शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
4
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
5
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
6
"इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
7
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
8
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
9
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
10
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
11
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
12
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
13
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
14
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
15
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
16
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
17
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
18
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
19
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
20
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात तिघाडा, वॉर्डात बिघाडा, इच्छुक उमेदवारांची उडाली झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:31 IST

शीतल पाटीललोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राज्य शासनाने महापालिकेच्या निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रभाग रचना लागू केल्याने सांगलीतील वॉर्डाची रचना पुन्हा ...

शीतल पाटीललोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : राज्य शासनाने महापालिकेच्या निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रभाग रचना लागू केल्याने सांगलीतील वॉर्डाची रचना पुन्हा बदलणार आहे. सध्या चार सदस्यीय प्रभाग आहेत. नव्या रचनेत २० ऐवजी २६ वॉर्ड होतील. यामुळे इच्छुक उमेदवारांची झोप उडाली असून त्यांच्या निवडणूक तयारीवरही पाणी फिरले आहे.

महापालिकेच्या निवडणुकीला अजून दोन वर्षांचा कालावधी आहे. निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. आतापर्यंत दोनदा एकसदस्यीय, दोनदा द्विसदस्यीय तर एकदा त्रिसदस्यीय व सध्या चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुका झाल्या आहेत. सांगलीत त्रिसदस्यीय प्रभाग रचना २००३-०४ च्या निवडणुकीत होती. आता पुन्हा तीच प्रभाग पद्धती लागू होणार आहे. सध्या इच्छुकांनी एकमेकांशी साटेलोटे करीत निवडणुकीची तयारी सुरू केली होती. त्यांना नव्याने राजकीय समीकरणे जुळवावी लागणार आहेत.

चौकट

पालिकेतील सध्याची स्थिती

सध्या महापालिकेचे २० वॉर्ड असून, नगरसेवकांची संख्या ७८ आहे. चारसदस्यीय १८ वॉर्ड आहेत, तर दोन वॉर्डात तीन नगरसेवक आहेत. जवळपास २२ ते २५ मतदारांचा एक प्रभाग आहे.

चौकट

आता अशी असेल पालिकेतील स्थिती

शासनाच्या नव्या नियमामुळे महापालिकेच्या सध्या २० वॉर्डाऐवजी २६ वॉर्ड होतील. नगरसेवकांच्या संख्येत कोणताही बदल होणार नाही. १५ ते १८ हजार मतदारसंख्येचे वॉर्ड असतील. त्यात आरक्षित व खुल्या वर्गाच्या जागांनुसार नवीन रचना करावी लागणार आहे.

चौकट

एका मतदाराला तिघांना द्यावे लागणार मत

तीन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत एका मतदाराला चार मते द्यावी लागली होती. त्यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका होत्या. आता चारऐवजी तिघांना मतदान करावे लागणार आहे. यापूर्वीही शहरातील मतदारांनी तीन व चार जणांना मतदान केले आहे.

चौकट

राजकीय अपेक्षांवरही पाणी

१. सध्याची बहुसदस्यीय प्रभाग रचना योग्य होती. शासनाने त्रिसदस्यीय रचना करून काय साध्य केले? या मागे काहीच लाॅजिक नाही. केवळ महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी हा उद्योग केला आहे.

- दीपक शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप

२. बहुसदस्यीय रचनेत विकासावर परिणाम होतो. त्यासाठी एक अथवा द्विसदस्यीय प्रभाग रचनाच योग्य आहे. त्यामुळे जनतेला न्याय देता येईल.

- पृथ्वीराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष काँग्रेस

३. राज्य शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. जनतेच्या विकासाच्या दृष्टीने त्रिसदस्यीय रचना चांगली आहे. त्यामुळे शहराचा विकासाला गती येईल. - संजय विभुते, जिल्हाप्रमुख शिवसेना

४. सांगलीत यापूर्वीही त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे शहराच्या विकासावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. कार्यकर्त्यांनाही योग्य न्याय देता येईल.

- संजय बजाज, शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी