शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

भाताचे पारंपरिक वाण नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळा तालुका म्हणजे भात पिकाचे व विविध भातांच्या वाणांचे कोठार म्हणून ओळखले जाते. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : शिराळा तालुका म्हणजे भात पिकाचे व विविध भातांच्या वाणांचे कोठार म्हणून ओळखले जाते. दरवर्षी या भागातील शेतकरी धूळवाफ पध्दतीने भात पेरणी करतात. एकीकडे भातक्षेत्र कमी होत आहे, तर दुसरीकडे शरीरास पोषक वाण हळूहळू पडद्यामागे जात आहेत. पारंपरिक भाताचे बियाणे काळाच्या पडद्याआड जाण्याच्या मार्गावर आहेत.

सध्या शेतकरी सुधारित जातीच्या हायब्रीड बियाणांना पसंती देत असून देशी वाण नाहीसे होताना दिसत आहेत. या भागातील वरंगाल, दोडग, मोडग, टायचन, वांडरं, जोंधळा, शिराळी, रत्नागिरी २४ अशा अनेक शरीरास पोषक असलेल्या वाणांच्या भातपिकाचे उत्पादन घेतले जात होते; परंतु सध्या सुधारित व संकरित वाण उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांचा ओढा संकरित बियाणांकडे आहे. यातून जादा उत्पादन घेत आहेत. त्यामुळे पारंपरिक वाण नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

बळीराजाला भातपिकासाठी खूप कष्ट उपसावे लागते. शिवाय उत्पादन खर्चापेक्षा नफा कमी, मजुरांची कमतरता या साऱ्यामुळे वर्षाकाठी पुरेल एवढेच सुधारित व संकरित भातपिकाचे उत्पन्न घेऊन, उसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे. उसामध्ये सूर्यफूल, मका, भुईमूग, सोयाबीन आदी आंतरपिकेही घेतली जात आहेत. यामुळे कमी कष्टात दुहेरी फायदा मिळत आहे.

चाैकट

उसाला महत्त्व वाढले

ऊस पिकासाठी लागणारे मुबलक पाणी बारमाही वाहणाऱ्या वारणा नदीमुळे कधीही कमी पडत नाही. याशिवाय कालव्यातील पाणी सायफनद्वारे शेतीला देता येत असल्याने काही शेतकऱ्यांना विद्युत पंपाची आवश्यकताही भासत नाही. यामुळे आपोआपच भरमसाट प्रमाणावर येणाऱ्या विद्युत बिलाचा खर्चही वाचत आहे. सर्वात महत्त्वाची बाजू म्हणजे तालुक्यात सक्षमपणे सुरू असणारे दोन साखर कारखाने व सहकारी सेवा सोसायटींचे व बँकांचे आर्थिक साहाय्य यामुळे शेतकरी ऊस उत्पादन घेताना दिसून येत आहे.