शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

जतमध्ये वाहतुकीचे तीनतेरा

By admin | Updated: October 23, 2014 22:49 IST

पोलिसांची बघ्याची भूमिका : वाहनधारकांची तारेवरची कसरत

जत : जत शहरातील मुख्य रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. पण वाहतूक पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जत पोलिसांनी गांधारीची भूमिका घेतल्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.विजापूर ते गुहागर राज्यमार्ग जत शहरातून जातो. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे हा रस्ता अरूंद होऊन येथे सतत वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या रस्त्यालगत असलेले अतिक्रमण काढल्यास काही प्रमाणात येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार आहे.शहरातील महाराणा प्रताप चौक, जयहिंद चौक, गांधी चौक, वाचनालय चौक व दगडी पूल या एकमेकाशी जोडणाऱ्या रस्त्यावर आणि मुख्य चौकात हातगाडीवाले आणि टपरी धारकांनी आपले बस्तान कायमस्वरुपात येथे बसविले आहे. त्यामुळे रस्ता अरूंद होऊन सतत वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. तसेच काही वेळा लहान-मोठे अपघात होत आहेत. या गर्दीचा फायदा घेऊन भुरटे चोर हातोहात दागिने, रोख रक्कम लंपास करीत आहेत. याचा आर्थिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.तत्कालीन प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी जत नगरपालिकेचे सहकार्य घेऊन मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला पांढरे पट्टे मारून व्यावसायिकांना तेथे बसण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था काही दिवस सुरळीत सुरू होती. याशिवाय त्यांच्या कार्यकालावधित शहरातील अतिक्रमण काढून रस्ते खुले करण्यात आले होते. त्यानंतर नगरपालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे सध्या जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे.मंगळवार व गुरुवार या बाजाराच्या दिवशी आणि सणाचा बाजार असेल तर मुख्य बाजारपेठेत गर्दी होते. काहीवेळा मुख्य चौकातच काही हातगाडीवाले आपला गाडा लावून ठाण मांडतात. एखाद्या दोनचाकी अथवा चारचाकी वाहन चालकाने त्यांना हातगाडी बाजूला घेण्याची विनंती जरी केली तरी, त्यांच्याशी ते हुज्जत घालतात. येथे वाहतूक पोलीस कधीच फिरकत नाहीत. परंतु गावाबाहेरील मुख्य रस्त्यावर त्यांची उपस्थिती नियमित असते. यामागील गौडबंगाल काय आहे?, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)वाहतूक पोलिसांच्या भूमिकेचा संशयशहरातील महाराणा प्रताप चौक, जयहिंद चौक, गांधी चौक, वाचनालय चौक व दगडी पूल या एकमेकाशी जोडणाऱ्या रस्त्यावर आणि मुख्य चौकात हातगाडीवाले आणि टपरी धारकांनी आपले बस्तान कायमस्वरुपात येथे बसविले आहे. तत्कालीन प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी जत नगरपालिकेचे सहकार्य घेऊन मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला पांढरे पट्टे मारून व्यावसायिकांना तेथे बसण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था काही दिवस सुरळीत सुरू होती. त्यानंतर नगरपालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे सध्या जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.