---------------
पान उत्पादक शेतकरी चिंतेत
सांगली : जिल्ह्यातील पलूस व मिरज तालुक्यात पानाचे उत्पादन घेतले जाते. सध्या पानांना समाधानकारक दर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. लॉकडाऊननंतर बाजारपेठा सुरू झाल्या आहेत. अशा परिस्थितीत पानांना अद्याप चांगले दर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
-------------
शेतकऱ्यांची फसवणूक
सांगली : जिल्ह्यात द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. द्राक्ष शेतीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक औषधांची फवारणी करावी लागते. याचा फायदा घेत काही दुकानदार शेतकऱ्यांच्या माथी कुचकामी औषधे मारतात. याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. याप्रकरणी कारवाईची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
----------------------
टोमॅटो दर घसरल्याने शेतकरी चिंतेत
कडेगाव : सध्या टोमॅटोचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. तालुक्यात पाण्याची उपलब्धता असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पादन घेतले आहे. मात्र, दर पडल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.
---------------
गुटखा तस्करीचे पोलिसांपुढे आव्हान
सांगली : जिल्ह्यात गत काही दिवसांत गुटखा तस्करीवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, यानंतरही ही तस्करी सुरूच असते. यामुळे अशा तस्करीवर कारवाई करण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनापुढे आहे.
------------
आगीच्या घटनांमुळे चाऱ्याचा प्रश्न
शिराळा : तालुक्यात वारंवार गवताच्या गंजींना आग लागण्याच्या घटना घडत आहेत. आगामी काळात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साठवून ठेवलेल्या चाऱ्याचा जनावरांसाठी मोठा आधार असतो, पण आगीत चारा जळाल्याने शेतकऱ्यांना चाऱ्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.