शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

इस्लामपुरातील गांडूळ खत प्रकल्पाचे तीनतेरा

By admin | Updated: August 11, 2015 00:31 IST

नवीन योजनांची तयारी : घनकचरा नियोजनाच्या अभ्यासासाठी पालिकेचे नेते मुंबई दौऱ्यावर

अशोक पाटील- इस्लामपूर शहरात घनकचऱ्यापासून गांडूळ खत तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यात आला होता. त्याचे तीनतेरा वाजले आहेत. आता नगरपालिका बायोगॅस, घनकचरा नियोजनासाठी काही नवीन योजना आखण्याच्या तयारीत आहे. अशा प्रकल्पांच्या अभ्यासासाठी पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष संजय कोरे, डांगे गटाचे अ‍ॅड. चिमण डांगे आणि एन. ए. गु्रपचे खंडेराव जाधव यांनी मुंबई गाठल्याचे समजते.शहरात स्वच्छतेसाठी राबविण्यात येणाऱ्या अनेक योजनांचा बोजवारा उडाला आहे. भुयारी गटार योजना आणि २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना फक्त कागदावरच आहे. २४ बाय ७ साठी प्राप्त झालेल्या अनुदानाची वाट फक्त सर्व्हे एजन्सीवर लावली आहे. या दोन्ही योजना रद्द झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. कचरा डेपो आणि कुंड्या कचऱ्याने भरुन वाहत आहेत. कचऱ्यापासून गांडूळ खत तयार करण्यासाठी पालिकेने कोट्यवधीचा खर्च करुन प्रकल्प उभारला, परंतु तो सध्या बंद आहे. डेपोवर नेमलेले सुरक्षा रक्षक नेहमीच गैरहजर असतात. परंतु त्यांचा पगार मात्र काढण्यात येतो.शहरातील गांडूळ खत प्रकल्पाचे तीनतेरा वाजल्याने आमदार जयंत पाटील यांनी मुंबईत भाभा अनुसंधान केंद्रातील काही प्रकल्प पाहण्यासाठी पालिकेतील ठराविक पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले होते. यामुळेच पालिकेचे हे पदाधिकारी सोमवारी पहाटे मुंबईला मार्गस्थ झाले.इस्लामपूर पालिकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी हे सहीपुरतेच पालिकेचे धनी आहेत. शहरातील विविध विकास कामांवर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. परंतु अंतर्गत संघर्षामुळे एकही विकासकाम शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेले नाही. जी विकासकामे झाली आहेत, त्यांचा दर्जा चांगला नाही. त्यामुळे केलेल्या विकास कामांचे तीनतेरा वाजले आहेत. हीच परिस्थिती गांडूळ खत प्रकल्पाची झाली आहे. आता नव्याने सत्ताधारी यामध्ये काय नवीन करणार, याकडेच साऱ्या शहरातील सामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.डॉ. शरद काळे यांनी मुंबई येथील ‘निसर्ग ऋण प्रकल्प’ पाहणी करण्यासाठी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते. परंतु इस्लामपूर शहरातील घनकचरा प्रकल्प बंद पाडलेले पदाधिकारीच आज मुंबई येथे नवीन प्रकल्प पाहण्यासाठी गेले आहेत. खरोखरच इस्लामपूर शहराचे घनकचरा व्यवस्थापन ‘निसर्ग ऋणा’तून मुक्त व्हायचे असेल, तर सत्ताधाऱ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.- विजय कुंभार, विरोधी पक्षनेते, इ. न. पा.जयंत पाटलांचा आदेश आणि ...पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील हे पालिकेचा कारभार हाकत आहेत. परंतु विजय पाटील यांच्याविरोधात डांगे गट आणि एन. ए. गु्रप असे दोन गट कार्यरत आहेत. पालिकेच्या माध्यमातून शहरातील विकासकामे करताना विजय पाटील आणि अ‍ॅड. चिमण डांगे एकत्र येऊनच सर्व निर्णय घेतात. तसेच एन. ए. गु्रपचे खंडेराव जाधव अंतर्गत विरोधात असले तरी, जयंत पाटील यांच्यासमोर मात्र सर्व काही आलबेल असल्याचे दाखवितात. याच गु्रपचे संजय कोरे यांना उपनगराध्यक्षपद मिळाले आहे. परंतु त्यांनी त्यांच्या आसनाचा त्याग केला आहे. त्यामुळे पालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादीचे तीन गट कार्यरत असल्याचे नेहमीच स्पष्ट झाले आहे. तरी सुध्दा जयंत पाटील यांच्या आदेशाने सोमवारी पहाटे हे सर्व एकत्रितपणे एकाच गाडीतून मुंबईला गेले आहेत. त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे.