शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

बेवनूरमध्ये बावीस दिवसांतून पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2016 23:38 IST

परिसरात तीव्र टंचाई : गावे, वाड्या-वस्त्यांवर ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

शेगाव : बेवनूर (ता. जत) येथे टँकरच्या खेपा होत नसल्यामुळे गावामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. आजुबाजूच्या गावांसह वाड्या-वस्त्यांवर व गावात २२ दिवसांतून एकदा पाणी मिळत आहे. अधिग्रहण केलेल्या विहिरीचे अंतर व ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गावापासून सहा किलोमीटरवर असलेल्या गुळवंची तलावात पाणी आले आहे. तेथूनच पेयजल योजनेतून नळपाणी पुरवठा योजनेचे काम गेल्या दीड वर्षापासून रखडले आहे.जतच्या उत्तरेला सांगोला, कवठेमहांकाह तालुक्याच्या सीमेला असलेल्या बेवनूर गावाची लोकसंख्या तीन हजार आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी जुनी विहीर कोरडी पडल्याने सहा महिन्यांपासून टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. सुरुवातीला दोन टँकरच्या खेपा मंजूर होत्या. पाणी कमी पडू लागले म्हणून ग्रामस्थांच्या मागणीनुसार तीन खेपा मंजूर आहेत. पाण्यासाठी गुळवंची येथे खासगी विहीर अधिग्रहण करण्यात आली.गावापासून जास्त अंतर, यानियमित वीजपुरवठा, भारनियमन यामुळे दिवसभरातील खेपा पूर्ण होत नाहीत. फक्त एक-दोन खेपा होत आहेत. गावाखालील ११ वाड्या-वस्त्या व गावाला पाणीपुरवठा कमी होत आहे मात्र दुसऱ्या बाजूला अधिग्रहण केलेल्या विहिरीतील पाणी अगोदरच दुसऱ्याला विकले जाते. त्यामुळे टँकर लवकर भरला जात नाही. त्यामुळे दिवसभरातील खेपा पूर्ण होत नाहीत. तसेच कागदोपत्री टॅँकरच्या खेपा दाखविल्या जात आहेत. पाणी असून सुद्धा गावातील विहीर अधिग्रहण केली नाही, असा आरोप ग्र्रामस्थांतून केला जात आहे. गुळवंची येथील विहीर अधिग्रहण केली आहे. गावापासून अंतर जास्त आहे. अनियमित वीजपुरवठा व भारनियमन यामुळे दिवसभरात तीन खेपाही पूर्ण होत नाहीत. २०-२२ दिवसांतून पाणी पुरवठा होत आहे. शिंदे वस्ती, शेख, सरगर, लिंबाचा मळा, टेकड मलमे या वाड्या-वस्त्यांवर अपुरा पाणी पुरवठा होत आहे. (वार्ताहर)