शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जतमध्ये वाहतुकीचे तीनतेरा

By admin | Updated: October 23, 2014 22:52 IST

पोलिसांची बघ्याची भूमिका : वाहनधारकांची तारेवरची कसरत

जत : जत शहरातील मुख्य रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. पण वाहतूक पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जत पोलिसांनी गांधारीची भूमिका घेतल्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.विजापूर ते गुहागर राज्यमार्ग जत शहरातून जातो. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे हा रस्ता अरूंद होऊन येथे सतत वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या रस्त्यालगत असलेले अतिक्रमण काढल्यास काही प्रमाणात येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार आहे.शहरातील महाराणा प्रताप चौक, जयहिंद चौक, गांधी चौक, वाचनालय चौक व दगडी पूल या एकमेकाशी जोडणाऱ्या रस्त्यावर आणि मुख्य चौकात हातगाडीवाले आणि टपरी धारकांनी आपले बस्तान कायमस्वरुपात येथे बसविले आहे. त्यामुळे रस्ता अरूंद होऊन सतत वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. तसेच काही वेळा लहान-मोठे अपघात होत आहेत. या गर्दीचा फायदा घेऊन भुरटे चोर हातोहात दागिने, रोख रक्कम लंपास करीत आहेत. याचा आर्थिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.तत्कालीन प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी जत नगरपालिकेचे सहकार्य घेऊन मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला पांढरे पट्टे मारून व्यावसायिकांना तेथे बसण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था काही दिवस सुरळीत सुरू होती. याशिवाय त्यांच्या कार्यकालावधित शहरातील अतिक्रमण काढून रस्ते खुले करण्यात आले होते. त्यानंतर नगरपालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे सध्या जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे.मंगळवार व गुरुवार या बाजाराच्या दिवशी आणि सणाचा बाजार असेल तर मुख्य बाजारपेठेत गर्दी होते. काहीवेळा मुख्य चौकातच काही हातगाडीवाले आपला गाडा लावून ठाण मांडतात. एखाद्या दोनचाकी अथवा चारचाकी वाहन चालकाने त्यांना हातगाडी बाजूला घेण्याची विनंती जरी केली तरी, त्यांच्याशी ते हुज्जत घालतात. येथे वाहतूक पोलीस कधीच फिरकत नाहीत. परंतु गावाबाहेरील मुख्य रस्त्यावर त्यांची उपस्थिती नियमित असते. यामागील गौडबंगाल काय आहे?, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)वाहतूक पोलिसांच्या भूमिकेचा संशयशहरातील महाराणा प्रताप चौक, जयहिंद चौक, गांधी चौक, वाचनालय चौक व दगडी पूल या एकमेकाशी जोडणाऱ्या रस्त्यावर आणि मुख्य चौकात हातगाडीवाले आणि टपरी धारकांनी आपले बस्तान कायमस्वरुपात येथे बसविले आहे. तत्कालीन प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी जत नगरपालिकेचे सहकार्य घेऊन मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला पांढरे पट्टे मारून व्यावसायिकांना तेथे बसण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था काही दिवस सुरळीत सुरू होती. त्यानंतर नगरपालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे सध्या जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.