शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

निकालाच्या सूत्राने उडवली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप, दहावी, अकरावीच्या गुणांनी वाढविली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:19 IST

फोटो १७ अनुश्री विसपुते फोटो १७ विनित लुगडे फोटो १७ बीयू पाटील संतोष भिसे-लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : दहावीचा ...

फोटो १७ अनुश्री विसपुते

फोटो १७ विनित लुगडे

फोटो १७ बीयू पाटील

संतोष भिसे-लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : दहावीचा निकाल लागताच बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप उडाली आहे. बारावीच्या निकाल निश्चितीसाठी दहावी व अकरावीच्या गुणांचा आधार घेतला जाणार आहे. त्यामुळे अकरावीला टाईमपास केलेले विद्यार्थी गॅसवर आहेत.

दहावीचा निकाल शुक्रवारी (दि. १६) जाहीर झाला. बारावीची गुणनिश्चिती सध्या सुरू आहे. त्यासाठी दहावीचे ३० टक्के, अकरावीचे ३० टक्के आणि बारावीचे ४० टक्के गुण गृहीत धरले जाणार आहेत. दहावी व अकरावीतून जेमतेम बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची चिंता या सुत्रामुळे वाढली आहे. विशेषत: दहावीला `गुण उधळलेल्या` विद्यार्थ्यांना टक्केवारीची चिंता सतावतेय.

पॉईंटर्स

जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी सीबीएसई

मुले ९० , मुली ६०

जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी स्टेट बोर्ड

मुले १९,९१०, मुली १४७५०

कोट

विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा

काही विद्यार्थी कोरोना संसर्गामुळे परीक्षेला नव्हते. काहींना अंतर्गत मूल्यमापनासाठी उपस्थित राहता आले नाही, त्यामुळे अडचणी आहेत. यातूनही शासनाने मार्ग काढून अडचणी दूर केल्या आहेत. त्यामुळे निकाल चांगला व पारदर्शी लागण्याची अपेक्षा आहे. कोरोनामध्ये परीक्षेच्या मूल्यमापनासाठी शासनाचा निर्णय योग्यच आहे. पुढील शिक्षणक्रमांच्या प्रवेशासाठी बारावीच्या गुणांऐवजी सीईटीचे गुण महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांनी आता त्यावर फोकस ठेवावा.

प्रा. बी. यू. पाटील, मिरज महाविद्यालय, मिरज

३० टक्के गुण सूत्र बिघडवणार

बारावीचा निकाल मूल्यमापनाने लावणे योग्य नाही. सध्या परिस्थिती नकारात्मक असली, तरी विद्यार्थ्यांच्या क्षमतेची चाचपणी आवश्यक होती. नव्या पॅटर्नमुळे महाविद्यालयांनाच आता विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठरवावी लागेल. ३०-३०-४० पॅटर्नमुळे हुशार विद्यार्थांना न्याय मिळण्याबाबत साशंकता आहे.

- अनुश्री विसपुते, मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली.

दहावी आणि अकरावीच्या गुणांच्याआधारे बारावीचा निकाल लावणे योग्य नाही. यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. दहावीला कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्याने बारावीला चांगला अभ्यास केलेला असतो, पण नव्या पॅटर्ननुसार दहावीच्या गुणांवर त्याची गुणवत्ता निश्चित होणे दुर्दैवी आहे.

- विनित लुगडे, विद्यार्थी, चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, सांगली.