शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

बत्तीस गुंठ्यात टोमॅटोचे पंचवीस लाखाचे उत्पन्न

By admin | Updated: June 30, 2016 23:34 IST

बेळंकीच्या शेतकऱ्याची यशोगाथा : नियोजन आणि बाजारपेठेचा अभ्यास करून घडविली किमया... --महाराष्ट्र कृषिदिन विशेष

मोहन मगदूम--लिंगनूर --टोमॅटोचे दर चढेच असल्यामुळे उत्पादक खूश आहेत. बेळंकी (ता. मिरज) येथील प्रयोगशील शेतकऱ्यास ३२ गुंठे क्षेत्रातील टोमॅटो तब्बल पंचवीस लाखाचे उत्पन्न देत आहे.मेहनत, बाजारपेठेचा अभ्यास आणि योग्य नियोजन केल्यास शेतीवर येणाऱ्या संकटांवर मात करता येते, हे बेळंकीच्या सुखदेव कोरे या प्रगतशील शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. त्यांनी केवळ ३२ गुंठे क्षेत्रात आतापर्यंत वीस लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. यापुढे अजून पाच लाखाचे उत्पन्न मिळण्याचा विश्वास त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. विशेष म्हणजे कोरे यांनी हे उत्पन्न मिळवले आहे, ते खडकाळ माळरानावरील जमिनीतून! त्यासाठी आधुनिक शेतीपद्धत आणि शेडनेटचा वापर फायदेशीर ठरला आहे.बेळंकीपासून पाच किलोमीटरवर असलेल्या माळरानावर कोरे यांची वडिलोपार्जित तीन एकर शेती आहे. त्यांना सुरुवातीस शेतीतून फारसे उत्पादन मिळाले नाही. पाण्याची कमतरता आणि अपुरे भांडवल याचा फटका बसत होता. मात्र त्यांनी शेतीत प्रयोग करणे सुरू ठेवले. सुरुवातीला एक एकर ढबू मिरचीची लागवड केली. त्यावेळी बाजारभाव पडल्याने जेमतेम उत्पादन मिळाले. मग मार्च महिन्यात ३२ गुंठे जमिनीत ठिबक व मल्चिंग पेपरचा वापर करून टोमॅटोची लागवड केली. पाच फुटावर सरी व दहा इंच अंतरावर रोप याप्रमाणे नऊ हजार रोपांची लावण केली. उन्हाळ्यात अवकाळी पावसाचा फटका अनेकांना बसला, पण कोरे यांनी मल्चिंग पेपर व शेडनेट या तंत्रज्ञानाचा वापर करून टोमॅटो वाचवण्यात यश मिळवले. गेल्या तीन आठवड्यांपासून तोडणी हंगाम सुरू झाला आहे. गेल्या पंधरवड्यात कोल्हापूर, इचलकरंजी, सांगलीच्या बाजारपेठेत टोमॅटो पाठवण्यात आला. सुरुवातीस ५० रुपयेप्रमाणे दर मिळाला. आता मुंबई, अहमदाबाद बाजारपेठेत टोमॅटो पाठवण्यात येत आहे. तेथेही ७० ते ८० रुपये दर मिळाला. सध्या दर थोडा कमी झाला आहे. एकूण ७० टन उत्पादन निघण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. त्यातून पंचवीस लाखाचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.कोरे यांनी दुसऱ्या ३० गुंठ्याच्या क्षेत्रात ढबूची लागण केली असून त्याला चांगली मागणी आहे. गतवर्र्षी ढब्बूला पाच रुपये किलो दर मिळाला होता. दर घसरले म्हणून निराश न होता त्यांनी नव्या जोमाने परत ढबूची लागण केली आहे. सध्या त्याचा दर ४५ ते ५० रुपयेपर्यंत आहे.बत्तीस गुंठे क्षेत्रात टोमॅटोची लावण करून जास्तीत जास्त उत्पादन व दर घेण्यात यशस्वी झालो. बाजारपेठेचा अभ्यास व पिकाची काळजी घेतल्यास शेतकऱ्याला निश्चित फायदा होतो. - सुखदेव कोरे, टोमॅटो उत्पादक, बेळंकी