शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
3
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
4
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
7
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
8
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
9
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
10
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
11
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
12
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
13
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
14
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
15
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
16
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
17
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
18
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
19
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
20
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?

राज्यात तिघाडा, वॉर्डात बिघाडा, इच्छुक उमेदवारांची उडाली झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:31 IST

शीतल पाटीललोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राज्य शासनाने महापालिकेच्या निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रभाग रचना लागू केल्याने सांगलीतील वॉर्डाची रचना पुन्हा ...

शीतल पाटीललोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : राज्य शासनाने महापालिकेच्या निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रभाग रचना लागू केल्याने सांगलीतील वॉर्डाची रचना पुन्हा बदलणार आहे. सध्या चार सदस्यीय प्रभाग आहेत. नव्या रचनेत २० ऐवजी २६ वॉर्ड होतील. यामुळे इच्छुक उमेदवारांची झोप उडाली असून त्यांच्या निवडणूक तयारीवरही पाणी फिरले आहे.

महापालिकेच्या निवडणुकीला अजून दोन वर्षांचा कालावधी आहे. निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. आतापर्यंत दोनदा एकसदस्यीय, दोनदा द्विसदस्यीय तर एकदा त्रिसदस्यीय व सध्या चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुका झाल्या आहेत. सांगलीत त्रिसदस्यीय प्रभाग रचना २००३-०४ च्या निवडणुकीत होती. आता पुन्हा तीच प्रभाग पद्धती लागू होणार आहे. सध्या इच्छुकांनी एकमेकांशी साटेलोटे करीत निवडणुकीची तयारी सुरू केली होती. त्यांना नव्याने राजकीय समीकरणे जुळवावी लागणार आहेत.

चौकट

पालिकेतील सध्याची स्थिती

सध्या महापालिकेचे २० वॉर्ड असून, नगरसेवकांची संख्या ७८ आहे. चारसदस्यीय १८ वॉर्ड आहेत, तर दोन वॉर्डात तीन नगरसेवक आहेत. जवळपास २२ ते २५ मतदारांचा एक प्रभाग आहे.

चौकट

आता अशी असेल पालिकेतील स्थिती

शासनाच्या नव्या नियमामुळे महापालिकेच्या सध्या २० वॉर्डाऐवजी २६ वॉर्ड होतील. नगरसेवकांच्या संख्येत कोणताही बदल होणार नाही. १५ ते १८ हजार मतदारसंख्येचे वॉर्ड असतील. त्यात आरक्षित व खुल्या वर्गाच्या जागांनुसार नवीन रचना करावी लागणार आहे.

चौकट

एका मतदाराला तिघांना द्यावे लागणार मत

तीन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत एका मतदाराला चार मते द्यावी लागली होती. त्यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका होत्या. आता चारऐवजी तिघांना मतदान करावे लागणार आहे. यापूर्वीही शहरातील मतदारांनी तीन व चार जणांना मतदान केले आहे.

चौकट

राजकीय अपेक्षांवरही पाणी

१. सध्याची बहुसदस्यीय प्रभाग रचना योग्य होती. शासनाने त्रिसदस्यीय रचना करून काय साध्य केले? या मागे काहीच लाॅजिक नाही. केवळ महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी हा उद्योग केला आहे.

- दीपक शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप

२. बहुसदस्यीय रचनेत विकासावर परिणाम होतो. त्यासाठी एक अथवा द्विसदस्यीय प्रभाग रचनाच योग्य आहे. त्यामुळे जनतेला न्याय देता येईल.

- पृथ्वीराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष काँग्रेस

३. राज्य शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. जनतेच्या विकासाच्या दृष्टीने त्रिसदस्यीय रचना चांगली आहे. त्यामुळे शहराचा विकासाला गती येईल. - संजय विभुते, जिल्हाप्रमुख शिवसेना

४. सांगलीत यापूर्वीही त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे शहराच्या विकासावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. कार्यकर्त्यांनाही योग्य न्याय देता येईल.

- संजय बजाज, शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी