शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
3
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
4
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
5
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
6
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
7
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
8
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
9
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
10
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
11
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
12
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
13
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
14
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
15
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
16
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
17
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
18
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
19
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
20
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!

बारा ग्रामपंचायती अजूनही अंधारातच

By admin | Updated: May 24, 2016 00:49 IST

प्रशासनाचेही दुर्लक्ष : डिजिटल इंडियाच्या स्वप्नाला ब्रेक

रत्नागिरी : एकीकडे खेडी इंटरनेटने जोडली जात असतानाच दुसरीकडे ग्रामीण भागाच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायती अंधारात आहेत. कारण स्वातंत्र्यानंतरही या ग्रामपंचायतींमध्ये अजूनही वीजजोडणी झालेली नाही़ आता खेडोपाडी मोबाईल, संगणकाच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर होत आहे़ त्याचबरोबर ग्रामपंचायतीही इंटरनेटने जोडल्यामुळे एका क्लिकवर कोणतीही माहिती काही सेकंदात उपलब्ध होते़ जग एवढे पुढे गेलेले असताना जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये वीज पुरवठा जोडलेला नाही़विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना कोट्यवधी रुपये शासनाकडून दिले जातात़ त्यातून अनेक ग्रामीण भागाचा विकास साधला जातो़ आता ग्रामपंचायतींमध्ये विविध योजना राबविल्या जात असताना प्रत्येक ग्रामपंचायतींचे संगणकीकरण करण्यात येत आहे़ कारण विविध प्रकारचे दाखले ग्रामपंचायतींच्या माध्यमातून देण्यात येत आहेत़ त्याचबरोबर विवाह नोंदणीही ग्रामपंचायतींमध्येच करण्यात येत आहे. अशा प्रकारे ग्रामपंचायत ही गावच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरलेली असतानाच जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायतींमध्ये अद्यापही वीज जोडणी नाही़या ग्रामपंचायतीेंच्या माध्यमातून विविध विकास कामे राबविली जात आहेत़ मात्र, ग्रामपंचायतींमध्ये वीज नसल्याने पावसाळ्याच्या दिवसांत सरपंच, ग्रामसेवक यांना अनेकदा आंधारामध्ये काम करावे लागते़ त्यामुळे एकीकडे संगणक युग सुरु असतानाच जिल्ह्यातील ग्रामपंचायती अजूनही वीजेपासून दूर आहेत. त्यामुळे या संगणक युगात या ग्रामपंचायतीमध्ये वीज नसल्याने संबंधित विभागाचा विकास कसा साधणार, असा प्रश्न उपस्थित आता ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)1विकासकामांवर परिणाम : मागणी करूनही कानाडोळाग्रामपंचायतींकडून करण्यात येणाऱ्या विकासकामांची ई-निविदा काढण्यात येते. त्यानंतरच ही विकासकामे मार्गी लावण्यात येतात. काही ग्रामपंचायती विजेविना असल्याने त्यामध्ये संगणकांचा वापर कसा करणार, इंटरनेट सेवा नसल्याने त्याचा विकासकामांवरही परिणाम होत आहे. संगणक सेवा उपलब्ध झाली असली तरीही वीज नसल्याने अडचण झाली आहे.