शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

इस्लामपुरातील गांडूळ खत प्रकल्पाचे तीनतेरा

By admin | Updated: August 11, 2015 00:31 IST

नवीन योजनांची तयारी : घनकचरा नियोजनाच्या अभ्यासासाठी पालिकेचे नेते मुंबई दौऱ्यावर

अशोक पाटील- इस्लामपूर शहरात घनकचऱ्यापासून गांडूळ खत तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यात आला होता. त्याचे तीनतेरा वाजले आहेत. आता नगरपालिका बायोगॅस, घनकचरा नियोजनासाठी काही नवीन योजना आखण्याच्या तयारीत आहे. अशा प्रकल्पांच्या अभ्यासासाठी पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष संजय कोरे, डांगे गटाचे अ‍ॅड. चिमण डांगे आणि एन. ए. गु्रपचे खंडेराव जाधव यांनी मुंबई गाठल्याचे समजते.शहरात स्वच्छतेसाठी राबविण्यात येणाऱ्या अनेक योजनांचा बोजवारा उडाला आहे. भुयारी गटार योजना आणि २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना फक्त कागदावरच आहे. २४ बाय ७ साठी प्राप्त झालेल्या अनुदानाची वाट फक्त सर्व्हे एजन्सीवर लावली आहे. या दोन्ही योजना रद्द झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. कचरा डेपो आणि कुंड्या कचऱ्याने भरुन वाहत आहेत. कचऱ्यापासून गांडूळ खत तयार करण्यासाठी पालिकेने कोट्यवधीचा खर्च करुन प्रकल्प उभारला, परंतु तो सध्या बंद आहे. डेपोवर नेमलेले सुरक्षा रक्षक नेहमीच गैरहजर असतात. परंतु त्यांचा पगार मात्र काढण्यात येतो.शहरातील गांडूळ खत प्रकल्पाचे तीनतेरा वाजल्याने आमदार जयंत पाटील यांनी मुंबईत भाभा अनुसंधान केंद्रातील काही प्रकल्प पाहण्यासाठी पालिकेतील ठराविक पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले होते. यामुळेच पालिकेचे हे पदाधिकारी सोमवारी पहाटे मुंबईला मार्गस्थ झाले.इस्लामपूर पालिकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी हे सहीपुरतेच पालिकेचे धनी आहेत. शहरातील विविध विकास कामांवर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. परंतु अंतर्गत संघर्षामुळे एकही विकासकाम शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेले नाही. जी विकासकामे झाली आहेत, त्यांचा दर्जा चांगला नाही. त्यामुळे केलेल्या विकास कामांचे तीनतेरा वाजले आहेत. हीच परिस्थिती गांडूळ खत प्रकल्पाची झाली आहे. आता नव्याने सत्ताधारी यामध्ये काय नवीन करणार, याकडेच साऱ्या शहरातील सामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.डॉ. शरद काळे यांनी मुंबई येथील ‘निसर्ग ऋण प्रकल्प’ पाहणी करण्यासाठी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते. परंतु इस्लामपूर शहरातील घनकचरा प्रकल्प बंद पाडलेले पदाधिकारीच आज मुंबई येथे नवीन प्रकल्प पाहण्यासाठी गेले आहेत. खरोखरच इस्लामपूर शहराचे घनकचरा व्यवस्थापन ‘निसर्ग ऋणा’तून मुक्त व्हायचे असेल, तर सत्ताधाऱ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.- विजय कुंभार, विरोधी पक्षनेते, इ. न. पा.जयंत पाटलांचा आदेश आणि ...पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील हे पालिकेचा कारभार हाकत आहेत. परंतु विजय पाटील यांच्याविरोधात डांगे गट आणि एन. ए. गु्रप असे दोन गट कार्यरत आहेत. पालिकेच्या माध्यमातून शहरातील विकासकामे करताना विजय पाटील आणि अ‍ॅड. चिमण डांगे एकत्र येऊनच सर्व निर्णय घेतात. तसेच एन. ए. गु्रपचे खंडेराव जाधव अंतर्गत विरोधात असले तरी, जयंत पाटील यांच्यासमोर मात्र सर्व काही आलबेल असल्याचे दाखवितात. याच गु्रपचे संजय कोरे यांना उपनगराध्यक्षपद मिळाले आहे. परंतु त्यांनी त्यांच्या आसनाचा त्याग केला आहे. त्यामुळे पालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादीचे तीन गट कार्यरत असल्याचे नेहमीच स्पष्ट झाले आहे. तरी सुध्दा जयंत पाटील यांच्या आदेशाने सोमवारी पहाटे हे सर्व एकत्रितपणे एकाच गाडीतून मुंबईला गेले आहेत. त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे.