शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या छुप्या लॉकडाऊनला तासगावमध्ये व्यापाऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तासगाव : राज्य शासनाकडून शनिवार-रविवारी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. मात्र, प्रशासनाकडून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

तासगाव : राज्य शासनाकडून शनिवार-रविवारी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. मात्र, प्रशासनाकडून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापार ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या छुप्या लॉकडाऊनला व्यापारी वर्गातून तीव्र विरोध होत असून, प्रशासनाकडून मात्र नियमांची अंमलबजावणी सुरू आहे. तासगाव शहरासह तालुक्यात बहुतांश ठिकाणी बंदमुळे गर्दी ओसरल्याचे चित्र आहे.

मंगळवारी सकाळपासूनच व्यापार बंद ठेवावा लागला. ‘ब्रेक द चेन’च्या नावाखाली पुन्हा ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन पाळावा लागणार आहे, हे समजताच व्यापाऱ्यांचा संताप उफाळून आला. त्यातच अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अर्ध्या गावातील व्यवहार सुरू होता. संतप्त व्यापाऱ्यांनी तासगाव पालिकेत धाव घेतली. तासगाव पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी संयमाने परिस्थिती हाताळली. व्यापाऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.

खासदार संजयकाका पाटील यांनी व्यापाऱ्यांना शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. पोलीस निरीक्षक झाडे व मुख्याधिकारी पाटील आपल्या सहकाऱ्यांसह रस्त्यावर उतरले. अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकाने बंद करण्याचे आवाहन त्यांनी केले. मुख्याधिकारी पाटील हातात शासनाच्या नियमांचा कागद घेऊन व्यापाऱ्यांना समजावून सांगत होते. यावर व्यापाऱ्यांनी शनिवार, रविवारी आम्ही बंद ठेवणार होतो, आता आमची दुकाने का बंद करताय, असा प्रश्न उपस्थित केला. तीस तारखेपर्यंत दुकान बंद ठेवायला लागणार असल्यामुळे व्यापाऱ्यांचा संताप उफाळून आला. संतप्त व्यापाऱ्यांनी तासगाव पालिकेत धाव घेतली.

प्रशासनाने शासनाच्या नियमांनुसार अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगून अत्यावश्यक सेवा वगळून बाकीचा व्यापार बंद ठेवण्यासाठी प्रयत्न केले. रस्त्यावर दिसणारी गर्दी ओसरली असून, अनेक व्यापारपेठ आतून शुकशुकाट असल्याचे चित्र आहे.

कोट

शेतकऱ्यांसह व्यापारीही आर्थिक अडचणीत आहेत. बंदचा निर्णय व्यापाऱ्यांना परवडणारा नाही. कोरोनाबाबतचे प्रतिबंधात्मक उपाय अमलात आणून आवश्यक त्या उपाययोजना करून व्यापार सुरू ठेवायला हवा. व्यापार सुरू ठेवताना प्रशासनाकडून ठरावीक वेळा आणि ठरावीक दिवस ठरवून व्यापार सुरू ठेवल्यास अनावश्यक गर्दी होणार नाही. व्यवसाय सुरू ठेवायला हवा; अन्यथा व्यापारी, रोजगारी उद्‌ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाहीत.

-बाबूराव जाधव,

तालुकाध्यक्ष, ॲग्रो डीलर असोसिएशन, तासगाव.