शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
3
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
4
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
5
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
6
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
7
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
8
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
9
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
10
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
11
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
12
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
13
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
14
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
15
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
16
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
17
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
18
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
19
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
20
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 

अडीच कोटीच्या अपहारप्रश्नी ग्रामसेवकांवर फौजदारी होणार

By admin | Updated: September 20, 2016 23:07 IST

जिल्हा परिषद : सौरऊर्जा युनिटप्रकरणी ठेकेदाराची अनामत जप्त

सांगली : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या दोन कोटी ५३ लाखांच्या अपहाराची रक्कम वसूल झाली नसून दोषी ग्रामसेवकांवर पंधरा दिवसात फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. सौरऊर्जेचे युनिट दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंपनीची अनामत रक्कम जप्त करून त्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचाही निर्णय घेतला.अध्यक्षा स्नेहल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक झाली. यावेळी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडील अपहाराच्या रकमेचा मुद्दा उपस्थित करून दोषी ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी सदस्य रणधीर नाईक यांनी केली. याला उत्तर देताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ म्हणाले की, ११६ प्रकरणांमध्ये दोन कोटी ९१ लाखांचा अपहार झाला होता. त्यापैकी ४७ लाख वसूल झाले असून, उर्वरितांना कारवाईच्या नोटिसा बजाविल्या आहेत. ११६ प्रकरणांपैकी ५३ प्रकरणांचा खुलासा आला नाही. एक कोटी ५३ लाख अपहाराची रक्कम अद्याप वसूल झालेली नाही. याप्रकरणी येत्या पंधरा दिवसात संबंधित दोषी ग्रामसेवकांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.अध्यक्षा स्नेहल पाटील यांनी, दोषी ग्रामसेवकांना पाठीशी घातले जाणार नाही, असे सांगून, त्यांच्यावर पंधरा दिवसात फौजदारी कारवाई करून अपहाराची रक्कम वसूल करणार असल्याचे आश्वासन दिले. ग्रामपंचायतीचे दफ्तर न देणाऱ्या ग्रामसेवक, तांत्रिक सेवा पुरवठादार आणि पाणी पुरवठा समितीच्या अध्यक्षांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेत ६७ लाख रुपये खर्च करून सौरऊर्जेचे युनिट बसविले आहे. पण ते कधीच चालू नसते. त्या ठेकेदारावर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न रणधीर नाईक यांनी उपस्थित केला. यावर संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे, तसेच त्यांची अनामत रक्कम जप्त करून दुरुस्तीचे काम अन्य कंपनीकडून करून घेण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.यावेळी उपाध्यक्ष रणजित पाटील, सभापती भाऊसाहेब पाटील, सभापती कुसूम मोटे, सभापती सुनंदा पाटील, माजी अध्यक्ष देवराज पाटील, माजी उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, बसवराज पाटील, सदस्य अलकादेवी शिंदे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)खुर्चीच्या लाभार्थी यादीतून ९५ जणांना वगळलेजिल्हा परिषद स्वीय निधीतून नाभिक समाजाला अनुदानावर खुर्चीचे वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार यादीही निश्चित केली होती, पण ९५ जणांनी खुर्चीच खरेदी केली नाही. यामुळे त्यांची निवड यादीतून नावे वगळण्याचा जि. प. स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय झाला. तसेच नव्याने तेवढ्याचा लाभार्थींची निवड करणार असल्याचेही स्नेहल पाटील यांनी सांगितले.जिल्हा परिषद स्वीय निधीतून अनेक योजना राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतु, या योजनांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली नसल्यामुळे तो निधी अखर्चीत राहिला आहे. योजनांना मंजुरी देण्यासाठी जिल्हा परिषदेची विशेष सभा घेण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यानुसार अध्यक्षा स्नेहल पाटील यांनी दि. ५ आॅक्टोबरला विशेष सभा घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.