शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
7
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
8
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
9
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
10
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
11
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
12
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
13
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
14
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
15
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
17
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
18
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
19
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
20
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी

बेवनूरमध्ये बावीस दिवसांतून पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2016 23:38 IST

परिसरात तीव्र टंचाई : गावे, वाड्या-वस्त्यांवर ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

शेगाव : बेवनूर (ता. जत) येथे टँकरच्या खेपा होत नसल्यामुळे गावामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. आजुबाजूच्या गावांसह वाड्या-वस्त्यांवर व गावात २२ दिवसांतून एकदा पाणी मिळत आहे. अधिग्रहण केलेल्या विहिरीचे अंतर व ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गावापासून सहा किलोमीटरवर असलेल्या गुळवंची तलावात पाणी आले आहे. तेथूनच पेयजल योजनेतून नळपाणी पुरवठा योजनेचे काम गेल्या दीड वर्षापासून रखडले आहे.जतच्या उत्तरेला सांगोला, कवठेमहांकाह तालुक्याच्या सीमेला असलेल्या बेवनूर गावाची लोकसंख्या तीन हजार आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी जुनी विहीर कोरडी पडल्याने सहा महिन्यांपासून टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. सुरुवातीला दोन टँकरच्या खेपा मंजूर होत्या. पाणी कमी पडू लागले म्हणून ग्रामस्थांच्या मागणीनुसार तीन खेपा मंजूर आहेत. पाण्यासाठी गुळवंची येथे खासगी विहीर अधिग्रहण करण्यात आली.गावापासून जास्त अंतर, यानियमित वीजपुरवठा, भारनियमन यामुळे दिवसभरातील खेपा पूर्ण होत नाहीत. फक्त एक-दोन खेपा होत आहेत. गावाखालील ११ वाड्या-वस्त्या व गावाला पाणीपुरवठा कमी होत आहे मात्र दुसऱ्या बाजूला अधिग्रहण केलेल्या विहिरीतील पाणी अगोदरच दुसऱ्याला विकले जाते. त्यामुळे टँकर लवकर भरला जात नाही. त्यामुळे दिवसभरातील खेपा पूर्ण होत नाहीत. तसेच कागदोपत्री टॅँकरच्या खेपा दाखविल्या जात आहेत. पाणी असून सुद्धा गावातील विहीर अधिग्रहण केली नाही, असा आरोप ग्र्रामस्थांतून केला जात आहे. गुळवंची येथील विहीर अधिग्रहण केली आहे. गावापासून अंतर जास्त आहे. अनियमित वीजपुरवठा व भारनियमन यामुळे दिवसभरात तीन खेपाही पूर्ण होत नाहीत. २०-२२ दिवसांतून पाणी पुरवठा होत आहे. शिंदे वस्ती, शेख, सरगर, लिंबाचा मळा, टेकड मलमे या वाड्या-वस्त्यांवर अपुरा पाणी पुरवठा होत आहे. (वार्ताहर)