शहरं
Join us  
Trending Stories
1
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
2
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
3
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका
4
IND vs ENG: आता रंगणार कसोटी मालिकेचा थरार! शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडला रवाना
5
"अमावस्येला नारळ चुकला अन्...", ऋतुजा बागवेने सांगितला भयावह अनुभव
6
विजय मल्ल्याच्या लेकासोबत होतं दीपिकाचं अफेअर; अभिनेत्रीला ताज हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्...
7
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
8
Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या
9
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
10
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!
11
जमिनीचे आरक्षण रद्द करून मुलाच्या मद्यउद्योगाला जागा; इम्तियाज जलीलांचा शिरसाटांवर आरोप
12
Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा
13
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
14
ओरेश्निक मिसाइल म्हणजे ब्रह्मोसची कॉपी...? ज्याच्या सह्यायने रशियानं केला युक्रेनवर पलटवार, एकाच वेळी 6 ठिकाणी करू शकते हल्ला
15
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Raja Raghuvanshi : "माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
17
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
18
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
19
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
20
चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?

प्रशासनाच्या छुप्या लॉकडाऊनला तासगावमध्ये व्यापाऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तासगाव : राज्य शासनाकडून शनिवार-रविवारी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. मात्र, प्रशासनाकडून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

तासगाव : राज्य शासनाकडून शनिवार-रविवारी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. मात्र, प्रशासनाकडून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापार ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या छुप्या लॉकडाऊनला व्यापारी वर्गातून तीव्र विरोध होत असून, प्रशासनाकडून मात्र नियमांची अंमलबजावणी सुरू आहे. तासगाव शहरासह तालुक्यात बहुतांश ठिकाणी बंदमुळे गर्दी ओसरल्याचे चित्र आहे.

मंगळवारी सकाळपासूनच व्यापार बंद ठेवावा लागला. ‘ब्रेक द चेन’च्या नावाखाली पुन्हा ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन पाळावा लागणार आहे, हे समजताच व्यापाऱ्यांचा संताप उफाळून आला. त्यातच अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अर्ध्या गावातील व्यवहार सुरू होता. संतप्त व्यापाऱ्यांनी तासगाव पालिकेत धाव घेतली. तासगाव पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी संयमाने परिस्थिती हाताळली. व्यापाऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.

खासदार संजयकाका पाटील यांनी व्यापाऱ्यांना शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. पोलीस निरीक्षक झाडे व मुख्याधिकारी पाटील आपल्या सहकाऱ्यांसह रस्त्यावर उतरले. अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकाने बंद करण्याचे आवाहन त्यांनी केले. मुख्याधिकारी पाटील हातात शासनाच्या नियमांचा कागद घेऊन व्यापाऱ्यांना समजावून सांगत होते. यावर व्यापाऱ्यांनी शनिवार, रविवारी आम्ही बंद ठेवणार होतो, आता आमची दुकाने का बंद करताय, असा प्रश्न उपस्थित केला. तीस तारखेपर्यंत दुकान बंद ठेवायला लागणार असल्यामुळे व्यापाऱ्यांचा संताप उफाळून आला. संतप्त व्यापाऱ्यांनी तासगाव पालिकेत धाव घेतली.

प्रशासनाने शासनाच्या नियमांनुसार अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगून अत्यावश्यक सेवा वगळून बाकीचा व्यापार बंद ठेवण्यासाठी प्रयत्न केले. रस्त्यावर दिसणारी गर्दी ओसरली असून, अनेक व्यापारपेठ आतून शुकशुकाट असल्याचे चित्र आहे.

कोट

शेतकऱ्यांसह व्यापारीही आर्थिक अडचणीत आहेत. बंदचा निर्णय व्यापाऱ्यांना परवडणारा नाही. कोरोनाबाबतचे प्रतिबंधात्मक उपाय अमलात आणून आवश्यक त्या उपाययोजना करून व्यापार सुरू ठेवायला हवा. व्यापार सुरू ठेवताना प्रशासनाकडून ठरावीक वेळा आणि ठरावीक दिवस ठरवून व्यापार सुरू ठेवल्यास अनावश्यक गर्दी होणार नाही. व्यवसाय सुरू ठेवायला हवा; अन्यथा व्यापारी, रोजगारी उद्‌ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाहीत.

-बाबूराव जाधव,

तालुकाध्यक्ष, ॲग्रो डीलर असोसिएशन, तासगाव.