शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

निकालाच्या सूत्राने उडवली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप, दहावी, अकरावीच्या गुणांनी वाढविली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:19 IST

फोटो १७ अनुश्री विसपुते फोटो १७ विनित लुगडे फोटो १७ बीयू पाटील संतोष भिसे-लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : दहावीचा ...

फोटो १७ अनुश्री विसपुते

फोटो १७ विनित लुगडे

फोटो १७ बीयू पाटील

संतोष भिसे-लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : दहावीचा निकाल लागताच बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप उडाली आहे. बारावीच्या निकाल निश्चितीसाठी दहावी व अकरावीच्या गुणांचा आधार घेतला जाणार आहे. त्यामुळे अकरावीला टाईमपास केलेले विद्यार्थी गॅसवर आहेत.

दहावीचा निकाल शुक्रवारी (दि. १६) जाहीर झाला. बारावीची गुणनिश्चिती सध्या सुरू आहे. त्यासाठी दहावीचे ३० टक्के, अकरावीचे ३० टक्के आणि बारावीचे ४० टक्के गुण गृहीत धरले जाणार आहेत. दहावी व अकरावीतून जेमतेम बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची चिंता या सुत्रामुळे वाढली आहे. विशेषत: दहावीला `गुण उधळलेल्या` विद्यार्थ्यांना टक्केवारीची चिंता सतावतेय.

पॉईंटर्स

जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी सीबीएसई

मुले ९० , मुली ६०

जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी स्टेट बोर्ड

मुले १९,९१०, मुली १४७५०

कोट

विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा

काही विद्यार्थी कोरोना संसर्गामुळे परीक्षेला नव्हते. काहींना अंतर्गत मूल्यमापनासाठी उपस्थित राहता आले नाही, त्यामुळे अडचणी आहेत. यातूनही शासनाने मार्ग काढून अडचणी दूर केल्या आहेत. त्यामुळे निकाल चांगला व पारदर्शी लागण्याची अपेक्षा आहे. कोरोनामध्ये परीक्षेच्या मूल्यमापनासाठी शासनाचा निर्णय योग्यच आहे. पुढील शिक्षणक्रमांच्या प्रवेशासाठी बारावीच्या गुणांऐवजी सीईटीचे गुण महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांनी आता त्यावर फोकस ठेवावा.

प्रा. बी. यू. पाटील, मिरज महाविद्यालय, मिरज

३० टक्के गुण सूत्र बिघडवणार

बारावीचा निकाल मूल्यमापनाने लावणे योग्य नाही. सध्या परिस्थिती नकारात्मक असली, तरी विद्यार्थ्यांच्या क्षमतेची चाचपणी आवश्यक होती. नव्या पॅटर्नमुळे महाविद्यालयांनाच आता विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठरवावी लागेल. ३०-३०-४० पॅटर्नमुळे हुशार विद्यार्थांना न्याय मिळण्याबाबत साशंकता आहे.

- अनुश्री विसपुते, मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली.

दहावी आणि अकरावीच्या गुणांच्याआधारे बारावीचा निकाल लावणे योग्य नाही. यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. दहावीला कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्याने बारावीला चांगला अभ्यास केलेला असतो, पण नव्या पॅटर्ननुसार दहावीच्या गुणांवर त्याची गुणवत्ता निश्चित होणे दुर्दैवी आहे.

- विनित लुगडे, विद्यार्थी, चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, सांगली.