्यासाठी गेल्या असता, शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ही दुर्दैवी घटना घडली.करोली (एम) येथील वाघमारे वस्तीवर राहणाºया जिजाबाई व केशवनी या सावत्र बहिणी शनिवारी शाळेतून घरी आल्यानंतर नेहमीप्रमाणे सायंकाळी पाच वाजता जळण आणण्यासाठी शेतात गेल्या होत्या. सतीश वाघ यांची अर्धा एकर द्राक्षबाग असल्याने त्यांनी शंभर फूट लांब व रूंद शेततळे खोदले आहे. शेततळ्यात प्रथमच पाणी सोडले असल्याने दोघी बहिणी शेतात जळण आणण्यासाठी गेल्यानंतर शेततळे पाहण्यासाठी गेल्या; मात्र काठावरून पाणी पाहताना शेततळ्यात घसरून पडल्याने दोघींचा बुडून मृत्यू झाला.मुलींची आई स्नेहा वाघ या जनावरे चारण्यासाठी गेल्या होत्या. वडील सतीश वाघ कामानिमित्त मिरजेला गेले होते. घरात आजोबा एकटेच होते. सायंकाळी सात वाजेपर्यंत दोघीही घरी परत आल्या नसल्याने आई-वडिलांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. शेततळ्यात पाहिले असता सुमारे पाच फूट पाण्यात दोघींचे मृतदेह तरंगत असल्याचे आढळले. जिजाबाई ही मणेराजुरी कन्या शाळेत आठवीत, तर केशवनी वस्तीवरील शाळेत दुसरीत शिकत होती.पशुपालन व शेती करणाºया सतीश वाघ यांची गरीब परिस्थिती असून, त्यांना एक मुलगा व दोन मुली होत्या. दोघी मुलींच्या आकस्मिक मृत्यूमुळे वाघ कुटुंबियांवर मोठा आघात झाला. दोघींचे मृतदेह सापडल्यानंतर माता-पित्याचा आक्रोश सुरू होता. दोन मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती पोलीसपाटील मनीषा पाटील यांनी ग्रामीण पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक मोहन जाधव, हवालदार भिंताडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत ग्रामीण पोलिसात नोंद आहे.